शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
6
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
7
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
8
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
9
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
10
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
11
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
12
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
15
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
16
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
17
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
18
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
19
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
20
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा

हजारो हेक्टरवरील पेरणी सापडली धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 05:00 IST

मृग नक्षत्रात सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यामुळे जवळपास ८० टक्के शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कपाशी व सोयाबीनची पेरणी केली. पेरणी केल्यानंतर पाऊस येईलच, अशी अपेक्षा होती. परंतु तालुक्यातील काही भागातच पाऊस आला. बऱ्याचशा भागात कपाशीच्या बियाणाला अंकुर फुटल्यानंतर त्यावर पाऊसच झाला नाही. परिणामी शेकडो हेक्टर जमिनीतील कपाशीच्या बियाणांचे अंकुर करपण्याच्या मार्गावर आहे.

ठळक मुद्देपांढरकवडा तालुका : शेतकरी झाले चिंतातुर; पाऊस न आल्यास दुबार पेरणीचे संकट

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : पावसाने डोळे वटारल्यामुळे तालुक्यातील हजारो हेक्टर जमिनीतील पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.मृग नक्षत्रात सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यामुळे जवळपास ८० टक्के शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कपाशी व सोयाबीनची पेरणी केली. पेरणी केल्यानंतर पाऊस येईलच, अशी अपेक्षा होती. परंतु तालुक्यातील काही भागातच पाऊस आला. बऱ्याचशा भागात कपाशीच्या बियाणाला अंकुर फुटल्यानंतर त्यावर पाऊसच झाला नाही. परिणामी शेकडो हेक्टर जमिनीतील कपाशीच्या बियाणांचे अंकुर करपण्याच्या मार्गावर आहे. मृग नक्षत्रात हमखास पाऊस बरसतो, या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी धूळ पेरणी केली होती. मृग नक्षत्राच्या पूर्वार्धात ही पेरणी करण्यात आली. महागडे कपाशीचे बियाणे टोबण्यात आले होते. ज्यांच्याकडे ओलिताची सोय होती, त्यांनी स्प्रिंक्लरद्वारा ओलित करण्याचा प्रयत्न केला. मात्र सततच्या विद्युत पुरवठ्याच्या खोळंब्यामुळे अनेकांना ओलितही करता आले नाही. महागडे बियाणे जमिनीत पेरूनही पावसाअभावी बियाणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शेतकरी चातकासारखी पावसाची वाट पाहत आहे. वरुणराजा प्रसन्न होण्यासाठी प्रार्थना केल्या जात आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी तालुक्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. या पावसामुळे काही गावातील पिकांना संजीवनी मिळाली आहे. परंतु तालुक्याच्या काही भागात अनेक दिवसांपासून पाऊसच झाला नाही. येत्या दोन-तीन दिवसात पाऊस न आल्यास शेतातील पिके करपण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे. तालुक्यात सर्वाधिक कपाशीचे पीक घेतले जाते. ५२ हजार ८७३ हेक्टर जमिनीपैकी ७० टक्के जमिनीत यावर्षी कपाशीचा पेरा आहे. त्याखालोखाल सोयाबीन, तुरी, ज्वारी, उडीद, मूग ही पिकेही घेतली आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने मशागत करून, कर्ज काढून बी-बियाणे व खताची खरेदी केली. परंतु पावसाअभावी आता ही पेरणीच धोक्यात आली आहे. येत्या दोन-तीन दिवसात पाऊस आला नाही तर पेरलेले बियाणे वाया जाण्याची शेतकऱ्यांना भीती आहे.

तालुक्यातील अनेक शेतकरी सावकारांच्या दारात - आधीच नापिकीने व कर्जबाजारीपणामुळे आर्थिक कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे आहे. दुबार पेरणी करावी तरी कशी, या समस्येने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या अवस्थेतून मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यांनी आतापासूनच अनेक खासगी सावकारांच्या घराचे उंबरठे झिजविणे सुरू केले आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती