शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

शासनाकडून शेतकऱ्यांची बोळवण

By admin | Updated: January 13, 2017 01:33 IST

विदर्भातील दुष्काळी परिस्थितीबाबत शासनाची उदासीनता आहे, शासन मदत करायला तयारच नसल्याने आपण न्यायालयात जनहित याचिका दाखल केली.

पत्रपरिषद : न्यायालयाच्या आदेशाचीही अंमलबजावणी नाहीयवतमाळ : विदर्भातील दुष्काळी परिस्थितीबाबत शासनाची उदासीनता आहे, शासन मदत करायला तयारच नसल्याने आपण न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. न्यायालयाच्या आदेशानंतरही शासनाकडून शेतकऱ्यांची बोळवण सुरू असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य देवानंद पवार यांनी पत्रपरिषदेत केला. न्यायालयात जनहित याचिका दाखल करून शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला स्थगिती द्यावी, विदर्भातील ११ हजार गावे दुष्काळी घोषित करावी, दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात सुट द्यावी, शेतकऱ्यांच्या कर्जपुनर्गठणाचा मार्ग मोकळा करावा आणि शेतकऱ्यांना दुष्काळी आर्थिक मदत करावी या महत्वपूर्ण मागण्या होत्या. न्यायालयाने याबाबत आदेश दिल्यानंतरही शासनाने याची योग्यरित्या अंमलबजावणी केली नव्हती. ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर न्यायालयाने शासनाला फटकारले आणि नंतर मात्र दोन मागण्या काही प्रमाणात पूर्ण केल्या. इतर मागण्यांना मात्र तिलांजली देत दिशाभूल केली आहे, ही बाबसुद्धा आपण न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊ, असेही देवानंद पवार म्हणाले. यासोबतच वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीची शासकीय भरपाई अत्यल्प आहे. याबाबत शासनाने होणाऱ्या पिकांच्या नुकसानीचा विमा काढावा, जेणेकरून शेतकऱ्यांचे नुकसान भरून निघेल, अशीही मागणी करणार असल्याचे पवार यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला काँग्रेसचे अरुण राऊत, दिनेश गोगरकर व किरण कुमरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)