शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

सोयाबीनचे पीक एकरी एकही क्विंटल नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 05:00 IST

तालुक्यात कापूस हे प्रमुख पीक आहे. त्यानंतर सोयाबीनचा पेरा आहे. परंतु सोयबीनच्या पिकाला सुरूवातीपासनूच दृष्ट लागली. शेतकऱ्यांनी पेरलेल्या सोयाबीनच्या बियाणाची अनेक ठिकाणी ३० ते ४० टक्केच उगवण झाली. त्यानंतर शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करून कसे तरी सोयाबीन या पिकाचे संगोपन केले. उगवण शक्ती न झालेल्या शेतांचे पंचनामेसुद्धा करण्यात आले. परंतु बियाणे कंपन्याकडून अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळाली नाही.

ठळक मुद्देपांढरकवडा तालुका : सोमवारच्या धुव्वाधार पावसामुळे उरलेले पिकही गेले वाया, लाखो रूपयांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या कपाशी व सोयाबीन या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सोयाबिनची परिस्थिती तर अशी झाली आहे की, लागवडीचा खर्चही निघाला नाही. तालुक्यात सोमवारी अचानकपणे झालेल्या धुव्वाधार पावसामुळे उरलेसुरले पिकही हातातून गेले आहे. सोयाबीनचे पीक तर एकरी एक क्विंटलही नाही, अशी परिस्थिती आहे.तालुक्यात कापूस हे प्रमुख पीक आहे. त्यानंतर सोयाबीनचा पेरा आहे. परंतु सोयबीनच्या पिकाला सुरूवातीपासनूच दृष्ट लागली. शेतकऱ्यांनी पेरलेल्या सोयाबीनच्या बियाणाची अनेक ठिकाणी ३० ते ४० टक्केच उगवण झाली. त्यानंतर शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करून कसे तरी सोयाबीन या पिकाचे संगोपन केले. उगवण शक्ती न झालेल्या शेतांचे पंचनामेसुद्धा करण्यात आले. परंतु बियाणे कंपन्याकडून अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. दुबार पेरणी करून सोयाबिनचे पीक चांगल्या पद्धतीने घेऊ, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. १२ हजार हेक्टरमध्ये सोयाबीनची लागवड करण्यात आली. सुरूवातीला अतिशय चांगले पीक होते. यावेळी सोयाबीनचा उतारा निश्चितच वाढेल, अशी अपेक्षा होती. परंतु ही अपेक्षा फोल ठरली. सोयाबिनला शेंगा लागण्याच्यावेळी पावसाने कहर केला आणि शेंगाला अंकुर फुटू लागले. पुन्हा दुहेरी संकट शेतकऱ्यांपुढे उभे ठाकले. यातून शेतकरी कसाबसा सावरत नाही, तोच ऐन सोयाबीन काढणीच्यावेळी परतीचा पाऊस सुरू झाला.या सततच्या पावसामुळे सोयाबीन पीक उद्ध्वस्त झाले. त्यानंतर पुन्हा सोमवारी अचानक झालेल्या पावसामुळे उरले सुरले पिकही हाती येणार नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सोयाबीन या पिकासाठी पेरणीपासून तर काढणीपर्यंत एकरी १८ हजार रूपये खर्च येतो. परंतु सोयाबिनचे पीक पूर्णत: उद्ध्वस्त झाल्यामुळे एकरी एक क्विंटलही उत्पन्न नाही. त्यामुळे लागवडीसाठी लागलेला खर्चही निघाला नाही, ही वस्तुस्थिती आहे.कपाशी पिकाची परिस्थितीही सारखीच, शेतकरी अडचणीतकपाशीच्या पिकाची परिस्थितीही सारखीच असून सततच्या पावसामुळे कपाशीची बोंडे सडायला लागली आहे. एकीकडे ढगाळ वातावरणामुळे कपाशीवर आलेल्या रोगाचा सामना करावा लागला, तर आता परतीच्या पावसामुळे झालेल्या प्रचंड नुकसानीमुळे शेतकरी मात्र पूर्णत: अडचणीत सापडला आहे. तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती