शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
4
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
6
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
7
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
8
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
9
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
10
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
11
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
12
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
13
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
14
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
15
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
16
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
17
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
18
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
19
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
20
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे

सोयाबीन बियाणे सौदे-बुकींग उलाढाल कोट्यवधीत; यवतमाळ जिल्ह्यात कृत्रिम टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 11:36 IST

एकीकडे यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांना बियाणे मिळत नाही, महागड्या दराने ते खरेदी करावे लागते तर दुसरीकडे सोयाबीन बियाणे कंपनीच्या गोदामांमधून थेट दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये नेऊन विकले जात आहे.

ठळक मुद्देमाल परस्पर जातो दुसऱ्या जिल्ह्यांमध्येशेतकऱ्यांवर घरचे बियाणे पेरण्याची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : प्रमुख वितरकांकडून सोयाबीन बियाण्यांच्या थेट कंपन्यांशी होणाऱ्या सौदे व बुकींगमध्येच कोट्यवधी रुपयांची ‘उलाढाल’ केली जाते. एकीकडे जिल्ह्यात शेतकऱ्यांना बियाणे मिळत नाही, महागड्या दराने ते खरेदी करावे लागते तर दुसरीकडे सोयाबीन बियाणे कंपनीच्या गोदामांमधून थेट दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये नेऊन विकले जात आहे.यवतमाळातील सोयाबीन बियाण्यांच्या प्रमुख वितरकांनी शेतकऱ्यांची लूट चालविली आहे. एवढेच नव्हे तर ‘रिटेलर’लाही (किरकोळ विक्रेते) मागणीच्या अर्धाच आणि तोही जादा दराने पुरवठा केला जात आहे. त्यातूनच या वितरकांच्या दरवर्षी चालणाऱ्या बियाण्यांच्या खरेदी-विक्री व्यवसायातील एकूणच ‘गौडबंगाल’ पुराव्यानिशी पुढे आले आहे. वितरक बियाणे कंपन्यांशी चार महिने आधीच सौदे करतात. त्यात एक हजार ते पाच हजार बॅगपर्यंत सौदे केले जातात. त्याचे ५० टक्के पेमेंटही लगेच दिले जाते. परंतु या सौद्याची ‘एमआरपी’ किती असावी हे वितरक निश्चित करतो. उर्वरित पैसे संपूर्ण माल प्राप्त झाल्यानंतर दिले जातात. यात प्रत्येक बॅगवर किमान ५०० ते ७०० रुपये मार्जीन वितरक निश्चित करतो व त्या पद्धतीनेच एमआरपी बॅगवर नोंदविली जाते.याशिवाय बियाण्यांचे बुकींग कंपनीकडे केले जाते. यात कंपनी दर निश्चित करते, मालाचा पुरवठाही कंपनीच्या सोईने होतो. यात बरेचदा कंपन्यांची मनमानी चालते. मागणीच्या ४० ते ६० टक्केच पुरवठा केला जातो. विशेष असे, बुकींग व सौद्यासाठी बहुतांश पैसा हा रिटेलरकडून उभा केला जातो. त्यात प्रमुख वितरकाची गुंतवणूक नाममात्र असते.सौदे व बुकींगच्या बियाण्यांची बरीच विल्हेवाट मात्र दुसऱ्या जिल्ह्यात लावली जाते. यवतमाळचे वितरक हिंगणघाट, चंद्रपूर, वर्धा, सोलापूर, नांदेड, हिंगोली, परभणी, दर्यापूर, कोपरगावपर्यंत बियाण्यांचा पुरवठा करतात. थेट कंपनीतूनच हा माल त्या-त्या जिल्ह्यात पाठविला जातो. पैसा मात्र यवतमाळच्या वितरकाकडे येतो. हा वितरक मग हा पैसा वापरुन तीन महिने विलंबाने बिल बनवितो. दुसऱ्या जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांचा माल पाठविता यावा यासाठी स्थानिक पातळीवर कृत्रिम टंचाई निर्माण केली जाते. रिटेलरला मागणीच्या अर्धा आणि तोही जादा दरात पुरवठा केला जातो. थेट शेतकरी आल्यास त्यालाही ५०० ते ७०० ची मार्जीन ठेऊन दर सांगितला जातो. टंचाई व त्यातून दर वाढल्याने आता शेतकऱ्यांवर उत्पादन क्षमता कमी असलेले घरचे बियाणे पेरण्याची वेळ आली आहे.

धामणगाव-पांढरकवडा रोड गोदामात साठायवतमाळचे सोयाबीन बियाणे विक्रेत्यांची धामणगाव रोड व पांढरकवडा रोडवर मोठी गोदामे असून तेथेच मोठा साठा आहे. तर दुसरीकडे कंपनीकडून अलॉटमेंट आलेच नाही, यावर्षी लॉकडाऊनमुळे कंपन्या पैश्यासाठी साईड देत नाहीत असे सांगून रिटेलर व शेतकऱ्यांसाठी कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे. अनेक ठिकाणी जिनिंगमधील गोदामात सोयाबीनचा साठा केला गेला आहे. पांढरकवडा रोडवर मोठ्या १६ गोदामांमध्ये हा साठा आहे. १६ टनच्या एका ट्रकमध्ये ५३३ बॅग भरुन हा माल रवाना केला जाणार आहे.

साठा हलविणार, जिल्हा प्रशासनाला हुलकावणी‘सोयाबीन बियाणे विक्रेत्यांची गोदामेच तपासा ना’ असे आव्हान ‘लोकमत’ने गुरुवारी वृत्तामधून जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यामुळे हादरलेल्या प्रमुख वितरकांनी गोदामांमधील माल हलविण्याचे नियोजन केले आहे. शुक्रवारी पहाटे ५ वाजता धामणगाव रोड व पांढरकवडा रोडवरील गोदामांवर ट्रक लावून हा माल दुसरीकडे हलविण्याचे प्लॅनिंग करण्यात आले आहे. या माध्यमातून जिल्हा प्रशासनालाही हुलकावणी देण्याचा बियाणे विक्रेत्यांचा प्रयत्न आहे.

 

टॅग्स :agricultureशेती