शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

सोयाबीन वितरकांना ‘गोल्ड’ची भुरळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 05:00 IST

शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून नापिकी व कर्जबाजारीपणाचा सामना करतो आहे. आजही जिल्ह्यात हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. त्याचे भिजत घोंगडे असल्याने पीक कर्ज मिळणार की नाही याबाबत साशंकता आहे. अशाही स्थितीत कुणी घरच्या लक्ष्मीचा दागिना मोडून तर कुणी उसनवारी करून, सावकारांकडून दीडीने पैसे घेऊन पेरणीसाठी लागणाऱ्या बियाण्यांची तजवीज केली.

ठळक मुद्देमध्यप्रदेशातील कंपनी : बियाणे न उगवल्याने शेतकरी संतप्त, दुबार पेरणीची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात पेरणी केलेल्या ३० टक्के शेतकऱ्यांचे बियाणेच उगवले नाही. त्यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेल्या या शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीची वेळ आली आहे. बियाणे न उगवण्यामागे ‘सदोष बियाणे’ हेच प्रमुख कारण सांगितले जाते. मध्यप्रदेशातील एका विशिष्ट कंपनीनेच बहुतांश बियाणे विकले गेले असून ते उगवले नाही. या कंपनीच्या ‘गोल्ड’ ऑफरला अनेक वितरक बळी पडल्याचे सांगितले जाते. मात्र त्यांच्या या लालसेने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून नापिकी व कर्जबाजारीपणाचा सामना करतो आहे. आजही जिल्ह्यात हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. त्याचे भिजत घोंगडे असल्याने पीक कर्ज मिळणार की नाही याबाबत साशंकता आहे. अशाही स्थितीत कुणी घरच्या लक्ष्मीचा दागिना मोडून तर कुणी उसनवारी करून, सावकारांकडून दीडीने पैसे घेऊन पेरणीसाठी लागणाऱ्या बियाण्यांची तजवीज केली. पाऊस पडताच पेरणीही उरकली. परंतु प्रत्यक्षात सोयाबीनचे हे बियाणे उगवलेच नाही. उमरखेडपासून वणीपर्यंत सर्वच तालुक्यातून शेतकºयांच्या या तक्रारी येत आहेत. बियाणे न उगवल्याने या शेतकऱ्यांवर पुन्हा बियाणे खरेदीसाठी तजवीज करण्याची वेळ आली आहे. आधीचेच बियाणे कर्ज काढून घेतले, आता पुन्हा बियाण्यांसाठी पैसे आणावे कोठून याचा पेच शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.कृषी सूत्रानुसार, जिल्ह्यात मध्यप्रदेशातील एका विशिष्ट कंपनीनेच सर्वाधिक सोयाबीन बियाणे विकले गेले आहे. या कंपनीने प्रमुख वितरकांना १६ टनाच्या प्रत्येक वाहनावर दहा ग्रॅमचे गोल्ड क्वाईन (सोन्याचे नाणे) किंवा क्रेडीट नोट अशी ऑफर दिली होती. २२ ऑगस्ट २०२० ही त्यासाठी डेडलाईन आहे. बहुतांश वितरक गोल्ड क्वाईनच्या ऑफरला बळी पडले आणि त्यांनी याच कंपनीचे सोयाबीन बियाणे अधिक विकले. परंतु आतापर्यंत पेरणी झालेल्या क्षेत्रापैकी ३० टक्के बियाणे उगवलेच नसल्याच्या तक्रारी आहे. ९० टक्के शेतकºयांनी बियाण्यांची खरेदी करून ठेवली आहे. मात्र काहींनी अद्याप पेरलेले नाही. उगवण क्षमता नसलेले हे बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारून काही वितरकांनी गोल्ड ऑफरच्या माध्यमातून ‘गरुडझेप’ घेतल्याचेही सांगितले जाते. सदर कंपनी हे बियाणे स्वत: बनवत नाही, बाहेरुन ते घेतले जाते व त्यावर स्व:चे ब्रॅन्डींग केले जाते, अशीही माहिती आहे.

घरचे बियाणे मात्र उगवलेयावर्षी अनेक वितरकांनी सोयाबीन बियाण्यांची कृत्रिम टंचाई निर्माण करून जादा दराने विक्री केली होती. बियाण्याचे ८० ते ९० रुपये किलो दर पाहता अनेक शेतकऱ्यांनी घरचेच बियाणे पेरण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय योग्य ठरला असून त्यांचे घरचे हे बियाणे उगवल्याचे सांगितले जाते.

वितरकांच्या उलट्या बोंबा‘गोल्ड’वर नजर ठेऊन विशिष्ट कंपनीचे बियाणे शेतकऱ्यांना विकणाऱ्या काही वितरकांनी आता शेतकऱ्यांच्याच नावे बोंबा ठोकणे सुरू केले आहे. हवामानाच्या व पावसाच्या संभाव्य स्थितीबाबत आम्ही वारंवार शेतकऱ्यांना संदेश पाठवून सूचित केले, २१ जूननंतर चांगला पाऊस असल्याने तेव्हाच पेरणी करावी, असा सल्ला दिला. मात्र शेतकऱ्यांनी हा सल्ला धुडकावून ३ ते ५ मार्चपासूनच पेरणी सुरू केली. दरम्यान पावसाने दडी मारल्याने बियाणे उगवले नाही, असा बचाव काही वितरक घेत आहेत.कृषी केंद्रांना पोलीस संरक्षण मागितलेसोयाबीन बियाणे न उगवल्याने शेतकरी संतप्त आहेत, कृषी केंद्रांमध्ये धडक देत आहेत, बियाणे बदलवून मागत आहेत, आक्रमक होत आहेत, त्यातूनच दुर्घटना होण्याची, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती कृषी साहित्य उत्पादक आणि विक्रेता संघाने वर्तविली आहे. अशा संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी कृषी केंद्रांना पोलीस संरक्षण दिले जावे, अशा मागणीचे निवेदन २० जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. संरक्षण न मिळाल्यास कृषी साहित्य विक्री प्रतिष्ठाने बंद ठेवावी लागेल, असेही त्यात नमूद करण्यात आले.

टॅग्स :agricultureशेती