शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

पारवा सेतू केंद्रात लूट

By admin | Updated: July 7, 2014 23:49 IST

विद्यार्थी आणि नागरिकांच्या गरजेचा गैरफायदा येथील सेतू केंद्रात घेतला जात आहे. कुठल्याही दाखल्यासाठी शासनाने निर्धारित केलेल्या शुल्कापेक्षा अधिक रक्कम आकारली जात आहे. यात ग्रामीण भागातील

पावतीही दिली जात नाही : दाखल्यासाठी लागतात दोन दिवसअब्दुल मतीन - पारवाविद्यार्थी आणि नागरिकांच्या गरजेचा गैरफायदा येथील सेतू केंद्रात घेतला जात आहे. कुठल्याही दाखल्यासाठी शासनाने निर्धारित केलेल्या शुल्कापेक्षा अधिक रक्कम आकारली जात आहे. यात ग्रामीण भागातील नागरिक आर्थिकरीत्या लुटला जात आहे. शिवाय दाखल्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागत असल्याने ग्रामीण भागातील लोकांना प्रवासापोटीचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तालुका महसूल प्रशासनाचेही या बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे. येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या एका कक्षात सेतू केंद्र सुरू करण्यात आले आहे. याठिकाणी नियुक्त कर्मचारी विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी जादा शुल्क घेत आहे. यासाठीची पावतीही दिली जात नाही. सध्या विद्यार्थ्यांना शाळा प्रवेशासाठी उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र आवश्यक आहे. तर शेतकऱ्यांना पीककर्ज आदी कामांसाठी सातबाराची गरज आहे. या दाखल्यांसाठी शासनाने शुल्क ठरवून दिले असून तसा फलक सेतू केंद्राबाहेर लावण्याची सक्ती केली आहे. येथील सेतू केंद्राने फलक लावणे तर दूर निर्धारित शुल्कापेक्षा अधिक रक्कम घेणे सुरू केले आहे. उत्पन्नाच्या दाखल्यासाठी ८० रुपये आकारले जाते. याशिवाय इतर दाखल्यांकरिता वेगवेगळी रक्कम घेतली जात आहे. येथील सेतू केंद्रातून विविध प्रकारचे दाखले मिळविण्यासाठी परिसराच्या २० ते २५ गावातील विद्यार्थी, नागरिक येतात. जवळपास १० ते १५ किलोमीटरचा प्रवास करून केंद्र सुरू होण्यापूर्वीच त्यांची हजेरी राहते. एकाच दिवशी दाखला मिळावा अशी त्यांची अपेक्षा असते, तसा नियमही आहे. परंतु येथील सेतू केंद्रात बहुतांश अर्जदारांना त्याच दिवशी दाखला उपलब्ध करून दिला जात नाही. त्यांना दुसऱ्या दिवशी बोलाविले जाते. याप्रकारात प्रवास भाड्याचा अतिरिक्त भुर्दंड त्यांचावर बसतो. पावसाने दडी मारल्यामुळे मजूरवर्गाच्या हाताला काम नाही. शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या बहुतांश योजनाही थंड आहे. त्यामुळे त्यांच्याजवळ पैशाची रेलचेल नाही. पाल्यांना शाळेत घालण्यासाठी दाखल्याची आवश्यकता आहे. अशावेळी त्यांना उसनवार करून रकमेची जुळवाजुळव करावी लागते. सेतू केंद्रातून मात्र या लोकांची सर्रास लूट सुरू आहे. महसूल प्रशासनाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी आहे.