शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

एसटीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचा पाससाठी संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 06:07 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातून (एसटी) सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यांना बारमाही पाससाठी संघर्ष करावा लागत आहे.

यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातून (एसटी) सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यांना बारमाही पाससाठी संघर्ष करावा लागत आहे. आंध्रप्रदेश, गुजरात आणि कर्नाटक या शेजारील राज्यात कर्मचाºयांना मोफत पास मिळतो, मात्र महाराष्ट्रात विकत पाससाठीही भांडावे लागत आहे.महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या कामगारांना वर्षातून केवळ दोन महिन्यांचा पास नि:शुल्क दिला जातो. पती-पत्नीस बारमाही पास ५०० रुपयांत मिळावा, अशी या कामगारांची मागणी आहे. राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेने १२ वर्षांपासून ही मागणी रेटून धरली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी बारमाही पास देण्याविषयी तीन महिन्यांत अहवाल शासनाला सादर करावा, असे आदेश एसटीच्या उपमहाव्यवस्थापकांना दिले होते. अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांनीही त्यांचे सरकार असताना हा प्रश्न मार्गी लावला नाही.युती सरकारच्या मंत्रिमंडळातील तत्कालीन परिवहनमंत्री प्रमोद नवलकर यांनी दोन महिन्यांचा मोफत पास देण्याचा निर्णय घेतला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामगार संघटनेच्या नागपूर येथील अधिवेशनात पासच्या प्रश्नाविषयी विचार केला जाईल, असे जाहीर केले होते. एक हजार रुपयात पास देण्याबाबतचा अहवालही प्रशासनाने शासनाला सादर केला आहे. मात्र अद्याप याबाबत निर्णय झालेला नाही. विद्यमान सरकारकडून हा प्रश्न निकाली निघेल अशी आशा आहे, असे राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना (अमरावती)चे प्रादेशिक सचिव भास्कर भानारकर यांनी सांगितले.