शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

१५ दिवसांत वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाच्या माती कामास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 20:24 IST

वर्धा-यवतमाळ-नांदेड या नवीन रेल्वे मार्गास गती देण्याचा प्रयत्न केला जात असून सोमवारी खासदार भावनाताई गवळी यांनी रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन संपूर्ण कामाचा आढावा घेतला.

ठळक मुद्देभावना गवळी यांनी घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वर्धा-यवतमाळ-नांदेड या नवीन रेल्वे मार्गास गती देण्याचा प्रयत्न केला जात असून सोमवारी खासदार भावनाताई गवळी यांनी रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन संपूर्ण कामाचा आढावा घेतला. त्यात येत्या १५ दिवसांत कळंब ते यवतमाळ दरम्यान रुळ टाकण्यासाठी आवश्यक असलेल्या माती कामास प्रारंभ केला जाणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.खासदार भावनाताई गवळी यांनी वर्धा-यवतमाळ-नांदेड या नवीन रेल्वे मार्गाचे वेगाने काम व्हावे म्हणून रेल्वेमंत्र्यांची भेट घेतली. यवतमाळात येथे जिल्हाधिकारी कार्यालयात अतिरिक्त जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, रेल्वेचे कार्यकारी अभियंता आर.के.धनगर, डेप्युटी चिफ इंजिनियर एच.एल.कावरे यांच्यासोबत आढावा बैठक घेतली. यवतमाळ जिल्ह्यातील या रेल्वे मागार्साठी आवश्यक असलेले जमीन अधिग्रहणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. लवकरच अधिग्रहणाचे हे काम १00 टक्के पूर्णत्वास जाणार असल्याची माहिती चंद्रकांत जाजू यांनी दिली.यवतमाळ जिल्ह्यात कळंबपर्यंत गलमगाव, खुटाळा, गंगादेवी, कामठवाडा, एकलासपूर परिसरात माती काम सुरु झाले आहे. येत्या १५ दिवसांत कळंबपासून यवतमाळपर्यंत माती कामास प्रारंभ केला जाणार आहे. यापाठोपाठ जुलै महिन्यापासून यवतमाळ ते दारव्हा व नंतर लगेच दिग्रसपर्यंत माती कामास प्रारंभ केला जाणार आहे. या कामाचे टेंडर काढण्यात येईल. या मार्गावर पुसद तसेच उमरखेड भागात भुयार बांधावे लागणार असून त्याचीही प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हे काम सेक्शनवाईज करण्यात येत असल्याने या कामाला गती प्राप्त होत आहे. वर्धा-यवतमाळ-नांदेड हा प्रकल्प ‘पीएम पोर्टल’वर असूनही प्रकल्पावर कार्यरत कर्मचारी कमी असल्याने त्याची पूर्तता करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करणार असल्याचे भावनाताई गवळी यांनी सांगितले.यवतमाळ-आर्णी मार्गावरील एका हॉटेलजवळून ही रेल्वे लाईन जाणार असल्याने तसेच याच ठिकाणावरुन राष्ट्रीय महामार्ग तयार होत असल्याने येणारी समस्या दूर करण्याच्या उद्देशाने आधीच हालचाली करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या.रुळ टाकण्यास होईल सुरुवातमाती काम झाल्याबरोबर रेल्वेचे रुळ टाकण्यास सुरुवात केली जाणार आहे. जिल्ह्यातील माती काम येत्या आठ ते दहा महिन्यात पूर्ण करण्याचे नियोजन रेल्वे विभागाने केले आहे. त्यामुळे यवतमाळकरांच्या स्वप्नातील रेल्वे लवकरच अस्तित्वात येण्याची चिन्हे दिसून येत आहे.प्रकल्पाला गती देण्याच्या सूचनासोमवारी झालेल्या आढावा बैठकीत खासदार भावनाताई गवळी यांनी या प्रकल्पाला गती देण्याच्या सूचना रेल्वेसह सर्व अधिकाऱ्यांना दिल्या. या प्रकल्पाची सध्याची किंमत ३१६८ कोटीपर्यंत पोहोचली आहे. माती काम पूर्ण करुन लवकर रेल्वेचे रुळ टाकण्याची प्रक्रिया प्रारंभ करा, असेही भावनाताई गवळी यांनी अधिकाऱ्यांना सुचविले.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेBhavna Gavliभावना गवळी