शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

सोयाबीनचा भाव साडेपाच हजार रुपये क्विंटलच्या दिशेने; दर ३०० रुपयांनी वधारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2022 22:30 IST

परतीच्या पावसाने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एकरी उत्पादन घटल्यानंतर दरामध्येदेखील निम्याने घट झाली आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी यावर्षी चांगलेच अडचणीत आले आहे. किमान दहा हजार रुपये क्विंटलचा दर सोयाबीनला मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. दोन वर्षापूर्वी सोयाबीनला याच पद्धतीचा दर मिळाला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गतवर्षी साडेसात हजार रुपये क्विंटलपर्यंतचा दर साेयाबीनला मिळाला होता. यावर्षी सोयाबीन बाजारात येण्यापूर्वीच साेयाबीनचे दर घसरले. यामुळे शेतकरी चांगलेच हादरले आहेत. तेलाच्या किमती वाढल्यानेे आणि ढेपीच्या मागणीत सुधारणा झाल्याने सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली आहे. सोमवारी सोयाबीनचे दर साडेपाच हजार रुपये क्विंटलपर्यंत जातील असा अंंदाज व्यापारी वर्तवित आहेत. बाजारपेठेतील सोयाबीन दराबाबत अनिश्चितता व्यक्त होत होती. याच सुमारास सोयाबीनचे दर सुधारत असल्याची बाब पुढे आली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. या दरात आणखी सुधारणा होईल काय याची प्रतीक्षा शेतकरी करीत आहेत.किमान गतवर्षीच्या सोयाबीन दराची रेंज मिळेल काय, याबाबत शेतकरी प्रतीक्षा करीत आहेत. सध्या बाजारात सोयाबीनला मिळणारे दर परवडणारे नाही. यातून शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी नेण्यापासून थांबला आहे. आता बाजारात सोयाबीनची आवक घटली आहे. पुढील आठवड्यात बाजारपेठेत सोयाबीनची आवक वाढण्याचे संकेेत  आहेत. रब्बीची पेरणी तोंडावर आहे. सोयाबीन काढणीला मोठा पैसा खर्च झाला आहे. हातात पैसेच शिल्लक राहिले नाहीत. यातून शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीचा निर्णय घेतला आहे. अल्पावधीत हातात येणारे पीक म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीनची निवड केली होती. परतीच्या पावसाने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एकरी उत्पादन घटल्यानंतर दरामध्येदेखील निम्याने घट झाली आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी यावर्षी चांगलेच अडचणीत आले आहे. किमान दहा हजार रुपये क्विंटलचा दर सोयाबीनला मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. दोन वर्षापूर्वी सोयाबीनला याच पद्धतीचा दर मिळाला होता. परतीच्या पावसाने नुकसान झालेले असतानाही सोयाबीनच्या दरात मोठी घट झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यातूनच सोयाबीन विकताना शेतकऱ्यांनी आखडता हात घेतला.

अडीच लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणीजिल्ह्यात यावर्षी अडीच लाख हेक्टरवर शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली आहे. गतवर्षी सोयाबीनला चांगले दर मिळाल्याने यावर्षी सोयाबीनच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. सोयाबीनचे मिळणारे दर पाहून शेतशिवारात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी खर्च केला होता. बाजारपेठेत सोयाबीन विक्रीला आल्यानंतर सोयाबीनचे दर घसरले. यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे. शेतमालाचे दर सुधारतील या आशेने शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री करणे थांबविले आहे. या परिस्थितीत दरामध्ये आणखीन सुधारणा झाली तर शेतकऱ्यांचा शेतशिवारातील घाटा थोडाफार भरून निघेल.

सोयाबीन उत्पादकांची धाकधूक वाढलीदरातील चढ-उताराने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. उत्पादन घटले आहे. याच दर घटले आहेत. यामुळे पुढे शेती करावी कशी असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे.

शेतकऱ्यांनी घेतला सावध पवित्रादरातील  चढ-उतार पाहता शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री थांबविली आहे. आवश्यकता पडेल तितकेच सोयाबीन विकले जात आहे. यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळत आहे. दर वधारल्यानंतरच सोयाबीन विक्रीसाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. 

 

टॅग्स :agricultureशेतीMarket Yardमार्केट यार्ड