शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
3
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
4
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
5
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
6
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
7
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
8
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
9
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
10
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
11
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
12
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
13
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
14
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
15
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
16
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
18
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
19
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
20
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!

२५ हजार हेक्टरमधील सोयाबीन उगवलेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 5:00 AM

पेरणीनंतर साधारणत: पाच दिवसात बियाणे अंकुरून कोंब फुटून ते जमिनीबाहेर यायला पाहिजे. परंतु अनेक शेतांमध्ये पेरणी होऊन आठवडा उलटला तरी कोंब फुटले नाही. या परिसरात पावसाचे प्रमाण कमी असले तरी जमिनीत असलेल्या ओलीच्या भरवशावर किमान कोंब जमिनीच्या बाहेर तरी यायला हवे होते. परंतु सोयाबीन न उगवल्याने शेतकऱ्यांनी जमीन उकरुन पाहिले असता काही दाणे सडले, काही मगरल्यासारखे दिसत आहे.

ठळक मुद्देदारव्हा तालुका : बियाणे बोगस, कृषी विभागाकडे तक्रारींचा पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : तालुक्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली. त्यात आता सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याचा प्रकार पुढे आला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संकटात आणखी भर पडली. नुकसानग्रस्त शेतांचे तत्काळ सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे. परिणामी कृषी अधिकारी थेट बांधावर धडकले आहे.तालुक्यात खरीप हंगामासाठी ६६ हजार १३५ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी कापूस पिकानंतर सर्वाधिक म्हणजेच जवळपास २५ हजार ८०० हेक्टरवर सोयाबीनची पेरणी केली जाते. यावर्षी मशागतीची कामे उरकल्यावर १५ जूननंतर मोठ्या प्रमाणात सोयबीनची पेरणी करण्यात आली. मात्र अनेक गावात बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे केल्या आहे. कापसाच्या तुलनेत कमी खर्च आणि बिगर कटकटीचे लवकर येणारे पीक म्हणून अलीकडे सोयाबीनच्या पेऱ्यात मोठी वाढ झाल्याचे दिसते. त्यामुळे बाजारात सोयाबीनच्या विविध कंपनीचे बियाणे उपलब्ध आहे. या बियाण्याला मागणी वाढत असल्याने यावर्षी भावात मोठी वाढ झाली. त्यात ठरावीक कंपनीच्या बियाण्याला जादा मागणी होती. त्यामुळे मध्यंतरी तुटवडा पडल्यामुळे काहींनी जादा भावात बियाणे विकत घेतले. त्याच कंपनीचे बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी जास्त प्रमाणात आहे.पेरणीनंतर साधारणत: पाच दिवसात बियाणे अंकुरून कोंब फुटून ते जमिनीबाहेर यायला पाहिजे. परंतु अनेक शेतांमध्ये पेरणी होऊन आठवडा उलटला तरी कोंब फुटले नाही. या परिसरात पावसाचे प्रमाण कमी असले तरी जमिनीत असलेल्या ओलीच्या भरवशावर किमान कोंब जमिनीच्या बाहेर तरी यायला हवे होते. परंतु सोयाबीन न उगवल्याने शेतकऱ्यांनी जमीन उकरुन पाहिले असता काही दाणे सडले, काही मगरल्यासारखे दिसत आहे. त्यामुळे बियाण्यांची उगवण क्षमताच कमी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सोयाबीन पेरणी करताना शेतीची मशागत व लागवडीला अंदाजे एकरी १० हजार रुपये खर्च येतो. जवळपास प्रत्येक शेतकरी सोयाबीनची पेरणी करतात. परंतु सोयाबीन न उगवल्यामुळे केलेला खर्च पाण्यात गेला आहे. आता हंगाम वाया जाऊ नये म्हणून काही शेतकऱ्यांनी कुणाचीही वाट न बघता दुबार पेरणीसुद्धा सुरू केली आहे.अनेक शेतकरी प्रशासनाकडून सर्वेक्षणाच्या प्रतीक्षेत आहे. काहींनी कृषी विभागाकडे सोयाबीन उगवले नसल्याची तक्रार केली. मात्र काही तक्रार असेल तर सर्वांनी तसा लेखी अर्ज देणे आवश्यक आहे. तेव्हाच शेतीचा पंचनामा होऊन दखल घेतली जाऊ शकते, असे सांगितले जाते.तक्रार निवारण समितीची स्थापनाबियाणे उगवण क्षमता, गुणवत्ता, या संदर्भात झालेल्या नुकसानासाठी तालुका स्तरावर तक्रार निवारण समितीची स्थापना करण्यात आली. ही समिती उपविभीय कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत आहे. तालुका कृषी अधिकारी, कृषी विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी तसेच इतर संबंधित अधिकाऱ्यांचा समितीत समावेश आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी समितीशी संपर्क साधून तक्रार करणे आवश्यक आहे.अधिकारी पोहोचले बांधावरसोयाबीन उगवले नसल्याची लेखी तक्रार प्राप्त झाल्यानंतर बुधवारी तालुका कृषी अधिकारी शेखर थोरात, पंचायत समितीचे कृषी अधिकारी राजीव शिंदे यांच्यासह मंडळ कृषी अधिकारी, कृषी विज्ञान केंद्राचे अधिकारी व इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी तक्रारीच्या अनुषंगाने पंचनामा करण्यात आला. याबाबत संयुक्त अहवाल तयार करण्यात येईल. त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे कृषी विभागातर्फे सांगितले जात आहे.

टॅग्स :agricultureशेती