शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
3
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
4
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
5
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
6
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
7
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
8
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
9
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
10
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
11
Secret Santa : अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
12
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
13
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
14
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
15
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
16
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
17
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
18
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
19
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
20
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
Daily Top 2Weekly Top 5

हजारो हेक्टरवरील पेरणी सापडली धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 05:00 IST

मृग नक्षत्रात सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यामुळे जवळपास ८० टक्के शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कपाशी व सोयाबीनची पेरणी केली. पेरणी केल्यानंतर पाऊस येईलच, अशी अपेक्षा होती. परंतु तालुक्यातील काही भागातच पाऊस आला. बऱ्याचशा भागात कपाशीच्या बियाणाला अंकुर फुटल्यानंतर त्यावर पाऊसच झाला नाही. परिणामी शेकडो हेक्टर जमिनीतील कपाशीच्या बियाणांचे अंकुर करपण्याच्या मार्गावर आहे.

ठळक मुद्देपांढरकवडा तालुका : शेतकरी झाले चिंतातुर; पाऊस न आल्यास दुबार पेरणीचे संकट

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : पावसाने डोळे वटारल्यामुळे तालुक्यातील हजारो हेक्टर जमिनीतील पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.मृग नक्षत्रात सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यामुळे जवळपास ८० टक्के शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कपाशी व सोयाबीनची पेरणी केली. पेरणी केल्यानंतर पाऊस येईलच, अशी अपेक्षा होती. परंतु तालुक्यातील काही भागातच पाऊस आला. बऱ्याचशा भागात कपाशीच्या बियाणाला अंकुर फुटल्यानंतर त्यावर पाऊसच झाला नाही. परिणामी शेकडो हेक्टर जमिनीतील कपाशीच्या बियाणांचे अंकुर करपण्याच्या मार्गावर आहे. मृग नक्षत्रात हमखास पाऊस बरसतो, या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी धूळ पेरणी केली होती. मृग नक्षत्राच्या पूर्वार्धात ही पेरणी करण्यात आली. महागडे कपाशीचे बियाणे टोबण्यात आले होते. ज्यांच्याकडे ओलिताची सोय होती, त्यांनी स्प्रिंक्लरद्वारा ओलित करण्याचा प्रयत्न केला. मात्र सततच्या विद्युत पुरवठ्याच्या खोळंब्यामुळे अनेकांना ओलितही करता आले नाही. महागडे बियाणे जमिनीत पेरूनही पावसाअभावी बियाणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शेतकरी चातकासारखी पावसाची वाट पाहत आहे. वरुणराजा प्रसन्न होण्यासाठी प्रार्थना केल्या जात आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी तालुक्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. या पावसामुळे काही गावातील पिकांना संजीवनी मिळाली आहे. परंतु तालुक्याच्या काही भागात अनेक दिवसांपासून पाऊसच झाला नाही. येत्या दोन-तीन दिवसात पाऊस न आल्यास शेतातील पिके करपण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे. तालुक्यात सर्वाधिक कपाशीचे पीक घेतले जाते. ५२ हजार ८७३ हेक्टर जमिनीपैकी ७० टक्के जमिनीत यावर्षी कपाशीचा पेरा आहे. त्याखालोखाल सोयाबीन, तुरी, ज्वारी, उडीद, मूग ही पिकेही घेतली आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने मशागत करून, कर्ज काढून बी-बियाणे व खताची खरेदी केली. परंतु पावसाअभावी आता ही पेरणीच धोक्यात आली आहे. येत्या दोन-तीन दिवसात पाऊस आला नाही तर पेरलेले बियाणे वाया जाण्याची शेतकऱ्यांना भीती आहे.

तालुक्यातील अनेक शेतकरी सावकारांच्या दारात - आधीच नापिकीने व कर्जबाजारीपणामुळे आर्थिक कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे आहे. दुबार पेरणी करावी तरी कशी, या समस्येने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या अवस्थेतून मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यांनी आतापासूनच अनेक खासगी सावकारांच्या घराचे उंबरठे झिजविणे सुरू केले आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती