शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

एसटी चालक-वाहकांना ‘काम नाही तरी मिळणार दाम’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 01:44 IST

नियमित कामगारांच्या सुट्यांवरील संकट टळले

ठळक मुद्देकोरोना प्रादुर्भाव मागील एक महिन्यापासून पुन्हा वाढत चालला आहे. लॉकडाऊन, संचारबंदी लागू करण्यात येत आहे. शनिवार संध्याकाळ ते सोमवार सकाळपर्यंत सर्वत्र सन्नाटा असतो

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनामुळे ‘काम नाही, तर दाम नाही’ धोरण राबवणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) काही विभागांतील नियमित चालक-वाहकांसाठी यात थोडी ढील देण्याचा निर्णय घेतला आहे. काम मिळाले नाही, तरी त्यांना पगार दिला जाणार आहे. यायोगे त्यांच्या सुट्यांवरील संकट टळले आहे.

कोरोना प्रादुर्भाव मागील एक महिन्यापासून पुन्हा वाढत चालला आहे. लॉकडाऊन, संचारबंदी लागू करण्यात येत आहे. शनिवार संध्याकाळ ते सोमवार सकाळपर्यंत सर्वत्र सन्नाटा असतो. प्रवासी फिरकत नसल्याने एसटीच्या अनेक बसफेऱ्या रद्द होत आहेत. बसफेऱ्या रद्द झाल्याने बहुतांश नियमित चालक-वाहकांना काम मिळत नाही. परिणामी, त्यांना सुटी टाकून घरी जावे लागते. नियमित कर्मचाऱ्यांना वर्षभरात ४० दिवसांच्या पगारी सुट्या आहेत. कामावर येऊनही कामगिरी न मिळाल्यास या ४० दिवसांच्या सुट्या संपल्यास पुढील सुट्या बिनपगारी होतात. यात या कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. ही बाब टाळण्यासाठी कामगिरी मिळाली नसली तरी, त्यांना पगार दिला जाणार आहे.

महामंडळाच्या अमरावती प्रदेशातील अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ आणि नागपूर प्रदेशातील वर्धा विभागात फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून प्रवाशांची वर्दळ अत्यल्प आहे. शिवाय चंद्रपूर, गडचिरोली या विभागातही गरजेनुसार बसफेऱ्या सोडण्याचे नियोजन केले. यामुळे चालक आणि वाहकांना कामगिरीवर उपस्थित राहूनही काम मिळाले नाही. त्यामुळे काही कर्मचाऱ्यांना विनाकामगिरी राहावे लागले.

प्रशासनाने स्वत:हून वाहतूक बंद ठेवल्यास उपस्थित असूनही कामगिरी न मिळालेल्या चालक-वाहकांना हजेरी देण्याची तरतूद कामगार करारात आहे. त्याचे पालन काही ठिकाणी होत नाही. अमरावती आणि नागपूर प्रदेशातील नियमित चालक-वाहकांना हजेरी मिळणार आहे.- राहुल धार्मिक, यवतमाळ विभागीय सचिव, एसटी कामगार संघटना.

टॅग्स :Bus DriverबसचालकYavatmalयवतमाळ