शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

एसटी चालक मोबाईलवर प्रवाशांचा जीव धोक्यात

By admin | Updated: February 2, 2015 23:14 IST

चालत्या वाहनांमध्ये चालक भ्रमणध्वनीवर बोलत असल्याने प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. या प्रकारामुळे अपघाताचीही शक्यता वाढली आहे़

वणी : चालत्या वाहनांमध्ये चालक भ्रमणध्वनीवर बोलत असल्याने प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. या प्रकारामुळे अपघाताचीही शक्यता वाढली आहे़महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने बस चालक व वाहकांना कर्तव्यावर असताना मोबाईल वापरण्यावर बंदी घातली आहे. इतरही वाहनधारकांना वाहन चालविताना मोबाईल वापरण्यास बंदी आहे. मात्र या बंदीचा सर्वत्र फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे़ सध्या प्रत्येकाकडे मोबाईल आला आहे. त्यात बस चालक आणि वाहकही सीमील आहेत. मोबाईल ही अत्यावश्यक वस्तू झाली आहे. त्यामुळे बहुतांश नागरिकांजवळ मोबाईल दिसतो. मात्र बस चालक अथवा इतर वाहनधारकांना हा मोबाईल काळ ठरू शकतो. सोबतच वाहनांतील प्रवाशांच्या जीवालाही धोका पोहोचू शकतो.वाहन चालविताना एखाद्याचा भ्रमणध्वनी आला, तर चालक एका हातात स्टेअरिंग व दुसऱ्या हातात मोबाईल धरून वाहन चालविताना सर्रास दिसतात. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे़ त्याचबरोबर चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यास अपघाताचीही शक्यता बळाली आहे. शासनाने बस चालक व वाहकांना मोबाईल वापरण्यास बंदी घातली. मात्र चालक व वाहक मोबाईलवर संपर्क साधताना सर्व प्रवाशांना दिसतात. याबाबत एसटीच्या एका वाहकाला विचारणा केली असता, जर बस तपासणी पथक संबंधित मार्गावर आले, तर दुसरा बस चालक आम्हाला कळवितो़ त्यासाठी आम्ही मोबाईलचा वापर करतो, असे सांगण्यात आले. यावरून काही वाहक प्रवाशांकडून पैसे घेऊन त्यांना तिकीट देत नसावे, अशी शंका व्यक्त होत आहे. या बाबीची खातरजमा करण्याची गरज आहे. त्यातून खरा प्रकार उघड होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे सुरक्षित प्रवासासाठी बहुतांश प्रवासी बसने प्रवास करतात. मात्र बस चालक खुलेआम वाहन चालविताना मोबाईलवर बोलत असल्याने प्रवासी धास्तीत सापडले आहे. त्यांच्या मोबाईलवरील बोलण्यामुळे यापुढे बसने प्रवास करावा की नाही, असा प्रश्न प्रवाशांसमोर उभा ठाकला आहे़ (कार्यालय प्रतिनिधी)