शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

सोयाबीनचा भाव साडेपाच हजार रुपये क्विंटलच्या दिशेने; दर ३०० रुपयांनी वधारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2022 22:30 IST

परतीच्या पावसाने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एकरी उत्पादन घटल्यानंतर दरामध्येदेखील निम्याने घट झाली आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी यावर्षी चांगलेच अडचणीत आले आहे. किमान दहा हजार रुपये क्विंटलचा दर सोयाबीनला मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. दोन वर्षापूर्वी सोयाबीनला याच पद्धतीचा दर मिळाला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गतवर्षी साडेसात हजार रुपये क्विंटलपर्यंतचा दर साेयाबीनला मिळाला होता. यावर्षी सोयाबीन बाजारात येण्यापूर्वीच साेयाबीनचे दर घसरले. यामुळे शेतकरी चांगलेच हादरले आहेत. तेलाच्या किमती वाढल्यानेे आणि ढेपीच्या मागणीत सुधारणा झाल्याने सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली आहे. सोमवारी सोयाबीनचे दर साडेपाच हजार रुपये क्विंटलपर्यंत जातील असा अंंदाज व्यापारी वर्तवित आहेत. बाजारपेठेतील सोयाबीन दराबाबत अनिश्चितता व्यक्त होत होती. याच सुमारास सोयाबीनचे दर सुधारत असल्याची बाब पुढे आली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. या दरात आणखी सुधारणा होईल काय याची प्रतीक्षा शेतकरी करीत आहेत.किमान गतवर्षीच्या सोयाबीन दराची रेंज मिळेल काय, याबाबत शेतकरी प्रतीक्षा करीत आहेत. सध्या बाजारात सोयाबीनला मिळणारे दर परवडणारे नाही. यातून शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी नेण्यापासून थांबला आहे. आता बाजारात सोयाबीनची आवक घटली आहे. पुढील आठवड्यात बाजारपेठेत सोयाबीनची आवक वाढण्याचे संकेेत  आहेत. रब्बीची पेरणी तोंडावर आहे. सोयाबीन काढणीला मोठा पैसा खर्च झाला आहे. हातात पैसेच शिल्लक राहिले नाहीत. यातून शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीचा निर्णय घेतला आहे. अल्पावधीत हातात येणारे पीक म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीनची निवड केली होती. परतीच्या पावसाने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एकरी उत्पादन घटल्यानंतर दरामध्येदेखील निम्याने घट झाली आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी यावर्षी चांगलेच अडचणीत आले आहे. किमान दहा हजार रुपये क्विंटलचा दर सोयाबीनला मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. दोन वर्षापूर्वी सोयाबीनला याच पद्धतीचा दर मिळाला होता. परतीच्या पावसाने नुकसान झालेले असतानाही सोयाबीनच्या दरात मोठी घट झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यातूनच सोयाबीन विकताना शेतकऱ्यांनी आखडता हात घेतला.

अडीच लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणीजिल्ह्यात यावर्षी अडीच लाख हेक्टरवर शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली आहे. गतवर्षी सोयाबीनला चांगले दर मिळाल्याने यावर्षी सोयाबीनच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. सोयाबीनचे मिळणारे दर पाहून शेतशिवारात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी खर्च केला होता. बाजारपेठेत सोयाबीन विक्रीला आल्यानंतर सोयाबीनचे दर घसरले. यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे. शेतमालाचे दर सुधारतील या आशेने शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री करणे थांबविले आहे. या परिस्थितीत दरामध्ये आणखीन सुधारणा झाली तर शेतकऱ्यांचा शेतशिवारातील घाटा थोडाफार भरून निघेल.

सोयाबीन उत्पादकांची धाकधूक वाढलीदरातील चढ-उताराने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. उत्पादन घटले आहे. याच दर घटले आहेत. यामुळे पुढे शेती करावी कशी असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे.

शेतकऱ्यांनी घेतला सावध पवित्रादरातील  चढ-उतार पाहता शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री थांबविली आहे. आवश्यकता पडेल तितकेच सोयाबीन विकले जात आहे. यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळत आहे. दर वधारल्यानंतरच सोयाबीन विक्रीसाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. 

 

टॅग्स :agricultureशेतीMarket Yardमार्केट यार्ड