शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

दारव्हात सरकारी केंद्रावर कापूस, तूर खरेदी संथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 05:00 IST

तालुक्यात दुसऱ्या टप्प्यात ३ हजार १०७ शेतकऱ्यांनी कापूस, तर साडेतीन हजार शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केली. परंतु त्यामधील कापसाकरिता दररोज केवळ २०, तर तुरीकरिता केवळ १00 जणांचा क्रमांक लागतो. त्यातही एक लाख क्विंटल कापसाची खरेदी होणार असल्याची चर्चा आहे. जागेअभावी तूर खरेदी काही दिवसांकरिता बंद झाली. त्यामुळे संपूर्ण मालाची खरेदी होईल की नाही, अशी शंका उपस्थित होत आहे.

ठळक मुद्दे६६०७ शेतकऱ्यांनी केली ऑनलाईन नोंदणी, हंगामाचा खर्च भागविण्याची शेतकऱ्यांना लागली चिंता

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : येथील शासकीय शेतमाल खरेदी केंद्रावर कापूस आणि तुरीची खरेदी अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. खरीप हंगाम तोंडावर असताना विक्रीला आधीच विलंब होत आहे. त्यात बँक खात्यात पैसे जमा व्हायला वेळ लागतो. यामुळे हंगामाचा खर्च कसा भागवावा, याची चिंता शेतकऱ्यांना भेडसावू लागली आहे.तालुक्यात दुसऱ्या टप्प्यात ३ हजार १०७ शेतकऱ्यांनी कापूस, तर साडेतीन हजार शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केली. परंतु त्यामधील कापसाकरिता दररोज केवळ २०, तर तुरीकरिता केवळ १00 जणांचा क्रमांक लागतो. त्यातही एक लाख क्विंटल कापसाची खरेदी होणार असल्याची चर्चा आहे. जागेअभावी तूर खरेदी काही दिवसांकरिता बंद झाली. त्यामुळे संपूर्ण मालाची खरेदी होईल की नाही, अशी शंका उपस्थित होत आहे. येथे केवळ एकाच सेंटरवर सीसीआयकडून कापूस खरेदीला सुरुवात झाली. त्यातही आवक वाढल्याचे कारण पुढे करुन मध्येच खरेदी बंद झाली. ब्रेकनंतर खरेदी सुरु झाली.तीन ३ हजार १०७ शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे नोंदणी केली. आता दररोज केवळ २० कापूस गाड्यांचे मोजमाप होते. परंतु नोंदणी केलेल्यांची संख्या मोठी आहे. हीच गती राहिली तर पाच महिन्यातही खरेदी आटोपणार नाही. नाफेडतर्फे दारव्हा विविध कार्यकारी सोसायटीमार्फत सुरु करण्यात आलेल्या तूर खरेदीचीसुद्धा तीच अवस्था आहे. साडेतीन हजार शेतकऱ्यांनी नोंदणी झाली. एक हजार ८५८ शेतकऱ्यांची नोंदणी ऑनलाईन न होऊ शकल्याने पेंडींग आहे. दररोज चार ते पाच गाड्यांचे मोजमाप होते. सध्या जागेअभावी खरेदी बंद करण्यात आली. याप्रकारे शेतमालाची खरेदी होत असताना इकडे खरीप हंगाम तोंडावर आला. २४ मे पासून रोहिणी नक्षत्राला सुरवात होईल. त्यामुळे आत्तापासूनच शेतकऱ्यांना पेरणीचे वेध लागेल आहे. अशावेळी त्वरित मालाची विक्री होऊन हातात पैसे न पडल्यास शेतीचा खर्च कोठून लावावा, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. कापसाच्या दिवसाला किमान १00 गाड्या सोडल्या जाव्या, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सभापती अमोल राठोड, वहीद खान, प्रकाश उरकुडे आदींसह शेतकºयांनी केली आहे.सीमाबंदीचा फटकासंचारबंदीतून शेतमालाच्या खरेदी-विक्रीला सूट देण्यात आली. मात्र बाजार समितीच्या यार्डमध्ये शेतमालाचे लिलाव होत नाही. तसेच चांगली बाजारपेठ नाही. त्यामुळे शेतकरी शेतमाल शेजारच्या कारंजा येथे घेऊन जातात. मात्र सध्या जिल्हा बंदीमुळे शेतकऱ्यांना अडचण निर्माण झाली आहे. तसेच तालुक्यातील अनेक शेतकरी कारंजा येथे राहतात. त्यांची शेती येथे आहे. त्यांना येण्या-जाण्यासाठी अडचण निर्माण झाली. काहींची शेतजमीन मानोरा तालुक्यात येते. त्यांनाही शेतात जाता येत नाही. या शेतकऱ्यांना परवानगी मिळायला हवी, अशी अपेक्षा रामगावचे सुभाष साबु, चोरखोपडीचे माणिकचंद कांकरिया, दारव्हाचे सतीश गावंडे आदींनी व्यक्त केली.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड