शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

सौरउर्जेवर चालणार पाणीपुरवठा योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 17:48 IST

पाणीपुरवठा योजना सौरउर्जेवर चालविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ऊर्जा मंत्रालयाने घेतला आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजंसी (मेडा) प्रत्येक जिल्ह्याला दोन कोटी देणार आहे.

ठळक मुद्दे‘मेडा’चे अर्थसहाय्य ऊर्जा मंत्रालयाने केले शिक्कामोर्तब

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पाणीपुरवठा योजना सौरउर्जेवर चालविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ऊर्जा मंत्रालयाने घेतला आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजंसी (मेडा) प्रत्येक जिल्ह्याला दोन कोटी देणार आहे.ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचा मोटरपंप सौर उर्जेवर जोडला जाणार आहे. त्याकरिता जुन्याच टाक्यांचा वापर करण्यात येणार आहे. या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातील ४० गावांचा पाणीपुरवठा सौर पंपावर करण्यात येणार आहे. राज्यातल्या ३६ जिल्ह्यातील १४४० गावांमध्ये सौर ग्रामीण पाणीपुरवठा योजना चालविली जाणार आहे. त्यासाठी ‘मेडा’ने ७५ कोटींचा निधी वळता केला आहे. जून पूर्वी हे काम पूर्णत्वास येणार आहे, असे मेडाचे विभागीय संचालक सारंग महाजन यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्वावर सौर उर्जेवरील पाणीपुरवठा योजना सुरू होणार आहे. प्रत्येक जिल्ह्याकडे दोन कोटी रूपये वळते करण्यास ‘मेडा’ने सुरूवात केली आहे. दुष्काळी स्थिती आणि विविध कारणाने राज्यभरातील पाणीपुरवठा योजना दरवर्षीच अडचणीत येतात. भरउन्हाळ्यात वीज पुरवठा कापला जातो. यामुळे पाणी असतानाही नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागतो.या स्थितीवर मात करण्यासाठी पाणीपुरवठा योजना सौर उर्जेवर कार्यान्वित करण्यावर ऊर्जा विभागाने भर दिला आहे. यामुळे वीज बिल थकल्याने पाणीपुरवठा खंडीत झाला, असा प्रकारच घडणार नाही. नागरिकांना भारनियमनामुळे टाकी भरली नाही, असे उत्तर ऐकायला मिळणार नाही.पाणीपुरवठा योजना स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने ऊर्जा विभागाने पाऊल उचलले आहे. प्रायोगिक तत्वावर काम करण्यासाठी ऊर्जा विभागाने मंजुरी दिली असून कामकाजाला प्रारंभ झाला आहे.- मदन येरावार- ऊर्जा राज्यमंत्री

टॅग्स :Governmentसरकार