शहरं
Join us  
Trending Stories
1
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
2
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
3
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
4
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
5
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
6
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
7
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
8
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
9
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
10
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
11
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
12
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
13
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
14
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
15
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
16
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
17
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
18
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
19
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
20
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले

निळोणाचे फ्लोटिंगपंप व गोखीच्या पाण्यावर मदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 23:18 IST

अर्ध्याअधिक शहराला ‘जीवन’ देणारा चापडोह प्रकल्प साथ सोडण्याच्या स्थितीत आला आहे. या प्रकल्पातून अखेरची खेप सोडली जात आहे.

ठळक मुद्देचापडोह साथ सोडणार : नगरपरिषदेची जबाबदारी वाढणार

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : अर्ध्याअधिक शहराला ‘जीवन’ देणारा चापडोह प्रकल्प साथ सोडण्याच्या स्थितीत आला आहे. या प्रकल्पातून अखेरची खेप सोडली जात आहे. आता निळोणा प्रकल्पात लावले जात असलेले फ्लोटींग आणि गोखी प्रकल्पावर शहराला पाणीपुरवठ्याची मदार आहे. नगरपरिषदेच्या टँकरने दिवसही भागत नाही. टँकर वाढवून शहराची तहान भागविण्याची नगरपरिषदेची जबाबदारी वाढली आहे.चापडोह प्रकल्पातून पाणी ओढण्याचे सर्व मार्ग संपले आहे. चर खोदून, फ्लोटींग (तरंगते पंप) पंप लावून महिना-दीड महिना भागवता आला. या प्रकल्पात आता पाण्याचे डबके तेवढे दिसतात. त्यातून पाणी ओढण्याचा प्रयोगही अघोरी ठरणारा आहे. दर्डानगर, सुयोगनगर, लोहारा, वैभवनगर, वाघापूर नाका, पिंपळगाव येथील टाक्यांमध्ये या प्रकल्पाचे पाणी घेतले जाते. तेथून ज्या भागाला पाणी सोडले जाते, त्या भागाचाही भार आता नवीन उपाययोजनांवर येणार आहे.निळोणा प्रकल्पाचे भिंतीजवळ असलेले पाणी फ्लोटींग पंपाद्वारे पाणी साठवणुकीच्या विहिरीजवळ आणले जात आहे. सहा पंप या ठिकाणी लावले जात आहे. फ्लोटींगसाठी २४ तास वीज मिळावी याकरिता नवीन खांब टाकून तारा ओढण्यात आल्या आहे. तातडीच्या उपययोजनेअंतर्गत ही कामे करण्यात आली. त्यामुळे निळोणाचे पाणी आता चापडोहच्या टाक्यांमध्ये घेतले जाणार आहे. केवळ निळोणाच्या भरवशावर यवतमाळकरांची पाण्याची गरज पूर्ण करणे कठीण आहे. पाणी साठवून ओढण्यासाठी लागणारा कालावधी आणि शुध्दीकरणासाठी विलंब होणार असल्याने पाणीपुरवठ्यात आणखी गोंधळ उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.निळोणाच्या सोबतीला गोखी प्रकल्पाचे पाणी घेतले जाणार आहे. ४० लाख रुपयांची ही आकस्मिक उपाययोजना आहे. या योजनेचे पाणी दर्डानगर टाकीमध्ये घेतले जाणार आहे. येत्या आठ दिवसात हे काम मार्गी लागणार असल्याचे सांगितले जाते. या कामासाठी लागणारे काही आवश्यक साहित्य अमरावती जिल्ह्यातील एका योजनेचे आणण्याची तयारी प्राधिकरणाने केली आहे. गोखीचे पाणी शक्य तितक्या लवकर मिळाल्यास निळोणावरचा भार कमी होणार आहे. निळोणातील पाणी आताच्या पाणी वितरणानुसार महिनाभर पुरेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.‘शिवजल’चे २८ टँकर लागणारवंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवजल क्रांती योजने अंतर्गत आमदार प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्या सहकार्याने यवतमाळात २८ टँकरने पाणीपुरवठा केला जाणार आहे. प्रत्येक प्रभागात एक याप्रमाणे टँकर सुरू केला जाईल. यावर शिवसैनिकांचे नियंत्रण राहणार आहे. यासाठी गोखी प्रकल्पाच्या प्लांटवरून पाणी घेतले जाणार आहे, अशी माहिती शिवसेना यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख संजय ढवळे यांनी दिली. महसूल राज्यमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, नगराध्यक्ष कांचन चौधरी यांचे सहकार्य मिळत असल्याचे संतोष ढवळे यांनी सांगितले.जलशुद्धीकरणाला लागणार वेळनिळोणाचे पाणी जंतुमुक्त करणे आवश्यक आहे. त्यामुळे पाणी प्रवाहित करूनच विहिरीत (जॅकवेल) सोडले जाणार आहे. टप्पा पध्दतीने पाणी पुढे सरकविले जाईल. त्यामुळे जंतू नाहिसे होऊन पाणी गाळमुक्त होईल. या पद्धतीने घेतलेले पाणी शद्धीकरणासाठी पाठविले जाईल. ही सर्व प्रक्रिया करताना शुद्धीकरणास विलंब होणार असल्याने, वितरण लांबण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :Waterपाणी