शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सौरउर्जेवर चालणार पाणीपुरवठा योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 17:48 IST

पाणीपुरवठा योजना सौरउर्जेवर चालविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ऊर्जा मंत्रालयाने घेतला आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजंसी (मेडा) प्रत्येक जिल्ह्याला दोन कोटी देणार आहे.

ठळक मुद्दे‘मेडा’चे अर्थसहाय्य ऊर्जा मंत्रालयाने केले शिक्कामोर्तब

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पाणीपुरवठा योजना सौरउर्जेवर चालविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ऊर्जा मंत्रालयाने घेतला आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजंसी (मेडा) प्रत्येक जिल्ह्याला दोन कोटी देणार आहे.ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचा मोटरपंप सौर उर्जेवर जोडला जाणार आहे. त्याकरिता जुन्याच टाक्यांचा वापर करण्यात येणार आहे. या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातील ४० गावांचा पाणीपुरवठा सौर पंपावर करण्यात येणार आहे. राज्यातल्या ३६ जिल्ह्यातील १४४० गावांमध्ये सौर ग्रामीण पाणीपुरवठा योजना चालविली जाणार आहे. त्यासाठी ‘मेडा’ने ७५ कोटींचा निधी वळता केला आहे. जून पूर्वी हे काम पूर्णत्वास येणार आहे, असे मेडाचे विभागीय संचालक सारंग महाजन यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्वावर सौर उर्जेवरील पाणीपुरवठा योजना सुरू होणार आहे. प्रत्येक जिल्ह्याकडे दोन कोटी रूपये वळते करण्यास ‘मेडा’ने सुरूवात केली आहे. दुष्काळी स्थिती आणि विविध कारणाने राज्यभरातील पाणीपुरवठा योजना दरवर्षीच अडचणीत येतात. भरउन्हाळ्यात वीज पुरवठा कापला जातो. यामुळे पाणी असतानाही नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागतो.या स्थितीवर मात करण्यासाठी पाणीपुरवठा योजना सौर उर्जेवर कार्यान्वित करण्यावर ऊर्जा विभागाने भर दिला आहे. यामुळे वीज बिल थकल्याने पाणीपुरवठा खंडीत झाला, असा प्रकारच घडणार नाही. नागरिकांना भारनियमनामुळे टाकी भरली नाही, असे उत्तर ऐकायला मिळणार नाही.पाणीपुरवठा योजना स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने ऊर्जा विभागाने पाऊल उचलले आहे. प्रायोगिक तत्वावर काम करण्यासाठी ऊर्जा विभागाने मंजुरी दिली असून कामकाजाला प्रारंभ झाला आहे.- मदन येरावार- ऊर्जा राज्यमंत्री

टॅग्स :Governmentसरकार