शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

शासनाकडून शेतकऱ्यांची बोळवण

By admin | Updated: January 13, 2017 01:33 IST

विदर्भातील दुष्काळी परिस्थितीबाबत शासनाची उदासीनता आहे, शासन मदत करायला तयारच नसल्याने आपण न्यायालयात जनहित याचिका दाखल केली.

पत्रपरिषद : न्यायालयाच्या आदेशाचीही अंमलबजावणी नाहीयवतमाळ : विदर्भातील दुष्काळी परिस्थितीबाबत शासनाची उदासीनता आहे, शासन मदत करायला तयारच नसल्याने आपण न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. न्यायालयाच्या आदेशानंतरही शासनाकडून शेतकऱ्यांची बोळवण सुरू असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य देवानंद पवार यांनी पत्रपरिषदेत केला. न्यायालयात जनहित याचिका दाखल करून शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला स्थगिती द्यावी, विदर्भातील ११ हजार गावे दुष्काळी घोषित करावी, दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात सुट द्यावी, शेतकऱ्यांच्या कर्जपुनर्गठणाचा मार्ग मोकळा करावा आणि शेतकऱ्यांना दुष्काळी आर्थिक मदत करावी या महत्वपूर्ण मागण्या होत्या. न्यायालयाने याबाबत आदेश दिल्यानंतरही शासनाने याची योग्यरित्या अंमलबजावणी केली नव्हती. ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर न्यायालयाने शासनाला फटकारले आणि नंतर मात्र दोन मागण्या काही प्रमाणात पूर्ण केल्या. इतर मागण्यांना मात्र तिलांजली देत दिशाभूल केली आहे, ही बाबसुद्धा आपण न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊ, असेही देवानंद पवार म्हणाले. यासोबतच वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीची शासकीय भरपाई अत्यल्प आहे. याबाबत शासनाने होणाऱ्या पिकांच्या नुकसानीचा विमा काढावा, जेणेकरून शेतकऱ्यांचे नुकसान भरून निघेल, अशीही मागणी करणार असल्याचे पवार यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला काँग्रेसचे अरुण राऊत, दिनेश गोगरकर व किरण कुमरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)