शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
2
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
3
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
4
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
5
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
6
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
7
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
8
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
9
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
10
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
11
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
12
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
13
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
14
तेजस्वी पिछाडीवर, तिकडे तेज प्रताप यादवांची काय अवस्था...; 'हम तो डुबेंगे सनम...' खरे ठरतेय? 
15
कामगिरी दमदार; पीएम मोदींच्या हनुमानाची 'हनुमान उडी', LJP(R) इतक्या जागांवर आघाडीवर...
16
बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम
17
बिहारमध्ये NDA ला आघाडी, भाजप-जेडीयूच्या जागा वाढल्या; तेजस्वी यादवांना 'या' ५ चुका पडल्या महागात!
18
Health And Ritual: दुपारच्या जेवणानंतर वामकुक्षी ही पूर्वापार परंपरा; मेंदू होतो सुपरफास्ट!
19
“इंदुरीकर महाराज, फेटा खाली उतरवू नका, सोशल मीडियावरील छपरींकडे दुर्लक्ष करा”; कुणाचे आवाहन?
20
Utpatti Ekadashi 2025: उत्पत्ती एकादशीला 'या' ६ उपायांनी पापमुक्त व्हा; पाहा पूजाविधी!
Daily Top 2Weekly Top 5

सौरउर्जेवर चालणार पाणीपुरवठा योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 17:48 IST

पाणीपुरवठा योजना सौरउर्जेवर चालविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ऊर्जा मंत्रालयाने घेतला आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजंसी (मेडा) प्रत्येक जिल्ह्याला दोन कोटी देणार आहे.

ठळक मुद्दे‘मेडा’चे अर्थसहाय्य ऊर्जा मंत्रालयाने केले शिक्कामोर्तब

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पाणीपुरवठा योजना सौरउर्जेवर चालविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ऊर्जा मंत्रालयाने घेतला आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजंसी (मेडा) प्रत्येक जिल्ह्याला दोन कोटी देणार आहे.ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचा मोटरपंप सौर उर्जेवर जोडला जाणार आहे. त्याकरिता जुन्याच टाक्यांचा वापर करण्यात येणार आहे. या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातील ४० गावांचा पाणीपुरवठा सौर पंपावर करण्यात येणार आहे. राज्यातल्या ३६ जिल्ह्यातील १४४० गावांमध्ये सौर ग्रामीण पाणीपुरवठा योजना चालविली जाणार आहे. त्यासाठी ‘मेडा’ने ७५ कोटींचा निधी वळता केला आहे. जून पूर्वी हे काम पूर्णत्वास येणार आहे, असे मेडाचे विभागीय संचालक सारंग महाजन यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्वावर सौर उर्जेवरील पाणीपुरवठा योजना सुरू होणार आहे. प्रत्येक जिल्ह्याकडे दोन कोटी रूपये वळते करण्यास ‘मेडा’ने सुरूवात केली आहे. दुष्काळी स्थिती आणि विविध कारणाने राज्यभरातील पाणीपुरवठा योजना दरवर्षीच अडचणीत येतात. भरउन्हाळ्यात वीज पुरवठा कापला जातो. यामुळे पाणी असतानाही नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागतो.या स्थितीवर मात करण्यासाठी पाणीपुरवठा योजना सौर उर्जेवर कार्यान्वित करण्यावर ऊर्जा विभागाने भर दिला आहे. यामुळे वीज बिल थकल्याने पाणीपुरवठा खंडीत झाला, असा प्रकारच घडणार नाही. नागरिकांना भारनियमनामुळे टाकी भरली नाही, असे उत्तर ऐकायला मिळणार नाही.पाणीपुरवठा योजना स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने ऊर्जा विभागाने पाऊल उचलले आहे. प्रायोगिक तत्वावर काम करण्यासाठी ऊर्जा विभागाने मंजुरी दिली असून कामकाजाला प्रारंभ झाला आहे.- मदन येरावार- ऊर्जा राज्यमंत्री

टॅग्स :Governmentसरकार