शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

जिल्ह्यात जलयुक्त शिवाराचे सामाजिक सर्वेक्षण

By admin | Updated: May 23, 2015 23:55 IST

जलयुक्त शिवार योजनेच्या महत्त्वाकांक्षी कामाला जिल्ह्यात प्रारंभ झाला. यात कुठलाही गैरप्रकार घडू नये यासाठी ..

१६ पथकांची करणार निर्मिती : पारदर्शकतेसाठी जिल्ह्यात पहिला प्रयोग, जिल्हाधिकाऱ्यांनी केले मार्गदर्शनयवतमाळ : जलयुक्त शिवार योजनेच्या महत्त्वाकांक्षी कामाला जिल्ह्यात प्रारंभ झाला. यात कुठलाही गैरप्रकार घडू नये यासाठी प्रत्येक कामात पारदर्शकता आणली जात आहे. कामाच्या पाहणीकरिता सामाजिक सर्वेक्षण केले जाणार आहे. इतकेच नव्हे तर, तालुक्यातील कामाची विरूध्द तपासणी वरिष्ठ अधिकारी करणार आहे. याबाबत अधिकाऱ्यांच्या याद्या सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी झालेल्या बैठकीत दिले. जलयुक्त शिवार योजनेत जिल्ह्यातील ४१३ गावांची निवड करण्यात आली आहे. यातील काही गावांमध्ये कामांना सुरुवात झाली आहे. दरम्यान, जलयुक्त शिवार योजनेत मोठया प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचल्या आहेत. या कामात पारदर्शकता आणण्यासाठी नव्याने रुजू झालेले जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. यावेळी त्यांनी जलयुक्त शिवार योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी सामाजिक सर्वेक्षणाचा विचार मांडून त्याची अंमलबजावणी करण्याची सूचना दिली आहे. याकरिता १६ भरारी पथकांची निर्मिती करणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. जेसीबीधारकांची उपविभागीय अधिकारीस्तरावर बैठक घेऊन कामाला गती देण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. सिमेंट नालाबांध असणाऱ्या ठिकाणी प्रामुख्याने खोली वाढविण्याच्या सूचना आहेत. निवड करण्यात आलेले ठिकाण चुकीचे असल्यास अशी कामे रद्द करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, कृषी अधीक्षक दत्तात्रय गायकवाड, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र काटपल्लीवार, रोहयोचे उपजिल्हाधिकारी श्रीकांत फडके, उपविभागीय अधिकारी माने, उपवनसंरक्षक प्रमोदचंद लाकरा यासोेबतच विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते. (शहर वार्ताहर)अभियांत्रिकी, कृषी प्राध्यापक करणार सर्वेक्षणसामाजिक सर्वेक्षणासाठी अभियांत्रिकी (सिव्हील), कृषी, आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्राध्यापकांचे सहकार्य घेतले जाणार आहे. यासाठी यवतमाळ शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकांची बैठक बोलाविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. जलयुक्त शिवार योजनेतील कामे दर्जेदार झाले की, नाही याची विरुध्द तपासणी केली जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील बांधकाम आणि जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांच्या याद्या मागविण्यात आल्या. सध्या झालेली कामे योग्य आहेत का, हे तपासण्यासाठी विरूध्द तालुक्यातील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. नियुक्त अधिकाऱ्यांना या कामाचा अहवाल प्रशासनाकडे सादर करावा लागणार आहे.