शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

एसटी चालक-वाहकांना ‘काम नाही तरी मिळणार दाम’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 01:44 IST

नियमित कामगारांच्या सुट्यांवरील संकट टळले

ठळक मुद्देकोरोना प्रादुर्भाव मागील एक महिन्यापासून पुन्हा वाढत चालला आहे. लॉकडाऊन, संचारबंदी लागू करण्यात येत आहे. शनिवार संध्याकाळ ते सोमवार सकाळपर्यंत सर्वत्र सन्नाटा असतो

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनामुळे ‘काम नाही, तर दाम नाही’ धोरण राबवणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) काही विभागांतील नियमित चालक-वाहकांसाठी यात थोडी ढील देण्याचा निर्णय घेतला आहे. काम मिळाले नाही, तरी त्यांना पगार दिला जाणार आहे. यायोगे त्यांच्या सुट्यांवरील संकट टळले आहे.

कोरोना प्रादुर्भाव मागील एक महिन्यापासून पुन्हा वाढत चालला आहे. लॉकडाऊन, संचारबंदी लागू करण्यात येत आहे. शनिवार संध्याकाळ ते सोमवार सकाळपर्यंत सर्वत्र सन्नाटा असतो. प्रवासी फिरकत नसल्याने एसटीच्या अनेक बसफेऱ्या रद्द होत आहेत. बसफेऱ्या रद्द झाल्याने बहुतांश नियमित चालक-वाहकांना काम मिळत नाही. परिणामी, त्यांना सुटी टाकून घरी जावे लागते. नियमित कर्मचाऱ्यांना वर्षभरात ४० दिवसांच्या पगारी सुट्या आहेत. कामावर येऊनही कामगिरी न मिळाल्यास या ४० दिवसांच्या सुट्या संपल्यास पुढील सुट्या बिनपगारी होतात. यात या कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. ही बाब टाळण्यासाठी कामगिरी मिळाली नसली तरी, त्यांना पगार दिला जाणार आहे.

महामंडळाच्या अमरावती प्रदेशातील अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ आणि नागपूर प्रदेशातील वर्धा विभागात फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून प्रवाशांची वर्दळ अत्यल्प आहे. शिवाय चंद्रपूर, गडचिरोली या विभागातही गरजेनुसार बसफेऱ्या सोडण्याचे नियोजन केले. यामुळे चालक आणि वाहकांना कामगिरीवर उपस्थित राहूनही काम मिळाले नाही. त्यामुळे काही कर्मचाऱ्यांना विनाकामगिरी राहावे लागले.

प्रशासनाने स्वत:हून वाहतूक बंद ठेवल्यास उपस्थित असूनही कामगिरी न मिळालेल्या चालक-वाहकांना हजेरी देण्याची तरतूद कामगार करारात आहे. त्याचे पालन काही ठिकाणी होत नाही. अमरावती आणि नागपूर प्रदेशातील नियमित चालक-वाहकांना हजेरी मिळणार आहे.- राहुल धार्मिक, यवतमाळ विभागीय सचिव, एसटी कामगार संघटना.

टॅग्स :Bus DriverबसचालकYavatmalयवतमाळ