शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

एसटीचे वेळापत्रक कोलमडले

By admin | Updated: October 25, 2015 02:23 IST

विद्यार्थी शाळेत वेळेवर पोहोचू शकत नाही. घरी जाण्यास उशीर होतो. नागरिकांना नाईलाजास्तव खासगी वाहनाचा आधार घ्यावा लागतो.

विद्यार्थी त्रस्त : ग्रामीण फेऱ्या रद्दचा आजार, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नियंत्रण नाहीयवतमाळ : विद्यार्थी शाळेत वेळेवर पोहोचू शकत नाही. घरी जाण्यास उशीर होतो. नागरिकांना नाईलाजास्तव खासगी वाहनाचा आधार घ्यावा लागतो. एकीकडे उत्पन्न नसल्याच्या बोंबा ठोकल्या जातात, तर दुसरीकडे अनेक फेऱ्या रद्द होतात. हा प्रकार केवळ वेळापत्रक कोलमडल्याने होत आहे. वरिष्ठांचा इतर अधिकारी आणि कामगारांवर वचकच राहिला नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचे बोलले जात आहे. यवतमाळसह जिल्ह्यातील जवळपास आगारांमध्ये हा प्रकार सुरू आहे. विशेषत: ग्रामीण भागातील फेऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. मनमानी काम सुरू असल्यामुळे ऐन वेळेवर फेऱ्या रद्द केल्या जातात. मर्जीतील लोकांना त्यांच्या सोयीनुसार ड्युटी दिली जात असल्याची ओरड अन्यायग्रस्त कामगारांमधून होत आहे. या दुजाभावातूनच कामगारांमध्ये असंतोष निर्माण होऊन शेड्युल रद्दचे प्रकार घडत आहे. याचा सर्वाधिक त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. मार्गावर उशिरा धावणाऱ्या बसेसेमुळे बहुतांश शाळांमधील विद्यार्थी पहिल्या तासिकेला मुकतात. एकीकडे शाळेच्या वेळेवरच बसेस सोडण्याची प्रथा सुरू झाली आहे. त्यातही उशीर होत असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होते. काही वेळा तर विद्यार्थी घरी पोहोचण्यासाठी बसेसची व्यवस्थाच रहात नाही. याशिवाय नागरिकांनाही या गंभीर प्रकाराला तोंड द्यावे लागते. गावासाठी बसफेरी असल्याचा विचार करून प्रतीक्षेत राहणाऱ्या नागरिकांना ऐनवेळी बसफेरी रद्द झाल्याचे सांगितले जाते. अशावेळी त्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. काही प्रसंगी तर ही वाहनेही उपलब्ध होत नाही. त्यामुळे मुक्कामाचीही वेळ त्यांच्यावर येते. याविषयी तक्रारीनंतरही नियोजन होत नाही. (वार्ताहर)