शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
2
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
3
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
4
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
5
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
6
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
7
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
8
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
9
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
10
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
11
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
12
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
13
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
14
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
15
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
16
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
17
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
18
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
19
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
20
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई

सोयाबीन वितरकांना ‘गोल्ड’ची भुरळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 05:00 IST

शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून नापिकी व कर्जबाजारीपणाचा सामना करतो आहे. आजही जिल्ह्यात हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. त्याचे भिजत घोंगडे असल्याने पीक कर्ज मिळणार की नाही याबाबत साशंकता आहे. अशाही स्थितीत कुणी घरच्या लक्ष्मीचा दागिना मोडून तर कुणी उसनवारी करून, सावकारांकडून दीडीने पैसे घेऊन पेरणीसाठी लागणाऱ्या बियाण्यांची तजवीज केली.

ठळक मुद्देमध्यप्रदेशातील कंपनी : बियाणे न उगवल्याने शेतकरी संतप्त, दुबार पेरणीची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात पेरणी केलेल्या ३० टक्के शेतकऱ्यांचे बियाणेच उगवले नाही. त्यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेल्या या शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीची वेळ आली आहे. बियाणे न उगवण्यामागे ‘सदोष बियाणे’ हेच प्रमुख कारण सांगितले जाते. मध्यप्रदेशातील एका विशिष्ट कंपनीनेच बहुतांश बियाणे विकले गेले असून ते उगवले नाही. या कंपनीच्या ‘गोल्ड’ ऑफरला अनेक वितरक बळी पडल्याचे सांगितले जाते. मात्र त्यांच्या या लालसेने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून नापिकी व कर्जबाजारीपणाचा सामना करतो आहे. आजही जिल्ह्यात हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. त्याचे भिजत घोंगडे असल्याने पीक कर्ज मिळणार की नाही याबाबत साशंकता आहे. अशाही स्थितीत कुणी घरच्या लक्ष्मीचा दागिना मोडून तर कुणी उसनवारी करून, सावकारांकडून दीडीने पैसे घेऊन पेरणीसाठी लागणाऱ्या बियाण्यांची तजवीज केली. पाऊस पडताच पेरणीही उरकली. परंतु प्रत्यक्षात सोयाबीनचे हे बियाणे उगवलेच नाही. उमरखेडपासून वणीपर्यंत सर्वच तालुक्यातून शेतकºयांच्या या तक्रारी येत आहेत. बियाणे न उगवल्याने या शेतकऱ्यांवर पुन्हा बियाणे खरेदीसाठी तजवीज करण्याची वेळ आली आहे. आधीचेच बियाणे कर्ज काढून घेतले, आता पुन्हा बियाण्यांसाठी पैसे आणावे कोठून याचा पेच शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.कृषी सूत्रानुसार, जिल्ह्यात मध्यप्रदेशातील एका विशिष्ट कंपनीनेच सर्वाधिक सोयाबीन बियाणे विकले गेले आहे. या कंपनीने प्रमुख वितरकांना १६ टनाच्या प्रत्येक वाहनावर दहा ग्रॅमचे गोल्ड क्वाईन (सोन्याचे नाणे) किंवा क्रेडीट नोट अशी ऑफर दिली होती. २२ ऑगस्ट २०२० ही त्यासाठी डेडलाईन आहे. बहुतांश वितरक गोल्ड क्वाईनच्या ऑफरला बळी पडले आणि त्यांनी याच कंपनीचे सोयाबीन बियाणे अधिक विकले. परंतु आतापर्यंत पेरणी झालेल्या क्षेत्रापैकी ३० टक्के बियाणे उगवलेच नसल्याच्या तक्रारी आहे. ९० टक्के शेतकºयांनी बियाण्यांची खरेदी करून ठेवली आहे. मात्र काहींनी अद्याप पेरलेले नाही. उगवण क्षमता नसलेले हे बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारून काही वितरकांनी गोल्ड ऑफरच्या माध्यमातून ‘गरुडझेप’ घेतल्याचेही सांगितले जाते. सदर कंपनी हे बियाणे स्वत: बनवत नाही, बाहेरुन ते घेतले जाते व त्यावर स्व:चे ब्रॅन्डींग केले जाते, अशीही माहिती आहे.

घरचे बियाणे मात्र उगवलेयावर्षी अनेक वितरकांनी सोयाबीन बियाण्यांची कृत्रिम टंचाई निर्माण करून जादा दराने विक्री केली होती. बियाण्याचे ८० ते ९० रुपये किलो दर पाहता अनेक शेतकऱ्यांनी घरचेच बियाणे पेरण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय योग्य ठरला असून त्यांचे घरचे हे बियाणे उगवल्याचे सांगितले जाते.

वितरकांच्या उलट्या बोंबा‘गोल्ड’वर नजर ठेऊन विशिष्ट कंपनीचे बियाणे शेतकऱ्यांना विकणाऱ्या काही वितरकांनी आता शेतकऱ्यांच्याच नावे बोंबा ठोकणे सुरू केले आहे. हवामानाच्या व पावसाच्या संभाव्य स्थितीबाबत आम्ही वारंवार शेतकऱ्यांना संदेश पाठवून सूचित केले, २१ जूननंतर चांगला पाऊस असल्याने तेव्हाच पेरणी करावी, असा सल्ला दिला. मात्र शेतकऱ्यांनी हा सल्ला धुडकावून ३ ते ५ मार्चपासूनच पेरणी सुरू केली. दरम्यान पावसाने दडी मारल्याने बियाणे उगवले नाही, असा बचाव काही वितरक घेत आहेत.कृषी केंद्रांना पोलीस संरक्षण मागितलेसोयाबीन बियाणे न उगवल्याने शेतकरी संतप्त आहेत, कृषी केंद्रांमध्ये धडक देत आहेत, बियाणे बदलवून मागत आहेत, आक्रमक होत आहेत, त्यातूनच दुर्घटना होण्याची, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती कृषी साहित्य उत्पादक आणि विक्रेता संघाने वर्तविली आहे. अशा संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी कृषी केंद्रांना पोलीस संरक्षण दिले जावे, अशा मागणीचे निवेदन २० जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. संरक्षण न मिळाल्यास कृषी साहित्य विक्री प्रतिष्ठाने बंद ठेवावी लागेल, असेही त्यात नमूद करण्यात आले.

टॅग्स :agricultureशेती