शहरं
Join us  
Trending Stories
1
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
2
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
3
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
4
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
5
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
6
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
7
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
8
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
9
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
10
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
11
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
12
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
13
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
14
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
15
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
16
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
17
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
18
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
19
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
20
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु

हजारो हेक्टरवरील पेरणी सापडली धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 05:00 IST

मृग नक्षत्रात सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यामुळे जवळपास ८० टक्के शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कपाशी व सोयाबीनची पेरणी केली. पेरणी केल्यानंतर पाऊस येईलच, अशी अपेक्षा होती. परंतु तालुक्यातील काही भागातच पाऊस आला. बऱ्याचशा भागात कपाशीच्या बियाणाला अंकुर फुटल्यानंतर त्यावर पाऊसच झाला नाही. परिणामी शेकडो हेक्टर जमिनीतील कपाशीच्या बियाणांचे अंकुर करपण्याच्या मार्गावर आहे.

ठळक मुद्देपांढरकवडा तालुका : शेतकरी झाले चिंतातुर; पाऊस न आल्यास दुबार पेरणीचे संकट

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : पावसाने डोळे वटारल्यामुळे तालुक्यातील हजारो हेक्टर जमिनीतील पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.मृग नक्षत्रात सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यामुळे जवळपास ८० टक्के शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कपाशी व सोयाबीनची पेरणी केली. पेरणी केल्यानंतर पाऊस येईलच, अशी अपेक्षा होती. परंतु तालुक्यातील काही भागातच पाऊस आला. बऱ्याचशा भागात कपाशीच्या बियाणाला अंकुर फुटल्यानंतर त्यावर पाऊसच झाला नाही. परिणामी शेकडो हेक्टर जमिनीतील कपाशीच्या बियाणांचे अंकुर करपण्याच्या मार्गावर आहे. मृग नक्षत्रात हमखास पाऊस बरसतो, या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी धूळ पेरणी केली होती. मृग नक्षत्राच्या पूर्वार्धात ही पेरणी करण्यात आली. महागडे कपाशीचे बियाणे टोबण्यात आले होते. ज्यांच्याकडे ओलिताची सोय होती, त्यांनी स्प्रिंक्लरद्वारा ओलित करण्याचा प्रयत्न केला. मात्र सततच्या विद्युत पुरवठ्याच्या खोळंब्यामुळे अनेकांना ओलितही करता आले नाही. महागडे बियाणे जमिनीत पेरूनही पावसाअभावी बियाणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शेतकरी चातकासारखी पावसाची वाट पाहत आहे. वरुणराजा प्रसन्न होण्यासाठी प्रार्थना केल्या जात आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी तालुक्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. या पावसामुळे काही गावातील पिकांना संजीवनी मिळाली आहे. परंतु तालुक्याच्या काही भागात अनेक दिवसांपासून पाऊसच झाला नाही. येत्या दोन-तीन दिवसात पाऊस न आल्यास शेतातील पिके करपण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे. तालुक्यात सर्वाधिक कपाशीचे पीक घेतले जाते. ५२ हजार ८७३ हेक्टर जमिनीपैकी ७० टक्के जमिनीत यावर्षी कपाशीचा पेरा आहे. त्याखालोखाल सोयाबीन, तुरी, ज्वारी, उडीद, मूग ही पिकेही घेतली आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने मशागत करून, कर्ज काढून बी-बियाणे व खताची खरेदी केली. परंतु पावसाअभावी आता ही पेरणीच धोक्यात आली आहे. येत्या दोन-तीन दिवसात पाऊस आला नाही तर पेरलेले बियाणे वाया जाण्याची शेतकऱ्यांना भीती आहे.

तालुक्यातील अनेक शेतकरी सावकारांच्या दारात - आधीच नापिकीने व कर्जबाजारीपणामुळे आर्थिक कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे आहे. दुबार पेरणी करावी तरी कशी, या समस्येने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या अवस्थेतून मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यांनी आतापासूनच अनेक खासगी सावकारांच्या घराचे उंबरठे झिजविणे सुरू केले आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती