शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

एसटीचे केवळ पुणेसाठीच बुकिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 05:00 IST

परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागाने पुणे येथे परतीच्या प्रवासाकरिता आधीच बसेसची व्यवस्था करून ठेवली आहे. दरवर्षी गर्दीचा अनुभव पाहता  ही सोय करण्यात आली असली तरी कोरोनामुळे खूप प्रवासी मिळत नसल्याचे सांगितले जाते. पुणे येथून यवतमाळला येण्यासाठीही महामंडळाने जादा बसेसची सोय केली होती. यवतमाळसह मार्गात असलेल्या थांब्यावरील प्रवासीही या माध्यमातून एसटीला मिळत आहे. गेली काही महिन्यांपासून एसटीची आर्थिक बाजू कमकुवत झाली आहे. 

ठळक मुद्देकोरोनाची भीती : दिवाळीला आलेल्या पाहुण्यांचा परतीचा प्रवास

n  लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दिवाळी संपल्यानंतर गावी परत जाण्यासाठी पाहुण्यांची धावपळ सुरू झाली आहे. तशी प्रवासाकरिता गर्दी नसली तरी सोईसाठी म्हणून जागांचे आरक्षण करून ठेवले जात आहे. यवतमाळ येथून गावी जाण्यासाठी केवळ पुणेकरिताच आरक्षण केले जात आहे. दररोज ३० ते ३५ प्रवाशांचे बुकिंग होत असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागाने पुणे येथे परतीच्या प्रवासाकरिता आधीच बसेसची व्यवस्था करून ठेवली आहे. दरवर्षी गर्दीचा अनुभव पाहता  ही सोय करण्यात आली असली तरी कोरोनामुळे खूप प्रवासी मिळत नसल्याचे सांगितले जाते. पुणे येथून यवतमाळला येण्यासाठीही महामंडळाने जादा बसेसची सोय केली होती. यवतमाळसह मार्गात असलेल्या थांब्यावरील प्रवासीही या माध्यमातून एसटीला मिळत आहे. गेली काही महिन्यांपासून एसटीची आर्थिक बाजू कमकुवत झाली आहे. दिवाळीची गर्दी कॅश करण्यासाठी यवतमाळ विभागाने बहुतांश मार्गावर आवश्यक तेवढ्या बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. शिवाय ग्रामीण भागातही प्रवासी संख्या वाढल्यास बसफेऱ्या सोडण्यात येत आहे. यासाठी नियोजन केले आहे.

नागपूर, अमरावतीकडे अधिक बसफेऱ्यायवतमाळातून नागपूर आणि अमरावतीकरिता प्रवास करणाऱ्यांची संख्या नेहमीच अधिक राहिली आहे. दिवाळी सुटीनिमित्त प्रवास करणाऱ्यांची यामध्ये भर पडली आहे.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी वाढू नये याकरिता अधिक बसेस सोडण्याचा प्रयत्न यवतमाळ विभागाचा राहिला आहे. अकोला, नांदेडसाठीही अधिक फेऱ्या आहेत.

ग्रामीण नागरिकही रोजगाराच्या ठिकाणी दिवाळीनिमित्त आपल्या गावाकडे आलेले ग्रामीण भागातील नागरिकही रोजगाराच्या ठिकाणी जायला निघाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रवाशांची गर्दीही नेहमीपेक्षा अधिक वाढत आहे. अशावेळी ग्रामीण भागाकरिताही आवश्यक तेवढ्या फेऱ्या सोडण्याचे नियोजन एसटीने केले. कोविडचे नियम पाळून वाहतूक करण्याचा प्रयत्न आहे. 

खाजगी ट्रॅव्हल्सना मिळत आहे संमिश्र प्रतिसादएसटी महामंडळाच्या लालपरी सोबतच नागरिक खासगी ट्रॅव्हल्सनेही प्रवास करीत आहे. ट्रॅव्हल्सला शासनाने अलिकडेच पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतुकीला परवानगी दिली आहे. त्यामुळे ही वाहने आता रस्त्यावर दिसू लागली आहे. यवतमाळ येथून सद्यस्थितीत दहा ते बारा खासगी ट्रॅव्हल्स पुणेसाठी धावत आहे. वैयक्तिक वाहनांना पसंतीएसटी किंवा ट्रॅव्हल्सने प्रवास करणे बहुतांश नागरिक टाळत असल्याचे दिसून येत आहे. खासगी वाहनांद्वारे प्रवास करण्याकडे त्यांचा कल आहे. चारचाकी, दुचाकीद्वारे प्रवास करणे सुरक्षित मानले जात आहे. या वाहनांच्या विक्रीतही मागील काही काळात वाढ झाली आहे. एका दुचाकीवर दोन जण प्रवास करीत आहे. गर्दीतून प्रवास करण्यापेक्षा खासगी वाहनांद्वारे प्रवास करणाऱ्यांची संख्या अलिकडे वाढली आहे. 

 

टॅग्स :state transportएसटी