शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

पोलीस भरतीच्या अग्निपरीक्षेला प्रारंभ

By admin | Updated: March 30, 2016 02:40 IST

रणरणत्या उन्हात यवतमाळात पोलीस भरतीप्रक्रियेला प्रारंभ झाला असून ३७ जागांसाठी तब्बल सहा हजार ६६ उमेदवार अग्नी परीक्षा देत आहे. ..

रणरणते ऊन्ह : ३७ जागांसाठी तब्बल सहा हजार उमेदवारयवतमाळ : रणरणत्या उन्हात यवतमाळात पोलीस भरतीप्रक्रियेला प्रारंभ झाला असून ३७ जागांसाठी तब्बल सहा हजार ६६ उमेदवार अग्नी परीक्षा देत आहे. या पोलीस भरतीसाठी राज्यभरातील तरुणांचे जत्थे यवतमाळात दाखल झाले असून नोकरीच्या आशेने जीव तोडून बेरोजगार धावत आहे. यवतमाळातील पळसवाडी कॅम्पमधील पोलीस मैदानात पोलीस भरती प्रक्रियेला प्रारंभ झाला. पहाटे ५.३० वाजतापासून या भरतीप्रक्रियेला प्रारंभ होत आहे. यात १०० मीटर धावणे, लांब उडी, गोळा फेक, मुलांसाठी १६०० मीटर, मुलींसाठी ८०० मीटर धावणे अपेक्षित आहे. दररोज ५०० विद्यार्थ्यांची चाचणी येथे घेतली जाणार आहे. तसेच संपूर्ण नियोजन पोलीस खात्याने केले आहे. त्यासाठी ३०० कर्मचारी आणि ५० अधिकारी नियुक्त केले आहे. यवतमाळ, अमरावती, नांदेड, बुलडाणा, अकोला, वर्धा, वाशिम, चंद्रपूरसह विविध ठिकाणचे उमेदवार येथे पोलीस भरतीसाठी आले आहे. पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून कुठलाही गैरप्रकार होऊ नये म्हणून दररोज अधिकाऱ्यांचे टेबल बदलविले जाणार आहे. भरती प्रक्रियेतील चार बाबी पळसवाडी कॅम्पच्या मैदानावर तर १६०० आणि ८०० मीटर धावण्यासाठी नेहरु स्टेडियमचा वापर करण्यात येणार आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे. त्यामुळे उन्हाचा तडाखा या उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे. पहाटेच्या दोन बॅच सोडल्या तर इतर बॅचला उन्हाचा तडाखा बसण्याची दाट शक्यता आहे. (शहर वार्ताहर)