शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दिग्रस येथील एसटी बसस्थानक परिसर बनला समस्यांचे माहेरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 00:05 IST

शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून दिग्रस येथे बसस्थानक व आगाराची निर्मिती केली. परंतु सध्या हे बसस्थानक समस्यांनी ग्रासलेले आहेत. या परिसरात ठिकठिकाणी खड्डे पडले. त्यात पावसाचे पाणी साचून गटार झाले आहे. त्यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : दररोज हजारो नागरिकांची वर्दळ असलेले येथील बसस्थानक माहेरघर बनले आहे. बसस्थानकाच्या परिसरात आणि प्रवेशद्वारातही खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यात आता पाण्याचे डबके साचल्याने प्रवाशांंसह बसचालक व वाहकांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे संबंधित अधिकारी मात्र दुर्लक्ष करीत आहे.शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून दिग्रस येथे बसस्थानक व आगाराची निर्मिती केली. परंतु सध्या हे बसस्थानक समस्यांनी ग्रासलेले आहेत. या परिसरात ठिकठिकाणी खड्डे पडले. त्यात पावसाचे पाणी साचून गटार झाले आहे. त्यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे. दिग्रस आगारात भंगार बस, जीर्ण बस असून सदर बसनेच प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. नियमित वेळेवर बस न सोडण्याचा पराक्रम येथील प्रशासन गाजवित आहे. त्याचा फटका मात्र ग्रामीण प्रवाशांना बसत आहे. बसस्थानक परिसरात अनेक सोई-सुविधांचा अभाव असून याकडे अधिकारी, लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत आहे.गेल्या काही वर्षांपासून येथे खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. डांबरीकरण उखडल्याने खड्ड्यात पाण्याचे डबके साचले. येथील विद्युत खांबावर लाईट आहे पण ते सतत बंद असतात.त्यामुळे रात्रीच्या वेळी बसस्थानकात अंधाराचाच मुक्काम असतो. अंधारात बसूनच काही प्रवाशांना बसची प्रतीक्षा करावी लागते. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर अतिशय गंभीर बनला आहे. अधिकारीही याकडे लक्ष देत नसल्याने समस्या जैसे थे आहे. बसस्थानकात सुधारणा करण्याची मागणी केली जात आहे.

टॅग्स :state transportएसटी