शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
3
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
4
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
5
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
6
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
7
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
8
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
9
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
10
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
11
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
12
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
13
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
14
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
15
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
16
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
17
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
18
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
19
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
20
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?

सोयाबीन बियाणे सौदे-बुकींग उलाढाल कोट्यवधीत; यवतमाळ जिल्ह्यात कृत्रिम टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 11:36 IST

एकीकडे यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांना बियाणे मिळत नाही, महागड्या दराने ते खरेदी करावे लागते तर दुसरीकडे सोयाबीन बियाणे कंपनीच्या गोदामांमधून थेट दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये नेऊन विकले जात आहे.

ठळक मुद्देमाल परस्पर जातो दुसऱ्या जिल्ह्यांमध्येशेतकऱ्यांवर घरचे बियाणे पेरण्याची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : प्रमुख वितरकांकडून सोयाबीन बियाण्यांच्या थेट कंपन्यांशी होणाऱ्या सौदे व बुकींगमध्येच कोट्यवधी रुपयांची ‘उलाढाल’ केली जाते. एकीकडे जिल्ह्यात शेतकऱ्यांना बियाणे मिळत नाही, महागड्या दराने ते खरेदी करावे लागते तर दुसरीकडे सोयाबीन बियाणे कंपनीच्या गोदामांमधून थेट दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये नेऊन विकले जात आहे.यवतमाळातील सोयाबीन बियाण्यांच्या प्रमुख वितरकांनी शेतकऱ्यांची लूट चालविली आहे. एवढेच नव्हे तर ‘रिटेलर’लाही (किरकोळ विक्रेते) मागणीच्या अर्धाच आणि तोही जादा दराने पुरवठा केला जात आहे. त्यातूनच या वितरकांच्या दरवर्षी चालणाऱ्या बियाण्यांच्या खरेदी-विक्री व्यवसायातील एकूणच ‘गौडबंगाल’ पुराव्यानिशी पुढे आले आहे. वितरक बियाणे कंपन्यांशी चार महिने आधीच सौदे करतात. त्यात एक हजार ते पाच हजार बॅगपर्यंत सौदे केले जातात. त्याचे ५० टक्के पेमेंटही लगेच दिले जाते. परंतु या सौद्याची ‘एमआरपी’ किती असावी हे वितरक निश्चित करतो. उर्वरित पैसे संपूर्ण माल प्राप्त झाल्यानंतर दिले जातात. यात प्रत्येक बॅगवर किमान ५०० ते ७०० रुपये मार्जीन वितरक निश्चित करतो व त्या पद्धतीनेच एमआरपी बॅगवर नोंदविली जाते.याशिवाय बियाण्यांचे बुकींग कंपनीकडे केले जाते. यात कंपनी दर निश्चित करते, मालाचा पुरवठाही कंपनीच्या सोईने होतो. यात बरेचदा कंपन्यांची मनमानी चालते. मागणीच्या ४० ते ६० टक्केच पुरवठा केला जातो. विशेष असे, बुकींग व सौद्यासाठी बहुतांश पैसा हा रिटेलरकडून उभा केला जातो. त्यात प्रमुख वितरकाची गुंतवणूक नाममात्र असते.सौदे व बुकींगच्या बियाण्यांची बरीच विल्हेवाट मात्र दुसऱ्या जिल्ह्यात लावली जाते. यवतमाळचे वितरक हिंगणघाट, चंद्रपूर, वर्धा, सोलापूर, नांदेड, हिंगोली, परभणी, दर्यापूर, कोपरगावपर्यंत बियाण्यांचा पुरवठा करतात. थेट कंपनीतूनच हा माल त्या-त्या जिल्ह्यात पाठविला जातो. पैसा मात्र यवतमाळच्या वितरकाकडे येतो. हा वितरक मग हा पैसा वापरुन तीन महिने विलंबाने बिल बनवितो. दुसऱ्या जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांचा माल पाठविता यावा यासाठी स्थानिक पातळीवर कृत्रिम टंचाई निर्माण केली जाते. रिटेलरला मागणीच्या अर्धा आणि तोही जादा दरात पुरवठा केला जातो. थेट शेतकरी आल्यास त्यालाही ५०० ते ७०० ची मार्जीन ठेऊन दर सांगितला जातो. टंचाई व त्यातून दर वाढल्याने आता शेतकऱ्यांवर उत्पादन क्षमता कमी असलेले घरचे बियाणे पेरण्याची वेळ आली आहे.

धामणगाव-पांढरकवडा रोड गोदामात साठायवतमाळचे सोयाबीन बियाणे विक्रेत्यांची धामणगाव रोड व पांढरकवडा रोडवर मोठी गोदामे असून तेथेच मोठा साठा आहे. तर दुसरीकडे कंपनीकडून अलॉटमेंट आलेच नाही, यावर्षी लॉकडाऊनमुळे कंपन्या पैश्यासाठी साईड देत नाहीत असे सांगून रिटेलर व शेतकऱ्यांसाठी कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे. अनेक ठिकाणी जिनिंगमधील गोदामात सोयाबीनचा साठा केला गेला आहे. पांढरकवडा रोडवर मोठ्या १६ गोदामांमध्ये हा साठा आहे. १६ टनच्या एका ट्रकमध्ये ५३३ बॅग भरुन हा माल रवाना केला जाणार आहे.

साठा हलविणार, जिल्हा प्रशासनाला हुलकावणी‘सोयाबीन बियाणे विक्रेत्यांची गोदामेच तपासा ना’ असे आव्हान ‘लोकमत’ने गुरुवारी वृत्तामधून जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यामुळे हादरलेल्या प्रमुख वितरकांनी गोदामांमधील माल हलविण्याचे नियोजन केले आहे. शुक्रवारी पहाटे ५ वाजता धामणगाव रोड व पांढरकवडा रोडवरील गोदामांवर ट्रक लावून हा माल दुसरीकडे हलविण्याचे प्लॅनिंग करण्यात आले आहे. या माध्यमातून जिल्हा प्रशासनालाही हुलकावणी देण्याचा बियाणे विक्रेत्यांचा प्रयत्न आहे.

 

टॅग्स :agricultureशेती