शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

निळोणाचे फ्लोटिंगपंप व गोखीच्या पाण्यावर मदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 23:18 IST

अर्ध्याअधिक शहराला ‘जीवन’ देणारा चापडोह प्रकल्प साथ सोडण्याच्या स्थितीत आला आहे. या प्रकल्पातून अखेरची खेप सोडली जात आहे.

ठळक मुद्देचापडोह साथ सोडणार : नगरपरिषदेची जबाबदारी वाढणार

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : अर्ध्याअधिक शहराला ‘जीवन’ देणारा चापडोह प्रकल्प साथ सोडण्याच्या स्थितीत आला आहे. या प्रकल्पातून अखेरची खेप सोडली जात आहे. आता निळोणा प्रकल्पात लावले जात असलेले फ्लोटींग आणि गोखी प्रकल्पावर शहराला पाणीपुरवठ्याची मदार आहे. नगरपरिषदेच्या टँकरने दिवसही भागत नाही. टँकर वाढवून शहराची तहान भागविण्याची नगरपरिषदेची जबाबदारी वाढली आहे.चापडोह प्रकल्पातून पाणी ओढण्याचे सर्व मार्ग संपले आहे. चर खोदून, फ्लोटींग (तरंगते पंप) पंप लावून महिना-दीड महिना भागवता आला. या प्रकल्पात आता पाण्याचे डबके तेवढे दिसतात. त्यातून पाणी ओढण्याचा प्रयोगही अघोरी ठरणारा आहे. दर्डानगर, सुयोगनगर, लोहारा, वैभवनगर, वाघापूर नाका, पिंपळगाव येथील टाक्यांमध्ये या प्रकल्पाचे पाणी घेतले जाते. तेथून ज्या भागाला पाणी सोडले जाते, त्या भागाचाही भार आता नवीन उपाययोजनांवर येणार आहे.निळोणा प्रकल्पाचे भिंतीजवळ असलेले पाणी फ्लोटींग पंपाद्वारे पाणी साठवणुकीच्या विहिरीजवळ आणले जात आहे. सहा पंप या ठिकाणी लावले जात आहे. फ्लोटींगसाठी २४ तास वीज मिळावी याकरिता नवीन खांब टाकून तारा ओढण्यात आल्या आहे. तातडीच्या उपययोजनेअंतर्गत ही कामे करण्यात आली. त्यामुळे निळोणाचे पाणी आता चापडोहच्या टाक्यांमध्ये घेतले जाणार आहे. केवळ निळोणाच्या भरवशावर यवतमाळकरांची पाण्याची गरज पूर्ण करणे कठीण आहे. पाणी साठवून ओढण्यासाठी लागणारा कालावधी आणि शुध्दीकरणासाठी विलंब होणार असल्याने पाणीपुरवठ्यात आणखी गोंधळ उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.निळोणाच्या सोबतीला गोखी प्रकल्पाचे पाणी घेतले जाणार आहे. ४० लाख रुपयांची ही आकस्मिक उपाययोजना आहे. या योजनेचे पाणी दर्डानगर टाकीमध्ये घेतले जाणार आहे. येत्या आठ दिवसात हे काम मार्गी लागणार असल्याचे सांगितले जाते. या कामासाठी लागणारे काही आवश्यक साहित्य अमरावती जिल्ह्यातील एका योजनेचे आणण्याची तयारी प्राधिकरणाने केली आहे. गोखीचे पाणी शक्य तितक्या लवकर मिळाल्यास निळोणावरचा भार कमी होणार आहे. निळोणातील पाणी आताच्या पाणी वितरणानुसार महिनाभर पुरेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.‘शिवजल’चे २८ टँकर लागणारवंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवजल क्रांती योजने अंतर्गत आमदार प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्या सहकार्याने यवतमाळात २८ टँकरने पाणीपुरवठा केला जाणार आहे. प्रत्येक प्रभागात एक याप्रमाणे टँकर सुरू केला जाईल. यावर शिवसैनिकांचे नियंत्रण राहणार आहे. यासाठी गोखी प्रकल्पाच्या प्लांटवरून पाणी घेतले जाणार आहे, अशी माहिती शिवसेना यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख संजय ढवळे यांनी दिली. महसूल राज्यमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, नगराध्यक्ष कांचन चौधरी यांचे सहकार्य मिळत असल्याचे संतोष ढवळे यांनी सांगितले.जलशुद्धीकरणाला लागणार वेळनिळोणाचे पाणी जंतुमुक्त करणे आवश्यक आहे. त्यामुळे पाणी प्रवाहित करूनच विहिरीत (जॅकवेल) सोडले जाणार आहे. टप्पा पध्दतीने पाणी पुढे सरकविले जाईल. त्यामुळे जंतू नाहिसे होऊन पाणी गाळमुक्त होईल. या पद्धतीने घेतलेले पाणी शद्धीकरणासाठी पाठविले जाईल. ही सर्व प्रक्रिया करताना शुद्धीकरणास विलंब होणार असल्याने, वितरण लांबण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :Waterपाणी