शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील वन खात्याला रिक्तपदांनी पोखरले; १००६ पदांचा ‘अतिरिक्त प्रभार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 15:40 IST

राज्यातील ६१ लाख हेक्टर वनक्षेत्र, त्यातील दुर्मिळ वन्यप्राणी आणि मौल्यवान सागवान, वनस्पतींच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या वन खात्याला रिक्त पदांनी पोखरले आहे.

ठळक मुद्देनऊ ‘आयएफएस’चा समावेश जंगल-व्याघ्र संरक्षणाचे आव्हान, भरारी पथकात ५० जागा रिक्त

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : राज्यातील ६१ लाख हेक्टर वनक्षेत्र, त्यातील दुर्मिळ वन्यप्राणी आणि मौल्यवान सागवान, वनस्पतींच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या वन खात्याला रिक्त पदांनी पोखरले आहे. तब्बल एक हजार सहा पदांचा कारभार गेल्या कित्येक वर्षांपासून ‘अतिरिक्त प्रभारा’वर चालविला जात आहे. त्यात भारतीय वनसेवेच्या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.राज्यात ६१ लाख ७८ हजार १६३ हेक्टर क्षेत्रात वन विभागाचे जंगल पसरले आहे. त्यातील तीन लाख ९३ हजार ९१९ हेक्टर क्षेत्र वनविकास महामंडळाच्या ताब्यात आहे. ६१ लाख हेक्टर पैकी २५ लाख ४६ हजार ७६० हेक्टर क्षेत्र हे एकट्या विदर्भात आहे. या जंगलामध्ये चंदन, सागवान, पट्टेदार वाघ, बिबट, आयुर्वेदिक औषधात प्रचंड महत्व असलेली दुर्मिळ वनस्पती आहे. या जंगलांच्या संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी वन खात्यावर आहे. सर्वाधिक जंगल विदर्भात असल्याने वन खात्याचे मुख्यालयही खास विदर्भात (नागपूर) थाटले गेले आहे. प्रधान मुख्य वनसंरक्षक या खात्याचे प्रमुख आहेत. युती सरकारमध्ये सुदैवाने वनमंत्रीसुद्धा विदर्भाचे आहेत. वन खात्याला सध्या रिक्त पदांनी ग्रासले आहे. त्यामुळे जंगल संरक्षण करावे कसे, असा प्रश्न उपलब्ध वनअधिकारी व कर्मचाऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. कमी संख्या असल्याने या यंत्रणेवर कामाचा ताण वाढतो आहे. एक-दोन नव्हे तर तब्बल १००६ पदांचे कामकाज अतिरिक्त प्रभारामुळे दुसऱ्याच कुणाला तरी पहावे लागत आहे. त्यामुळे या मूळ पदांच्या कामाकडे दुर्लक्ष होताना दिसते. त्यातूनच अवैध वृक्षतोड, वन्य प्राण्यांची शिकार या सारखे प्रकार वाढल्याचे सांगितले जाते.सप्टेंबर २०१७ अखेर वन खात्यात १००६ पदे रिक्त आहेत. त्यामध्ये आयएफएसची नऊ तर राज्य सेवेतील विभागीय वन अधिकारी २४ व सहायक वनसंरक्षकांच्या ६२ पदांचा समावेश आहे. याशिवाय वनक्षेत्रपाल १७६ तर वनखात्याचा पाया असलेल्या वनपाल ४२८ व वनरक्षकांची ४०२ पदे रिक्त आहेत.

पदोन्नती व सरळसेवेने भरतीरिक्त असलेल्या १००६ पदांपैकी काही पदोन्नतीने भरली जाणार आहेत तर सरळसेवा भरतीच्या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू असून ते फेब्रुवारी-मार्चमध्ये वनखात्यात उपलब्ध होणार आहे. अन्य रिक्त होणारी पदे पुढील तीन वर्षात १०० टक्के भरण्याबाबतचा प्रस्ताव वित्त व सामान्य प्रशासन विभागाला सादर करण्यात आला आहे.तस्करी-शिकारी थांबवायच्या कशा?सागवान व अन्य वृक्षांची अवैध तोड थांबविणे, तस्करीला आळा घालणे, वन्य प्राण्यांच्या शिकारींना ब्रेक लावणे, आरागिरण्यांवर नजर ठेवणे ही प्रमुख जबाबदारी भरारी पथकांवर (मोबाईल स्कॉड) आहे. परंतु ही पथकेच अशक्त आहेत. त्यातील अधिकाऱ्यांच्या ५० जागा रिक्त आहेत. त्यात वनपरिक्षेत्र अधिकारी १८, वनपाल १६ आणि वनरक्षकाच्या १६ पदांचा समावेश आहे. त्यामुळे धाडी घालायच्या कुणी असा प्रश्न उपस्थित होताना दिसतो.

टॅग्स :forest departmentवनविभाग