शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

सोयाबीनचे पीक एकरी एकही क्विंटल नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 05:00 IST

तालुक्यात कापूस हे प्रमुख पीक आहे. त्यानंतर सोयाबीनचा पेरा आहे. परंतु सोयबीनच्या पिकाला सुरूवातीपासनूच दृष्ट लागली. शेतकऱ्यांनी पेरलेल्या सोयाबीनच्या बियाणाची अनेक ठिकाणी ३० ते ४० टक्केच उगवण झाली. त्यानंतर शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करून कसे तरी सोयाबीन या पिकाचे संगोपन केले. उगवण शक्ती न झालेल्या शेतांचे पंचनामेसुद्धा करण्यात आले. परंतु बियाणे कंपन्याकडून अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळाली नाही.

ठळक मुद्देपांढरकवडा तालुका : सोमवारच्या धुव्वाधार पावसामुळे उरलेले पिकही गेले वाया, लाखो रूपयांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या कपाशी व सोयाबीन या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सोयाबिनची परिस्थिती तर अशी झाली आहे की, लागवडीचा खर्चही निघाला नाही. तालुक्यात सोमवारी अचानकपणे झालेल्या धुव्वाधार पावसामुळे उरलेसुरले पिकही हातातून गेले आहे. सोयाबीनचे पीक तर एकरी एक क्विंटलही नाही, अशी परिस्थिती आहे.तालुक्यात कापूस हे प्रमुख पीक आहे. त्यानंतर सोयाबीनचा पेरा आहे. परंतु सोयबीनच्या पिकाला सुरूवातीपासनूच दृष्ट लागली. शेतकऱ्यांनी पेरलेल्या सोयाबीनच्या बियाणाची अनेक ठिकाणी ३० ते ४० टक्केच उगवण झाली. त्यानंतर शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करून कसे तरी सोयाबीन या पिकाचे संगोपन केले. उगवण शक्ती न झालेल्या शेतांचे पंचनामेसुद्धा करण्यात आले. परंतु बियाणे कंपन्याकडून अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. दुबार पेरणी करून सोयाबिनचे पीक चांगल्या पद्धतीने घेऊ, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. १२ हजार हेक्टरमध्ये सोयाबीनची लागवड करण्यात आली. सुरूवातीला अतिशय चांगले पीक होते. यावेळी सोयाबीनचा उतारा निश्चितच वाढेल, अशी अपेक्षा होती. परंतु ही अपेक्षा फोल ठरली. सोयाबिनला शेंगा लागण्याच्यावेळी पावसाने कहर केला आणि शेंगाला अंकुर फुटू लागले. पुन्हा दुहेरी संकट शेतकऱ्यांपुढे उभे ठाकले. यातून शेतकरी कसाबसा सावरत नाही, तोच ऐन सोयाबीन काढणीच्यावेळी परतीचा पाऊस सुरू झाला.या सततच्या पावसामुळे सोयाबीन पीक उद्ध्वस्त झाले. त्यानंतर पुन्हा सोमवारी अचानक झालेल्या पावसामुळे उरले सुरले पिकही हाती येणार नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सोयाबीन या पिकासाठी पेरणीपासून तर काढणीपर्यंत एकरी १८ हजार रूपये खर्च येतो. परंतु सोयाबिनचे पीक पूर्णत: उद्ध्वस्त झाल्यामुळे एकरी एक क्विंटलही उत्पन्न नाही. त्यामुळे लागवडीसाठी लागलेला खर्चही निघाला नाही, ही वस्तुस्थिती आहे.कपाशी पिकाची परिस्थितीही सारखीच, शेतकरी अडचणीतकपाशीच्या पिकाची परिस्थितीही सारखीच असून सततच्या पावसामुळे कपाशीची बोंडे सडायला लागली आहे. एकीकडे ढगाळ वातावरणामुळे कपाशीवर आलेल्या रोगाचा सामना करावा लागला, तर आता परतीच्या पावसामुळे झालेल्या प्रचंड नुकसानीमुळे शेतकरी मात्र पूर्णत: अडचणीत सापडला आहे. तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती