शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

नऊ महिन्यात ९६ शेतकऱ्यांना सर्पदंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 05:00 IST

पावसामुळे सापांच्या बिळामध्ये पाणी गेल्याने साप बिळाबाहेर येऊन सुरक्षित जागा शोधतात. शेतशिवार ही त्यांच्यासाठी अतिशय सुरक्षित जागा असते. त्यामुळे सापांची संख्या शेतशिवारात अधिक दिसून येते. वणी विभागात बहुतांश लोकांचा शेती हाच व्यवसाय असल्याने शेतकºयांना दररोज आपल्या शेतात जावेच लागते. शेतात जाताना योग्य खबरदारी घेतली नाही, तर सापांपासून स्वत:चे संरक्षण करणे कठीण जाते.

ठळक मुद्देवणी उपविभाग : शेतमजूरही असुरक्षित, शासकीय मदतीची योजनाच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : शेतात कष्ट उपसणारे शेतकरी सर्पदंशाच्या घटनांनी हैराण आहेत. गेल्या नऊ महिन्यात तब्बल ९६ जणांना सर्पदंश झाला. यात शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.शेतकºयांना पिकांना पाणी देण्यासाठी अनेकदा रात्रीच शेतात जावे लागते. रात्रीच्या अंधारात सरपटणाºया प्राण्यांचा उपद्रव अधिक असतो. अंधारात चुकून एखाद्या सापावर पाय पडला की, संबंधित शेतकºयाला किंवा शेतमजुराला सर्पदंशाला सामोरे जावे लागते. विषारी सापाने चावा घेतल्यास प्रसंगी शेतकºयांवर मृत्यूही ओढवतो. अशा अनेक घटना या हंगामात वणी उपविभागात घडल्या आहेत. पावसाळा सुरू झाल्यानंतर जून ते सप्टेंबर या महिन्यात सर्पदंशाच्या सर्वाधिक घटना घडतात. पावसामुळे सापांच्या बिळामध्ये पाणी गेल्याने साप बिळाबाहेर येऊन सुरक्षित जागा शोधतात. शेतशिवार ही त्यांच्यासाठी अतिशय सुरक्षित जागा असते. त्यामुळे सापांची संख्या शेतशिवारात अधिक दिसून येते. वणी विभागात बहुतांश लोकांचा शेती हाच व्यवसाय असल्याने शेतकºयांना दररोज आपल्या शेतात जावेच लागते. शेतात जाताना योग्य खबरदारी घेतली नाही, तर सापांपासून स्वत:चे संरक्षण करणे कठीण जाते.यातूनच यावर्षी सर्पदंशाच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडल्या आहेत. सर्वाधिक सर्पदंशाच्या घटना आॅगस्ट महिन्यात घडल्याच्या नोंदी ग्रामीण रूग्णालयात आहेत. एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यातील आकडेवारीवरून नजर फिरविली असता, आॅगस्ट महिन्यात सर्वाधिक म्हणजे २७ जणांना सर्पदंश झाला. एप्रिलमध्ये सहा, मेमध्ये तीन, जूनमध्ये चार, जुलैमध्ये १७, सप्टेंबरमध्ये १६, आॅक्टोबरमध्ये पाच, नोव्हेंबरमध्ये १२, तर डिसेंबरमध्ये ११ जणांना सर्पदंश झाला.सर्पदंशाच्या वाढत्या घटना लक्षात घेता आरोग्य विभागाने खबरदारी घेतली असून त्यावर आवश्यक असलेली लस मोठ्या प्रमाणावर ग्रामीण रूग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रातही उपलब्ध करून दिली आहे. साधारणत: कृषी पंपाचा वीज पुरवठा हा रात्रीच्यावेळी सुरू केला जातो. त्यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी नाईलाजाने शेतकºयांना जीव धोक्यात घालून रात्रीच्यावेळी शेतात जावे लागते.वणीत ९३३ लोकांना कुत्र्यांचा चावागेल्या काही दिवसांपासून वणी शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रचंड उपद्रव वाढला आहे. वर्दळीच्या रस्त्यावर टोळक्याने फिरणाºया या श्वानांनी गेल्या नऊ महिन्यात ९३३ लोकांना चावा घेऊन दहशत निर्माण केली आहे. या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.

टॅग्स :Socialसामाजिक