शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

जिल्ह्यातील ५० हजार नागरिकांनी आतापर्यंत दिली कोरोनाला पटकनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 05:00 IST

कोरोना संसर्गाचा दर धोकादायक पातळीवर पोहोचला आहे. १३.७ या दराने कोरोना फैलावत आहे. २४ तासात ९९१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १७ जणांचा मृत्यू झाला. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये दोन तर खासगी रुग्णालयात सात जण दगावले. जिल्ह्यात सात हजार १७ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. यापैकी दोन हजार ५८९ रुग्णालयात उपचार घेत आहे. तर गृहविलगीकरणात चार हजार ४२८ रुग्ण आहेत.

ठळक मुद्दे५८ हजार रुग्णांची नोंद : मंगळवारी १२३९ पॉझिटिव्ह तर २६ जणांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात वर्षभरात ५० हजार २९९ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. बुधवारपर्यंत ५८ हजार ७१५ कोरोना रुग्ण आढळून आले आहे. रुग्ण बरे होण्याचा दर हा ८८.६६ इतका आहे. आरोग्य विभागाने बुधवारी सात हजार ३०० नमुन्यांची तपासणी केली. यामध्ये एक हजार २४३ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. तर २६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोना संसर्गाचा दर धोकादायक पातळीवर पोहोचला आहे. १३.७ या दराने कोरोना फैलावत आहे. २४ तासात ९९१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १७ जणांचा मृत्यू झाला. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये दोन तर खासगी रुग्णालयात सात जण दगावले. जिल्ह्यात सात हजार १७ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. यापैकी दोन हजार ५८९ रुग्णालयात उपचार घेत आहे. तर गृहविलगीकरणात चार हजार ४२८ रुग्ण आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एक हजार ३९९ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून सध्याचा मृत्यूदर २.३८ इतका आहे. पॉझिटिव्ह आलेल्या १२३९ जणांमध्ये ७४५ पुरुष आणि ४९४ महिला आहेत. यवतमाळातील सर्वाधिक २०७ रुग्ण, दिग्रस येथील २००, वणी १९३, पांढरकवडा १४७, दारव्हा ७३, मारेगाव ६५, नेर ६४, पुसद ६४, उमरखेड ४८, महागाव ४५, घाटंजी ४२, कळंब ३९, आर्णी १९, झरीजामणी १४, बाभूळगाव ७, राळेगाव ६ आणि इतर शहरातील सहा रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत चार लाख ४९ हजार ७६ नमुने तपासणीला पाठविण्यात आले. यापैकी चार लाख ४५ हजार ६४१ नमुन्यांचा अहवाल प्राप्त आहे. त्यामध्ये ३ लाख ८६ हजार ९२६ नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तीन हजार ४३५ नमुन्यांचा अहवाल अद्यापही प्राप्त झालेला नाही. यवतमाळ, दिग्रस, वणी, पांढरकवडा या तालुक्याची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. ग्रामीण भागात कोरोना नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाकडून कोविड अवेअरनेस अभियान राबविले जात आहे. त्याकरिता गाव स्तरावरच्या कोरोना सनियंत्रण समित्यांना पुन्हा कामाला लावण्यात आले आहे. लोकसहभागही यासाठी घेतला जाणार आहे. लसीकरण व चाचण्यांवर भर आहे. 

बेडची उपलब्धता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात केवळ दोन बेड शिल्लक आहेत. जिल्ह्यातील २८ खासगी कोविड रुग्णालयात एकूण १ हजार ४४ बेड आहेत. यापैकी ३४३ बेड शिल्लक आहेत. जिल्ह्यातील सहा डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये ३६० बेडपैकी १६९ बेड शिल्लक आहेत. ३४ कोविड केअर सेंटरमध्ये दोन हजार ७२३ बेडपैकी १ हजार ४७८ बेड शिल्लक आहेत. 

१८ ते ४४ वयोगटातील १८५० जणांना लस  जिल्ह्यात १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरु झाले. मंगळवारपर्यंत १ हजार ८५० जणांना लस देण्यात आली आहे. यात यवतमाळ शहरातील पाटीपुरा केंद्रावर ३७५, लोहारा केंद्रावर ३५७, पुसद उपजिल्हा रुग्णालयात ३६७, दारव्हा उपजिल्हा रुग्णालयात ३७५, पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयात ३७६ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या