शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
6
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
7
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
8
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
9
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
10
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
11
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
12
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
13
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
14
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
15
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
16
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
17
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
18
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
19
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
20
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न

एमआयडीसीतील पॉर्इंट टँकरसाठी २४ तास सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 22:24 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरसाठी एमआयडीसीतील पॉर्इंट २४ तास खुले ठेवण्याचे आदेश पालकमंत्री मदन येरावार यांनी दिले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पाणीटंचाई निवारणासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे आदेश : पाणीटंचाई निवारणासाठी बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरसाठी एमआयडीसीतील पॉर्इंट २४ तास खुले ठेवण्याचे आदेश पालकमंत्री मदन येरावार यांनी दिले.येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पाणीटंचाई निवारणासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला विभागीय आयुक्त पीयूष सिंह, प्रभारी जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, माजिप्राचे कार्यकारी अभियंता अजय बेले, उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांडगे, मुख्याधिकारी अनिल अढागळे, वीज वितरणचे कार्यकारी अभियंता चितळे उपस्थित होते.यवतमाळ शहरात अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली असून ही पाणीटंचाई निवारण्यासाठी शासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहे. टंचाईच्या अनेक योजनांसोबत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यावर भर दिला जात आहे. सध्या नगरपरिषदेच्या टँकरला एमआयडीसीतून पाणीपुरवठा होत आहे. मात्र या ठिकाणी गर्दी होत असल्याने टँकर भरण्यास अडचण निर्माण होते. जनतेला पाणी वेळेवर मिळत नाही. त्यामुळे आता एमआयडीसीतील पॉर्इंट टँकरसाठी २४ तास खुले राहणार असून त्यासाठी वेळापत्रक आखून देण्यात येणार आहे. पाणीपुरवठ्याची भिस्त टँकरवरच असल्याने अतिरिक्त टँकरची डिमांड मुख्याधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांपुढे तातडीने करण्याचे निर्देश दिले आहे. पावसाळ्यानंतरही निळोणा आणि चापडोह प्रकल्प पूर्ण भरल्याशिवाय पाणीपुरवठा सुरळीत होणार नाही. त्यामुळे शहरानजीकच्या ग्रामीण भागातील जलस्रोत शोधण्याचे आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यावरून किन्ही, भोसा, डोळंबा येथे पाण्याचे स्रोत असून याबाबत संबंधितांची बैठक सोमवारी घेणार असल्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांनी सांगितले.पाण्यासाठी हेल्पलाईन क्रमांकआपत्तीच्या काळात हेल्पलाईन महत्वाची भूमिका बजावते. त्यामुळे नगरपरिषदेने तत्काळ हेल्पलाईन सुरू करून क्रमांकाची प्रसिद्धी करावी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील हेल्पलाईन क्रमांक तातडीने सुरू करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. शहरातील मागास भागांमध्ये नियमित पाणीपुरवठा करण्याचे निर्देशही पालकमंत्री मदन येरावार यांनी दिले.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई