शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

खरीप हंगामाची लगबग सुरू

By admin | Updated: May 20, 2014 23:56 IST

खरीप हंगाम जवळ येऊ लागल्याने शेतकर्‍यांची लगबग सुरू झाली आहे. यावर्षी पाऊस लवकर येण्याचे संकेत प्राप्त झाल्याने बळीराजाने मशागत पूर्ण करण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे.

वणी : खरीप हंगाम जवळ येऊ लागल्याने शेतकर्‍यांची लगबग सुरू झाली आहे. यावर्षी पाऊस लवकर येण्याचे संकेत प्राप्त झाल्याने बळीराजाने मशागत पूर्ण करण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. सोबतच खत आणि बियाण्यांसाठी त्यांची धावाधाव सुरू झाली आहे. वणी तालुक्यात ९२ हजार ३५८ हेक्टर क्षेत्र लागवडीयोग्य आहे. त्यापैकी जवळपास ६० हजार हेक्टरच्यावर क्षेत्रात खरीपाची पेरणी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तालुक्यातील लागवडीयोग्य जमिनीचे क्षेत्रफळ मात्र वर्षागणीक कमी होत आहे. तालुक्यात कोळसा खाणींची संख्या सतत वाढत असल्याने आता लागवडीखालील क्षेत्रात घट होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उत्पन्नातही फरक पडत आहे. सोबतच उत्पन्नात घटही येत आहे. रस्त्यालगतच्या शेतातील पिकांवर धूळ साचत असल्याने पिकाच्या उतारीत येणारी घट शेतकर्‍यांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. यावर्षीचा खरीप हंगाम आता तोंडावर आला आहे़ येत्या २४ मे पासून पावसाचे पहिले नक्षत्र रोहिणी सुरू होत आहे. त्यानंतर ७ जूनपासून पावसाचे मुख्य नक्षत्र मृग सुरू होणार आहे. परिणामी येत्या १५-२0 दिवसानंतर खरीप हंगामाची लगबग खर्‍या अर्थाने सुरू होणार आहे़ शेतकरी तूर्तास पूर्व तयारीला लागले आहे़ शेताची नांगरणी, वखरणी करण्यात ते गुंग आहे. तालुक्यात जवळपास २६ हजार शेतकरी शेती कसतात. ते आता लग्नसराईकडे दुर्लक्ष करून नांगरणी, वखरणीची कामे करताना दिसत आहे़ शेतात नांगरणी करून वखरणीसह काशा, काडी, कचरा वेचण्याचे काम सुरू आहे़ शेतीची कामे उरकण्यासाठी शेतकरी ट्रॅक्टरच्या साहाय्याने रात्रीसुध्दा नांगरणी, वखरणी करीत असल्याचे दिसून येत आहे. अनेक शेतकर्‍यांची मशागत आता पूर्णत्वासही गेली आहे. त्यामुळे अशा शेतकर्‍यांनी आता बियाणे, रासायनिक खताची खरेदी करून साठवण करण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. यावर्षी कृषी विक्रेत्यांनी यापूर्वी बियाणे व रासायनिक खतांची मोठ्या प्रमाणात खरेदी करून त्याची साठवणूक केली आहे़ त्यामुळे बियाणे व खतांचा सुकाळ असल्याचे एका कृषी विक्रेत्याने सांगितले़ यावर्षी सोयाबिनचा पेरा पुन्हा वाढण्याची शक्यता आहे़ कापसाला शासन उत्पादन खर्चावर आधारित भाव देत नसल्याने कापसाचा पेरा फायदेशीर ठरत नसल्याची शेतकर्‍यांची ओरड आहे़ परिणामी शेतकर्‍यांचा सोयाबीन पेरणीकडे कल वाढला आहे़ कमी खर्चात सोयाबिनचे अधिक उत्पन्न घेता येते. तसेच सिंचनाची सोय असल्यास सोयाबीन पीक काढणीनंतर दुसरे रबी पीकही घेता येते़ त्यामुळे सोयाबीन पीक फायदेशीर असल्याचे शेतकर्‍यांना वाटत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)