शहरं
Join us  
Trending Stories
1
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
2
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
3
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
4
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
5
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
6
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
7
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
8
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
9
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
10
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
11
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
12
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
13
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
14
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
15
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
16
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
17
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
18
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
19
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
20
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

सौर पथदिव्यांची योजना धोक्यात

By admin | Updated: January 31, 2015 00:13 IST

भारनियमनाने काळोखात गुडूप झालेल्या गावांना उजेडात आणण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून सौर पथदिव्यांची योजना हाती घेण्यात आली.

लोकमत विशेषसुरेंद्र राऊत ल्ल यवतमाळ यवतमाळ : भारनियमनाने काळोखात गुडूप झालेल्या गावांना उजेडात आणण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून सौर पथदिव्यांची योजना हाती घेण्यात आली. मात्र गेल्या तीन वर्षांपासून अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे योजना अखेरच्या घटका मोजत आहे. वरिष्ठांच्या आदेशाला न जुमानता टोलवाटोलवी सुरू आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून गावागावांत सौर पथदिवे लावण्यासाठी २०१२-१३ या आर्थिक वर्षात दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यातील एक रुपयासुद्धा आतापर्यंत खर्च झाला नाही. पहिलाच निधी अखर्चित राहिल्यामुळे पुढील दोन वर्षाच्या निधीला कात्री लागली. २०१२-१३ आणि २०१४-१५ या दोन वर्षांसाठी ६० लाख रुपये तरतूद करण्यात आली. हाही निधी अखर्चित राहिल्याने आता २०१५-१६ साठी केवळ १० लाखांची तरतूद जिल्हा नियोजन समितीकडून करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविली जाणारी सौर पथदिव्यांची योजना आता धोक्यात आली आहे. मुळात या योजनेला २०१०-११ पासूनच ग्रहण लागले होते. त्यावेळी तत्कालिन कृषी विकास अधिकाऱ्यांनी योजनेच्या अंमलबजावणीत गौडबंगाल केल्याचे प्रकरण पुढे आले होते. सौर पथदिवे लावल्यानंतर काही दिवसातच बंद पडले तर काही ठिकाणी पथदिवे न लावताच निधी उचल झाली. त्यानंतर नव्याने आलेल्या अधिकाऱ्यांनी या योजनेपासून चार हात दूर राहणेच पसंत केले.दरम्यान तत्कालिन जिल्हा परिषद अध्यक्षांचे आणि कृषी विकास अधिकाऱ्याचे फारसे जमत नसल्याने ही योजना राबविण्यासाठी वर्ग करण्याचा प्रस्ताव पुढे आला. येथेच या योजनेच्या अंमलबजावणीस हरताळ फासला. राजकीय सुंदोपसुंदीत ग्रामीण भागासाठी प्रकाश घेऊन आलेल्या योजनेलाच ग्रहण लागले. आता हे ग्रहण सुटणार की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. याला जिल्हा परिषदेतील सदस्य व पदाधिकारीसुद्धा जबाबदार आहेत. सत्तेत असलेल्या सदस्य पदाधिकाऱ्यांचा अधिनस्त यंत्रणेवर नियंत्रण नसल्याचे सिद्ध होते.