शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन बियाणे सौदे-बुकींग उलाढाल कोट्यवधीत; यवतमाळ जिल्ह्यात कृत्रिम टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 11:36 IST

एकीकडे यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांना बियाणे मिळत नाही, महागड्या दराने ते खरेदी करावे लागते तर दुसरीकडे सोयाबीन बियाणे कंपनीच्या गोदामांमधून थेट दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये नेऊन विकले जात आहे.

ठळक मुद्देमाल परस्पर जातो दुसऱ्या जिल्ह्यांमध्येशेतकऱ्यांवर घरचे बियाणे पेरण्याची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : प्रमुख वितरकांकडून सोयाबीन बियाण्यांच्या थेट कंपन्यांशी होणाऱ्या सौदे व बुकींगमध्येच कोट्यवधी रुपयांची ‘उलाढाल’ केली जाते. एकीकडे जिल्ह्यात शेतकऱ्यांना बियाणे मिळत नाही, महागड्या दराने ते खरेदी करावे लागते तर दुसरीकडे सोयाबीन बियाणे कंपनीच्या गोदामांमधून थेट दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये नेऊन विकले जात आहे.यवतमाळातील सोयाबीन बियाण्यांच्या प्रमुख वितरकांनी शेतकऱ्यांची लूट चालविली आहे. एवढेच नव्हे तर ‘रिटेलर’लाही (किरकोळ विक्रेते) मागणीच्या अर्धाच आणि तोही जादा दराने पुरवठा केला जात आहे. त्यातूनच या वितरकांच्या दरवर्षी चालणाऱ्या बियाण्यांच्या खरेदी-विक्री व्यवसायातील एकूणच ‘गौडबंगाल’ पुराव्यानिशी पुढे आले आहे. वितरक बियाणे कंपन्यांशी चार महिने आधीच सौदे करतात. त्यात एक हजार ते पाच हजार बॅगपर्यंत सौदे केले जातात. त्याचे ५० टक्के पेमेंटही लगेच दिले जाते. परंतु या सौद्याची ‘एमआरपी’ किती असावी हे वितरक निश्चित करतो. उर्वरित पैसे संपूर्ण माल प्राप्त झाल्यानंतर दिले जातात. यात प्रत्येक बॅगवर किमान ५०० ते ७०० रुपये मार्जीन वितरक निश्चित करतो व त्या पद्धतीनेच एमआरपी बॅगवर नोंदविली जाते.याशिवाय बियाण्यांचे बुकींग कंपनीकडे केले जाते. यात कंपनी दर निश्चित करते, मालाचा पुरवठाही कंपनीच्या सोईने होतो. यात बरेचदा कंपन्यांची मनमानी चालते. मागणीच्या ४० ते ६० टक्केच पुरवठा केला जातो. विशेष असे, बुकींग व सौद्यासाठी बहुतांश पैसा हा रिटेलरकडून उभा केला जातो. त्यात प्रमुख वितरकाची गुंतवणूक नाममात्र असते.सौदे व बुकींगच्या बियाण्यांची बरीच विल्हेवाट मात्र दुसऱ्या जिल्ह्यात लावली जाते. यवतमाळचे वितरक हिंगणघाट, चंद्रपूर, वर्धा, सोलापूर, नांदेड, हिंगोली, परभणी, दर्यापूर, कोपरगावपर्यंत बियाण्यांचा पुरवठा करतात. थेट कंपनीतूनच हा माल त्या-त्या जिल्ह्यात पाठविला जातो. पैसा मात्र यवतमाळच्या वितरकाकडे येतो. हा वितरक मग हा पैसा वापरुन तीन महिने विलंबाने बिल बनवितो. दुसऱ्या जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांचा माल पाठविता यावा यासाठी स्थानिक पातळीवर कृत्रिम टंचाई निर्माण केली जाते. रिटेलरला मागणीच्या अर्धा आणि तोही जादा दरात पुरवठा केला जातो. थेट शेतकरी आल्यास त्यालाही ५०० ते ७०० ची मार्जीन ठेऊन दर सांगितला जातो. टंचाई व त्यातून दर वाढल्याने आता शेतकऱ्यांवर उत्पादन क्षमता कमी असलेले घरचे बियाणे पेरण्याची वेळ आली आहे.

धामणगाव-पांढरकवडा रोड गोदामात साठायवतमाळचे सोयाबीन बियाणे विक्रेत्यांची धामणगाव रोड व पांढरकवडा रोडवर मोठी गोदामे असून तेथेच मोठा साठा आहे. तर दुसरीकडे कंपनीकडून अलॉटमेंट आलेच नाही, यावर्षी लॉकडाऊनमुळे कंपन्या पैश्यासाठी साईड देत नाहीत असे सांगून रिटेलर व शेतकऱ्यांसाठी कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे. अनेक ठिकाणी जिनिंगमधील गोदामात सोयाबीनचा साठा केला गेला आहे. पांढरकवडा रोडवर मोठ्या १६ गोदामांमध्ये हा साठा आहे. १६ टनच्या एका ट्रकमध्ये ५३३ बॅग भरुन हा माल रवाना केला जाणार आहे.

साठा हलविणार, जिल्हा प्रशासनाला हुलकावणी‘सोयाबीन बियाणे विक्रेत्यांची गोदामेच तपासा ना’ असे आव्हान ‘लोकमत’ने गुरुवारी वृत्तामधून जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यामुळे हादरलेल्या प्रमुख वितरकांनी गोदामांमधील माल हलविण्याचे नियोजन केले आहे. शुक्रवारी पहाटे ५ वाजता धामणगाव रोड व पांढरकवडा रोडवरील गोदामांवर ट्रक लावून हा माल दुसरीकडे हलविण्याचे प्लॅनिंग करण्यात आले आहे. या माध्यमातून जिल्हा प्रशासनालाही हुलकावणी देण्याचा बियाणे विक्रेत्यांचा प्रयत्न आहे.

 

टॅग्स :agricultureशेती