शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

शिक्षक पदभरती तातडीने सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 23:16 IST

पारदर्शकपणे शिक्षक पदभरती करण्यासाठी राज्य शासनाने अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी घेतली. मात्र, अद्यापही भरती सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे तातडीने पदभरती प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी थेट शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांची मागणी : थेट शिक्षणमंत्र्यांना दिले निवेदन, परीक्षेची उत्तरतालिकाही मिळावी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पारदर्शकपणे शिक्षक पदभरती करण्यासाठी राज्य शासनाने अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी घेतली. मात्र, अद्यापही भरती सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे तातडीने पदभरती प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी थेट शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे.शिक्षण मंत्री विनोद तावडे यवतमाळात आले असता स्पर्धा परीक्षा विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले. १२ ते २२ डिसेंबरदरम्यान शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी झाली. मात्र अजूनही शिक्षक पदभरती संदर्भात कुठल्याही प्रकारची हालचाल शासनस्तरावर दिसून येत नाही. त्यामुळे चाचणी दिलेले सर्व अध्यापक संभ्रमावस्थेत आहेत. उत्तरतालिका जाहीर करण्यात आली. परंतु, त्यात विद्यार्थ्यांनी सोडविलेल्या उत्तरांची कुठेही नोंद नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सोडविलेल्या प्रश्नपत्रिकेची उत्तरांसहीत विद्यार्थ्यांपर्यंत उत्तरतालिका पोहोचवावी, अशी मागणी करण्यात आली.राज्यात २००९-१० पासून शिक्षक पदभरती घेण्यात आलेली नाही. त्यामुळे असंख्य डीएड व बीएड पात्रताधारक विद्यार्थी बेरोजगार आहेत. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. शिक्षणमंत्र्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून भरती प्रक्रिया तत्काळ राबवावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.निवेदन देतेवेळी स्पर्धा परीक्षा विद्यार्थी परिषदेचे आशीष रिंगोले, अभय राऊत, अनिल निम्मलवार, अमन युसूफ खान, गजानन चव्हाण, मनोज साबापुरे, ऋणेश बोरुले, अजय दुबे, अविनाश दिडशे, गणेश पोलचेट्टीवार, प्रतिक भगत, प्रफुल्ल रिंगोले, युवराज आडे, कैलास उलमाले, प्रशांत खरतडे, जगदीश मॅकलवार, अजय चौधरी, सागर भोयर, चेतन हांडे, श्रीकांत गोरे आदी विद्यार्थी उपस्थित होते.