शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन बियाणे पोहोचले आठ हजारांवर

By admin | Updated: May 20, 2014 23:57 IST

शेतकरी बाजारापेठेत माल विक्रीसाठी असो, की बियाणे खरेदीसाठी त्याची आर्थिक पिळवणूक निश्चित आहे. शेतकर्‍याचे सोयाबीन ३५०० रुपये दाराने खरेदी केले.

यवतमाळ : शेतकरी बाजारापेठेत माल विक्रीसाठी असो, की बियाणे खरेदीसाठी त्याची आर्थिक पिळवणूक निश्चित आहे. शेतकर्‍याचे सोयाबीन ३५०० रुपये दाराने खरेदी केले. आता त्याच शेतकर्‍यांना सोयाबीनच्या एक क्विटंल बियाण्यासाठी आठ हजार रुपये मोजावे लागत आहे. वाढलेल्या लागवड खर्चामुळे शेतकर्‍यांचे नियोजन कोलमडले आहे. बियाणे महामंडळाने शेतकर्‍यांकडून घेतलेल्या सोयाबीनची उगवण शक्ती कमी असल्यामुळे ६ हजार ५०० क्विंटल सोयाबीन बियाणे अप्रमाणित केले आहे. याशिवाय सोयाबीने बियाणे पावसामुळे खराब झाले आहे. अशा स्थितीत शेतकर्‍यांना सोयाबीनचे बियाणे मिळविताना चांगलीच कसरत करावी लागत आहे. यावर्षी बियाण्याचा भाव दुपटीने वाढला आहे. तीस किलोच्या बॅगसाठी शेतकर्‍यांना दोन हजार ४०० रुपये मोजावे लागत आहे. शेतकर्‍याचे सोयाबीन मात्र सुरूवातील केवळ तीन ते साडेतीन हजार रुपये दराने खरेदी केले. सोयाबीन बियाण्याच्या वाढलेल्या दराने शेतकर्‍याचे नियोजन कोलमडले आहे. बँकांनी कर्ज वाटप करताना सोयाबीनसाठी हात आखडता घेतला आहे. हेक्टरी २२ हजार रुपयांप्रमाणे कर्ज देण्यात येत आहे. एकरी आठ हजार ८०० रुपये शेतकर्‍यांना मिळणार आहे. सोयाबीनच्या एका एकराला केवळ लागवडीसाठी पाच हजार ४०० रुपये खर्च येणार आहे. यातही पावसाच्या अनियमिततेमुळे दुबार पेरणीचे संकट ओढावल्यास शेत पडीक ठेवण्याची वेळ शेतकर्‍यांवर आहे. कपाशीच्या तुलनेत कमी खर्च येत असल्याने शेतकर्‍यांची गेल्या काही वर्षात सोयाबीनवरच भिस्त आहे. मात्र आता यावर्षी सोयाबीन बियाण्याच्या दाराने शेतकर्‍यांना अडचणीत आणले आहे. कापसाचा एकरी लागवड खर्च अधिक असून त्या तुलनेत बाजार भाव मिळत नाही. शिवाय नैसर्गिक आपत्ती आल्यास होणारे नुकसानही प्रचंड असते. या पिकासाठी मजुराचीही मोठ्याप्रमाणात गरज भासते. यासर्व अडचणीला पर्याय म्हणून शेतकरी गेल्या काही वर्षात सोयाबीनच्या लागवडीकडे वळला होता. आता दुसरे कोणते पर्यायी पीक घ्यावे असा, प्रश्न शेतकर्‍यांसमोर निर्माण झाला आहे. बियाणे दरवाढ पहता जिल्हा मध्यवर्ती बँकेने कर्ज मर्यादा वाढविण्यासाठी २३ मे रोजी कर्ज समितीची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत सोयाबीनसाठी हेक्टरी २३ हजार तर कपसाकरिता ३२ हजार रुपये कर्ज देण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र राष्ट्रीयकृत बँकाकडून शेतकर्‍यांना कर्ज देतांना नियमात फेरबदल करण्यास तयार नाहीत. (कार्यालय प्रतिनिधी)