शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
5
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
6
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
7
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
8
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
9
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
10
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
11
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
12
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
13
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
14
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
15
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
16
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
17
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
18
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
19
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

खरीप हंगामाची लगबग सुरू

By admin | Updated: May 20, 2014 23:56 IST

खरीप हंगाम जवळ येऊ लागल्याने शेतकर्‍यांची लगबग सुरू झाली आहे. यावर्षी पाऊस लवकर येण्याचे संकेत प्राप्त झाल्याने बळीराजाने मशागत पूर्ण करण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे.

वणी : खरीप हंगाम जवळ येऊ लागल्याने शेतकर्‍यांची लगबग सुरू झाली आहे. यावर्षी पाऊस लवकर येण्याचे संकेत प्राप्त झाल्याने बळीराजाने मशागत पूर्ण करण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. सोबतच खत आणि बियाण्यांसाठी त्यांची धावाधाव सुरू झाली आहे. वणी तालुक्यात ९२ हजार ३५८ हेक्टर क्षेत्र लागवडीयोग्य आहे. त्यापैकी जवळपास ६० हजार हेक्टरच्यावर क्षेत्रात खरीपाची पेरणी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तालुक्यातील लागवडीयोग्य जमिनीचे क्षेत्रफळ मात्र वर्षागणीक कमी होत आहे. तालुक्यात कोळसा खाणींची संख्या सतत वाढत असल्याने आता लागवडीखालील क्षेत्रात घट होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उत्पन्नातही फरक पडत आहे. सोबतच उत्पन्नात घटही येत आहे. रस्त्यालगतच्या शेतातील पिकांवर धूळ साचत असल्याने पिकाच्या उतारीत येणारी घट शेतकर्‍यांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. यावर्षीचा खरीप हंगाम आता तोंडावर आला आहे़ येत्या २४ मे पासून पावसाचे पहिले नक्षत्र रोहिणी सुरू होत आहे. त्यानंतर ७ जूनपासून पावसाचे मुख्य नक्षत्र मृग सुरू होणार आहे. परिणामी येत्या १५-२0 दिवसानंतर खरीप हंगामाची लगबग खर्‍या अर्थाने सुरू होणार आहे़ शेतकरी तूर्तास पूर्व तयारीला लागले आहे़ शेताची नांगरणी, वखरणी करण्यात ते गुंग आहे. तालुक्यात जवळपास २६ हजार शेतकरी शेती कसतात. ते आता लग्नसराईकडे दुर्लक्ष करून नांगरणी, वखरणीची कामे करताना दिसत आहे़ शेतात नांगरणी करून वखरणीसह काशा, काडी, कचरा वेचण्याचे काम सुरू आहे़ शेतीची कामे उरकण्यासाठी शेतकरी ट्रॅक्टरच्या साहाय्याने रात्रीसुध्दा नांगरणी, वखरणी करीत असल्याचे दिसून येत आहे. अनेक शेतकर्‍यांची मशागत आता पूर्णत्वासही गेली आहे. त्यामुळे अशा शेतकर्‍यांनी आता बियाणे, रासायनिक खताची खरेदी करून साठवण करण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. यावर्षी कृषी विक्रेत्यांनी यापूर्वी बियाणे व रासायनिक खतांची मोठ्या प्रमाणात खरेदी करून त्याची साठवणूक केली आहे़ त्यामुळे बियाणे व खतांचा सुकाळ असल्याचे एका कृषी विक्रेत्याने सांगितले़ यावर्षी सोयाबिनचा पेरा पुन्हा वाढण्याची शक्यता आहे़ कापसाला शासन उत्पादन खर्चावर आधारित भाव देत नसल्याने कापसाचा पेरा फायदेशीर ठरत नसल्याची शेतकर्‍यांची ओरड आहे़ परिणामी शेतकर्‍यांचा सोयाबीन पेरणीकडे कल वाढला आहे़ कमी खर्चात सोयाबिनचे अधिक उत्पन्न घेता येते. तसेच सिंचनाची सोय असल्यास सोयाबीन पीक काढणीनंतर दुसरे रबी पीकही घेता येते़ त्यामुळे सोयाबीन पीक फायदेशीर असल्याचे शेतकर्‍यांना वाटत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)