शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

दिग्रस येथील एसटी बसस्थानक परिसर बनला समस्यांचे माहेरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 00:05 IST

शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून दिग्रस येथे बसस्थानक व आगाराची निर्मिती केली. परंतु सध्या हे बसस्थानक समस्यांनी ग्रासलेले आहेत. या परिसरात ठिकठिकाणी खड्डे पडले. त्यात पावसाचे पाणी साचून गटार झाले आहे. त्यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : दररोज हजारो नागरिकांची वर्दळ असलेले येथील बसस्थानक माहेरघर बनले आहे. बसस्थानकाच्या परिसरात आणि प्रवेशद्वारातही खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यात आता पाण्याचे डबके साचल्याने प्रवाशांंसह बसचालक व वाहकांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे संबंधित अधिकारी मात्र दुर्लक्ष करीत आहे.शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून दिग्रस येथे बसस्थानक व आगाराची निर्मिती केली. परंतु सध्या हे बसस्थानक समस्यांनी ग्रासलेले आहेत. या परिसरात ठिकठिकाणी खड्डे पडले. त्यात पावसाचे पाणी साचून गटार झाले आहे. त्यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे. दिग्रस आगारात भंगार बस, जीर्ण बस असून सदर बसनेच प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. नियमित वेळेवर बस न सोडण्याचा पराक्रम येथील प्रशासन गाजवित आहे. त्याचा फटका मात्र ग्रामीण प्रवाशांना बसत आहे. बसस्थानक परिसरात अनेक सोई-सुविधांचा अभाव असून याकडे अधिकारी, लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत आहे.गेल्या काही वर्षांपासून येथे खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. डांबरीकरण उखडल्याने खड्ड्यात पाण्याचे डबके साचले. येथील विद्युत खांबावर लाईट आहे पण ते सतत बंद असतात.त्यामुळे रात्रीच्या वेळी बसस्थानकात अंधाराचाच मुक्काम असतो. अंधारात बसूनच काही प्रवाशांना बसची प्रतीक्षा करावी लागते. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर अतिशय गंभीर बनला आहे. अधिकारीही याकडे लक्ष देत नसल्याने समस्या जैसे थे आहे. बसस्थानकात सुधारणा करण्याची मागणी केली जात आहे.

टॅग्स :state transportएसटी