शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

राष्ट्रीय महामार्गालगत टाकले ‘स्पेंट वॉश’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 05:00 IST

डिस्टलरी कारखान्याने दूषित पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी ईटीपीची निर्मिती करणे अनिवार्य आहे. परंतु तालुक्यातील गुंज येथील एक प्लांट मागील अनेक वर्षांपासून नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे. दरवर्षी भर पावसाळ्यात हे दूषित पाणी जागा मिळेल तेथे टाकले जात आहे. हेच दूषित पाणी नदी, नाल्यांमध्ये मिसळते. त्यामुळे नदी व नाल्यातील जीवजंतुसुद्धा नष्ट होण्याची शक्यता आहे. हे स्पेंट वॉश गुराढोरांच्या पिण्यात गेल्यास दगावण्याची शक्यता बळावली आहे.

ठळक मुद्दे महागाव तालुक्यात आरोग्य धोक्यात : पर्यावरणालाही निर्माण झाला धोका

ज्ञानेश्वर ठाकरे लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : राष्ट्रीय महामार्गालगत ई-क्लास आणि ‘एनएएच’च्या हद्दीत दिवसाढवळ्या पर्यावरणाला हानिकारक स्पेंट वॉश सांडवा वाहत आहे. एका डिस्टलरी कारखान्याकडून अनेक वर्षांपासून दूषित पाण्याचा सांडवा वाहत आहे. मात्र, या संदर्भात पर्यावरण विभागाला कोणतेही सोयरसुतक नाही.डिस्टलरी कारखान्याने दूषित पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी ईटीपीची निर्मिती करणे अनिवार्य आहे. परंतु तालुक्यातील गुंज येथील एक प्लांट मागील अनेक वर्षांपासून नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे. दरवर्षी भर पावसाळ्यात हे दूषित पाणी जागा मिळेल तेथे टाकले जात आहे. हेच दूषित पाणी नदी, नाल्यांमध्ये मिसळते. त्यामुळे नदी व नाल्यातील जीवजंतुसुद्धा नष्ट होण्याची शक्यता आहे. हे स्पेंट वॉश गुराढोरांच्या पिण्यात गेल्यास दगावण्याची शक्यता बळावली आहे.सबंधित डिस्टलरी कारखान्यावर पर्यावरण विभागाने योग्य ती कारवाई करावी, अशी जनभावना आहे. पर्यावरणाला घातक असलेले द्रव्य स्वरूपातील स्पेंट वॉश शासकीय ई-क्लास  आणि राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीत टँकरच्या साहाय्याने टाकले जाते. गुंज परिसरात असलेल्या कारखान्यात उसापासून तयार होणाऱ्या मोल्यासिसपासून कच्या इथेनॉलची निर्मिती केली जाते. त्यापासून मोठ्या प्रमाणात अल्कोहोल व सॅनिटायझर तयार केले जाते. हे सर्व ज्वालाग्राही रसायन विविध केमिकल वापरून बनवले जाते. या मोल्यासीसचे रूपांतरण द्रव्य स्वरूपातील स्पेंट वॉशमध्ये होते. त्यामुळे परिसरात दुर्गंधीही पसरली आहे.

हा खेळ किती दिवस?सध्या खरीप हंगाम सुरू असून, लागवडीची लगबग सुरू आहे. त्यामुळे शेतशिवारात मोठ्या प्रमाणात मजूर काम करीत आहेत. या दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे मजुरांना काम करणेही कठीण झाले आहे. डिस्टलरीचा हा अतिरेक आणखी किती दिवस चालेल व किती लोकांचे बळी घेणार? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

या संदर्भात सखोल माहिती घेऊन तक्रार असलेल्या ठिकाणी स्पेंट वॉश टाकणे त्वरित बंद करू. आम्ही मागणीनुसार शेतकऱ्यांना खत म्हणून त्यांची परवानगी घेऊन स्पेंट वॉश टाकत असतो. परंतु महामार्गालगत टाकण्यात आल्याबद्दल माहिती नाही.- रमेशकुमार शर्माजनरल मॅनेजर, डिस्टलरी प्लांट, गुंज

टॅग्स :environmentपर्यावरण