शहरं
Join us  
Trending Stories
1
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला, मृत्यू नेमका कशामुळे?
3
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
4
‘त्यांनी आपल्या २ मुली पळवल्या तर तुम्ही त्यांच्या १० जणीं घेऊन या’, भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान  
5
महागडे मोबाइल अन् मोठे टीव्हीच हवेत; या दिवाळीत 'प्रीमियम' खरेदीचा नवा पॅटर्न समोर
6
कोण आहे रंजना प्रकाश देसाई?; ज्यांना ८ व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदाची मिळाली जबाबदारी
7
रणबीरच्या 'रामायण'मध्ये विवेक ओबेरॉयचीही भूमिका, अभिनेत्याने दान केलं मानधन; म्हणाला...
8
बाजारात मोठी अस्थिरता! सेंसेक्स-निफ्टी सपाट पातळीवर बंद; महिंद्रा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले
9
प्रणित मोरे ऐकत नाय! क्रिकेटपटूच्या बहिणीसोबत वाढतेय जवळीक? 'बिग बॉस'च्या घरातील व्हिडीओ पाहून चाहतेही अवाक्
10
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
11
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
12
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
13
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
14
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
16
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
17
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
18
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
19
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
20
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा

पारवा सेतू केंद्रात लूट

By admin | Updated: July 7, 2014 23:49 IST

विद्यार्थी आणि नागरिकांच्या गरजेचा गैरफायदा येथील सेतू केंद्रात घेतला जात आहे. कुठल्याही दाखल्यासाठी शासनाने निर्धारित केलेल्या शुल्कापेक्षा अधिक रक्कम आकारली जात आहे. यात ग्रामीण भागातील

पावतीही दिली जात नाही : दाखल्यासाठी लागतात दोन दिवसअब्दुल मतीन - पारवाविद्यार्थी आणि नागरिकांच्या गरजेचा गैरफायदा येथील सेतू केंद्रात घेतला जात आहे. कुठल्याही दाखल्यासाठी शासनाने निर्धारित केलेल्या शुल्कापेक्षा अधिक रक्कम आकारली जात आहे. यात ग्रामीण भागातील नागरिक आर्थिकरीत्या लुटला जात आहे. शिवाय दाखल्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागत असल्याने ग्रामीण भागातील लोकांना प्रवासापोटीचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तालुका महसूल प्रशासनाचेही या बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे. येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या एका कक्षात सेतू केंद्र सुरू करण्यात आले आहे. याठिकाणी नियुक्त कर्मचारी विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी जादा शुल्क घेत आहे. यासाठीची पावतीही दिली जात नाही. सध्या विद्यार्थ्यांना शाळा प्रवेशासाठी उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र आवश्यक आहे. तर शेतकऱ्यांना पीककर्ज आदी कामांसाठी सातबाराची गरज आहे. या दाखल्यांसाठी शासनाने शुल्क ठरवून दिले असून तसा फलक सेतू केंद्राबाहेर लावण्याची सक्ती केली आहे. येथील सेतू केंद्राने फलक लावणे तर दूर निर्धारित शुल्कापेक्षा अधिक रक्कम घेणे सुरू केले आहे. उत्पन्नाच्या दाखल्यासाठी ८० रुपये आकारले जाते. याशिवाय इतर दाखल्यांकरिता वेगवेगळी रक्कम घेतली जात आहे. येथील सेतू केंद्रातून विविध प्रकारचे दाखले मिळविण्यासाठी परिसराच्या २० ते २५ गावातील विद्यार्थी, नागरिक येतात. जवळपास १० ते १५ किलोमीटरचा प्रवास करून केंद्र सुरू होण्यापूर्वीच त्यांची हजेरी राहते. एकाच दिवशी दाखला मिळावा अशी त्यांची अपेक्षा असते, तसा नियमही आहे. परंतु येथील सेतू केंद्रात बहुतांश अर्जदारांना त्याच दिवशी दाखला उपलब्ध करून दिला जात नाही. त्यांना दुसऱ्या दिवशी बोलाविले जाते. याप्रकारात प्रवास भाड्याचा अतिरिक्त भुर्दंड त्यांचावर बसतो. पावसाने दडी मारल्यामुळे मजूरवर्गाच्या हाताला काम नाही. शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या बहुतांश योजनाही थंड आहे. त्यामुळे त्यांच्याजवळ पैशाची रेलचेल नाही. पाल्यांना शाळेत घालण्यासाठी दाखल्याची आवश्यकता आहे. अशावेळी त्यांना उसनवार करून रकमेची जुळवाजुळव करावी लागते. सेतू केंद्रातून मात्र या लोकांची सर्रास लूट सुरू आहे. महसूल प्रशासनाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी आहे.