शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
3
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
4
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
5
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
6
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
7
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
8
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
9
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
10
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
11
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
12
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
13
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
14
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
15
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
16
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
17
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
18
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
19
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
20
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट

पूरसंरक्षक निधी केला शाळेच्या भिंतीवर खर्च

By admin | Updated: November 2, 2014 22:41 IST

महागाव तालुक्यातील पोहंडूळ येथे गेल्या काही महिन्यांपूर्वी बांधकाम विभागाकडून वेगळाच प्रकार करण्यात आला. ग्रामपंचायतीच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या पूरसंरक्षण भिंतीच्या

धनोडा : महागाव तालुक्यातील पोहंडूळ येथे गेल्या काही महिन्यांपूर्वी बांधकाम विभागाकडून वेगळाच प्रकार करण्यात आला. ग्रामपंचायतीच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या पूरसंरक्षण भिंतीच्या निधीचा गैरवापर करण्यात आला. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठांनीच आपल्या फायद्यासाठी हा प्रकार घडवून आणल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीत केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग यवतमाळ, पुसद, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग अमरावती, विभागीय आयुक्त आदी सर्वांना या संदर्भात निवेदने पाठविली असली तरी याबाबत कोणतीही दखल अद्याप घेण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य अतुल बावणे यांच्यासह नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. पोहंडूळ येथील नाल्याच्या पूरसंरक्षक भिंतीचा निधी चक्क शाळेच्या संरक्षण भिंतीवर खर्च करण्यात आला. या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतरही ही चौकशी नंतर कुठे दडपण्यात आली हे कळायला मार्ग नाही. महागाव तालुक्यातील ज्या ज्या गावांना नदीपासून धोका आहे अशा गावांसाठी शासनाने संरक्षक भिंत बांधण्यासाठी निधी मंजूर केला. परंतु यामध्येही गैरप्रकार झाला. पोहंडूळ येथील संरक्षक भिंतीचा निधी इतरत्र वळविण्यात आला. हा निधी कुणाच्या आदेशावरून वळविण्यात आला हे कळायला मार्ग नाही. ज्या गावांना नदी-नाल्यांचा धोका आहे अशा गावांसाठी पूरसंरक्षक भिंत बांधकामासाठी महसूल व पुनर्वसन विभागाने ग्रामपंचायतीच्यावतीने ठराव पाठवावा, असे शासनाचे निर्देश होते. यानुसार कारवाई होऊन अनेक गावातील नाल्यांवर पूरसंरक्षक भिंत बांधकाम करण्यात आले. मात्र पोहंडूळ येथे तसे घडले नाही. गावाशेजारी नाल्यावर संरक्षक भिंत असावी म्हणून ग्रामपंचायतीने ठराव घेतला. त्यासाठी २०१३-१४ मध्ये १५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. दरम्यान हा निधी खर्च करण्याची अंतिम तारीख १५ एप्रिल २०१४ होती. परंतु हा निधी नाल्याच्या भिंतीवर खर्च न होता इतरत्र वळविण्यात आला. ही भिंतच बांधली न गेल्यामुळे नागरिकांना पाण्याचा धोका कायम आहे. उल्लेखनीय म्हणजे या कामाचे मोजमाप करण्यासाठी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता स्वत: उपस्थित होते. हा प्रकार लक्षात येताच ग्रामपंचायत सदस्य अतुल बावणे यांनी बांधकाम विभागाकडे तक्रारी केल्या. परंतु त्यांच्या तक्रारीची दखलच घेतल्या गेली नाही. अखेरीस जिल्हाधिकाऱ्यांकडेही यासंदर्भात तक्रार करण्यात आली आहे. प्रशासनाने या प्रकरणाची त्वरित दखल घेऊन दोषींवर कारवाई न केल्यास याचा कायदेशीर मार्गाने पाठपुरावा करणार असल्याचे अतुल बावणे यांनी सांगितले आहे. (वार्ताहर)