शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
3
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
4
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
5
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
6
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
7
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
8
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
9
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
10
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
11
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
12
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
13
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
14
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
15
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
16
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
17
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
18
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
19
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
20
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त

एसटीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचा पाससाठी संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 06:07 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातून (एसटी) सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यांना बारमाही पाससाठी संघर्ष करावा लागत आहे.

यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातून (एसटी) सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यांना बारमाही पाससाठी संघर्ष करावा लागत आहे. आंध्रप्रदेश, गुजरात आणि कर्नाटक या शेजारील राज्यात कर्मचाºयांना मोफत पास मिळतो, मात्र महाराष्ट्रात विकत पाससाठीही भांडावे लागत आहे.महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या कामगारांना वर्षातून केवळ दोन महिन्यांचा पास नि:शुल्क दिला जातो. पती-पत्नीस बारमाही पास ५०० रुपयांत मिळावा, अशी या कामगारांची मागणी आहे. राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेने १२ वर्षांपासून ही मागणी रेटून धरली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी बारमाही पास देण्याविषयी तीन महिन्यांत अहवाल शासनाला सादर करावा, असे आदेश एसटीच्या उपमहाव्यवस्थापकांना दिले होते. अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांनीही त्यांचे सरकार असताना हा प्रश्न मार्गी लावला नाही.युती सरकारच्या मंत्रिमंडळातील तत्कालीन परिवहनमंत्री प्रमोद नवलकर यांनी दोन महिन्यांचा मोफत पास देण्याचा निर्णय घेतला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामगार संघटनेच्या नागपूर येथील अधिवेशनात पासच्या प्रश्नाविषयी विचार केला जाईल, असे जाहीर केले होते. एक हजार रुपयात पास देण्याबाबतचा अहवालही प्रशासनाने शासनाला सादर केला आहे. मात्र अद्याप याबाबत निर्णय झालेला नाही. विद्यमान सरकारकडून हा प्रश्न निकाली निघेल अशी आशा आहे, असे राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना (अमरावती)चे प्रादेशिक सचिव भास्कर भानारकर यांनी सांगितले.