शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

दिग्रस तालुक्यात कृषी विभागाची विशेष मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 05:00 IST

सोयाबीन सवंगणीनंतर भिजणार नाही. तसेच थ्रेशरचा वापर करताना निम्मा वेग (४५० आरपीएम) किंवा कमी दाबाने मळणी करावी, साठवणुकीचे पोते स्वच्छ व कोरडे असावे, आर्द्रता ९ ते १२ टक्के राहील याची खात्री करावी, पोते भिंतीपासून दूर लाकडी पाटीवर एकावर एक केवळ तीन पोतेच हवेशीर व कोरड्या जागेत ठेवावे, असे आवाहन करण्यात आले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना मार्गदर्शन, पुढील हंगामासाठी सोयाबीन बियाण्याची निर्मिती, गावोगावी जनजागृती कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : तालुक्यात कृषी विभागाने पुढील हंगामासाठी सोयाबीन बियाणे राखून ठेवण्याकरिता विशेष मोहीम सुरू केली आहे. पुढील वर्षी सोयाबीन बियाण्याची टंचाई होण्याची शक्यता लक्षात घेऊन कृषी विभागाने ही मोहीम सुरू केली.सध्या सोयाबीन काढणीला सुरुवात झाली आहे. यावर्षी अनेक शेतकऱ्यांना बियाणे मिळाले नाही. हीच स्थिती पुढील वर्षी कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील खरीप हंगामात शेतकऱ्यांना घरचेच सोयाबीन बियाणे वापरता यावे, याकरिता तालुका कृषी अधिकारी एस.एस. राजपुत यांच्या मार्गदर्शनात कृषी विभागाने विशेष मोहीम सुरू केली. यात सोयाबीन बियाणे निर्मिती, काढणी आणि साठवणूक करताना घ्यावयाची काळजी याबाबत मोख, गांधीनगर, विठोली, लाखरायाजी येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.सोयाबीन सवंगणीनंतर भिजणार नाही. तसेच थ्रेशरचा वापर करताना निम्मा वेग (४५० आरपीएम) किंवा कमी दाबाने मळणी करावी, साठवणुकीचे पोते स्वच्छ व कोरडे असावे, आर्द्रता ९ ते १२ टक्के राहील याची खात्री करावी, पोते भिंतीपासून दूर लाकडी पाटीवर एकावर एक केवळ तीन पोतेच हवेशीर व कोरड्या जागेत ठेवावे, असे आवाहन करण्यात आले. या अभियानात मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, आत्माचे कर्मचारी, शेतकरी मित्र शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहे. गावोगावी शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी घरचेच सोयाबीन बियाणे राखून ठेवण्याचे आवाहन केले आहे.रोगट व चुकीची झाडे उपटावीपुढील हंगामासाठी सोयाबीन बियाणे तयार करताना प्रथमच शेतातील रोगट आणि चुकीची झाडे उपटून काढावी. शेवटच्या फवारणीला आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर करावा, गरजेनुसार शेतकऱ्यांनी क्षेत्र निश्चित करून तेथीलच पिकाचे बियाणे राखून ठेवावे. याशिवाय पुढील हंगामापर्यंत नेमकी कोणती काळजी घ्यावी याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे. पुढील हंगामात बियाणे उत्पादक कंपन्या बियाणे विक्रीकडे पाठ फिरवतील, असे लक्षात येत आहे. त्यामुळे कृषी विभागाने ही मोहीम सुरू केली आहे.बियाण्याच्या तुटवड्याची शक्यतापुढील हंगामात सोयाबीन बियाण्याच्या तुटवड्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घरचेच सोयाबीन बियाणे राखून ठेवणे आवश्यक झाले आहे. यावर्षी शेतकऱ्यांना चढ्या दराने बियाणे खरेदी करावे लागले. त्यातही निकृष्ट बियाण्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. यंदा घरीच बियाणे तयार केले जात आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती