शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
4
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
7
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
8
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
9
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
10
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
11
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
12
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
13
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
14
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
15
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
16
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
17
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
18
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
19
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
20
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल

सौर पथदिव्यांची योजना धोक्यात

By admin | Updated: January 31, 2015 00:13 IST

भारनियमनाने काळोखात गुडूप झालेल्या गावांना उजेडात आणण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून सौर पथदिव्यांची योजना हाती घेण्यात आली.

लोकमत विशेषसुरेंद्र राऊत ल्ल यवतमाळ यवतमाळ : भारनियमनाने काळोखात गुडूप झालेल्या गावांना उजेडात आणण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून सौर पथदिव्यांची योजना हाती घेण्यात आली. मात्र गेल्या तीन वर्षांपासून अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे योजना अखेरच्या घटका मोजत आहे. वरिष्ठांच्या आदेशाला न जुमानता टोलवाटोलवी सुरू आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून गावागावांत सौर पथदिवे लावण्यासाठी २०१२-१३ या आर्थिक वर्षात दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यातील एक रुपयासुद्धा आतापर्यंत खर्च झाला नाही. पहिलाच निधी अखर्चित राहिल्यामुळे पुढील दोन वर्षाच्या निधीला कात्री लागली. २०१२-१३ आणि २०१४-१५ या दोन वर्षांसाठी ६० लाख रुपये तरतूद करण्यात आली. हाही निधी अखर्चित राहिल्याने आता २०१५-१६ साठी केवळ १० लाखांची तरतूद जिल्हा नियोजन समितीकडून करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविली जाणारी सौर पथदिव्यांची योजना आता धोक्यात आली आहे. मुळात या योजनेला २०१०-११ पासूनच ग्रहण लागले होते. त्यावेळी तत्कालिन कृषी विकास अधिकाऱ्यांनी योजनेच्या अंमलबजावणीत गौडबंगाल केल्याचे प्रकरण पुढे आले होते. सौर पथदिवे लावल्यानंतर काही दिवसातच बंद पडले तर काही ठिकाणी पथदिवे न लावताच निधी उचल झाली. त्यानंतर नव्याने आलेल्या अधिकाऱ्यांनी या योजनेपासून चार हात दूर राहणेच पसंत केले.दरम्यान तत्कालिन जिल्हा परिषद अध्यक्षांचे आणि कृषी विकास अधिकाऱ्याचे फारसे जमत नसल्याने ही योजना राबविण्यासाठी वर्ग करण्याचा प्रस्ताव पुढे आला. येथेच या योजनेच्या अंमलबजावणीस हरताळ फासला. राजकीय सुंदोपसुंदीत ग्रामीण भागासाठी प्रकाश घेऊन आलेल्या योजनेलाच ग्रहण लागले. आता हे ग्रहण सुटणार की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. याला जिल्हा परिषदेतील सदस्य व पदाधिकारीसुद्धा जबाबदार आहेत. सत्तेत असलेल्या सदस्य पदाधिकाऱ्यांचा अधिनस्त यंत्रणेवर नियंत्रण नसल्याचे सिद्ध होते.