शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

एसटीचे अधिकारी बचाव ‘मिशन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 22:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : मानव विकासच्या बसेस जिल्ह्याबाहेर पाठवू नये, असे निर्देश पायदळी तुडविणाऱ्या एसटी अधिकाºयांची वरिष्ठांकडून पाठराखण ...

ठळक मुद्देप्रशासनाची दिशाभूल : मानव विकासच्या बसेस जिल्ह्याबाहेर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मानव विकासच्या बसेस जिल्ह्याबाहेर पाठवू नये, असे निर्देश पायदळी तुडविणाऱ्या एसटी अधिकाºयांची वरिष्ठांकडून पाठराखण सुरू आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनाही दिशाभूल करणारी माहिती पुरविली जात आहे. उमरखेड आणि पुसद आगाराने बाहेर जिल्ह्यात या बसेस पाठविल्या होत्या.ग्रामीण भागातील मुलींना बारावीपर्यंत शिक्षण घेणे शक्य व्हावे यासाठी गाव ते शाळा प्रवासासाठी मानव विकास कार्यक्रमांतर्गत एसटी महामंडळाला बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. जिल्ह्यातील नऊ तालुक्यांसाठी प्रती तालुका सात याप्रमाणे ६३ बसेस आहेत. या बसेस जिल्ह्याबाहेर पाठविल्या जाऊ नये, असे निर्देश देण्यात आले आहे. तरीही महामंडळाच्या काही आगारातून हे निर्देश पाळले जात नाही.उमरखेड आगाराने १९ जानेवारी २०१९ रोजी एम.एच.४०/क्यू-६०९३ ही बस अकोलासाठी पाठविली. मारवाडी फाटा येथे या बसची तपासणी करण्यात आली. तत्पूर्वी २१ एप्रिल २०१८ रोजी पुसद आगाराची एम.एच.०७/९४३८ या क्रमांकाची मानव विकासची बस औंढानागनाथ (जि.परभणी) येथे पाठविली. मार्गात बाराशीव फाट्यावर ही बस अपघातग्रस्त झाली. यात १३ प्रवासी जखमी झाले होते. एवढेच नव्हे तर, ही बस निकाली झाली आहे. मानव विकास कार्यक्रमांच्या सूचनांचा भंग करून या बसेस जिल्ह्याबाहेर पाठविल्या गेल्या.सदर प्रकरणी जिल्हाधिकारी तथा जिल्हा मानव विकास समितीचे अध्यक्ष डॉ. राजेश देशमुख यांनी विभाग नियंत्रकांना पत्र पाठवून खुलासा मागविला. जिल्ह्याबाहेर बस पाठविणाºया आगार व्यवस्थापकांवर कारवाई करण्याची सूचना केली. मात्र संबंधितांवर कारवाई करण्यात आली नाही. उलट त्यांची पाठराखण करण्यात आली. पुसद आगार प्रकरणात आगार व्यवस्थापकाला पदावनत केल्याचा अहवाल पाठविण्यात आला. वास्तविक याठिकाणी आगार व्यवस्थापकच नव्हते. एका अधिकाऱ्याकडे प्रभार होता. अशावेळी पदावनत कुणाला करण्यात आले हा प्रश्न आहे. उमरखेड प्रकरणात कारवाई सुरू आहे. खोटी माहिती पुरविणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई होते, याकडे सर्व एसटी कामगारांचे लक्ष लागले आहे.न्यायालयाचा आदेशमानव विकास बसेसचा गैरवापर थांबविण्याबाबत २०१७ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. या बसेसचा योग्य वापर व्हावा आणि मानव विकास मिशनच्या सूचनांचा भंग करू नये, असा आदेश न्यायालयाने दिला होता, मात्र याचे पालन केले जात नाही.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ