शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
4
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
5
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
6
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
7
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
8
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
9
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
10
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
11
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
12
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
13
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
14
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
15
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
16
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
17
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
18
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
19
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
20
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा

दारव्हात सरकारी केंद्रावर कापूस, तूर खरेदी संथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 05:00 IST

तालुक्यात दुसऱ्या टप्प्यात ३ हजार १०७ शेतकऱ्यांनी कापूस, तर साडेतीन हजार शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केली. परंतु त्यामधील कापसाकरिता दररोज केवळ २०, तर तुरीकरिता केवळ १00 जणांचा क्रमांक लागतो. त्यातही एक लाख क्विंटल कापसाची खरेदी होणार असल्याची चर्चा आहे. जागेअभावी तूर खरेदी काही दिवसांकरिता बंद झाली. त्यामुळे संपूर्ण मालाची खरेदी होईल की नाही, अशी शंका उपस्थित होत आहे.

ठळक मुद्दे६६०७ शेतकऱ्यांनी केली ऑनलाईन नोंदणी, हंगामाचा खर्च भागविण्याची शेतकऱ्यांना लागली चिंता

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : येथील शासकीय शेतमाल खरेदी केंद्रावर कापूस आणि तुरीची खरेदी अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. खरीप हंगाम तोंडावर असताना विक्रीला आधीच विलंब होत आहे. त्यात बँक खात्यात पैसे जमा व्हायला वेळ लागतो. यामुळे हंगामाचा खर्च कसा भागवावा, याची चिंता शेतकऱ्यांना भेडसावू लागली आहे.तालुक्यात दुसऱ्या टप्प्यात ३ हजार १०७ शेतकऱ्यांनी कापूस, तर साडेतीन हजार शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केली. परंतु त्यामधील कापसाकरिता दररोज केवळ २०, तर तुरीकरिता केवळ १00 जणांचा क्रमांक लागतो. त्यातही एक लाख क्विंटल कापसाची खरेदी होणार असल्याची चर्चा आहे. जागेअभावी तूर खरेदी काही दिवसांकरिता बंद झाली. त्यामुळे संपूर्ण मालाची खरेदी होईल की नाही, अशी शंका उपस्थित होत आहे. येथे केवळ एकाच सेंटरवर सीसीआयकडून कापूस खरेदीला सुरुवात झाली. त्यातही आवक वाढल्याचे कारण पुढे करुन मध्येच खरेदी बंद झाली. ब्रेकनंतर खरेदी सुरु झाली.तीन ३ हजार १०७ शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे नोंदणी केली. आता दररोज केवळ २० कापूस गाड्यांचे मोजमाप होते. परंतु नोंदणी केलेल्यांची संख्या मोठी आहे. हीच गती राहिली तर पाच महिन्यातही खरेदी आटोपणार नाही. नाफेडतर्फे दारव्हा विविध कार्यकारी सोसायटीमार्फत सुरु करण्यात आलेल्या तूर खरेदीचीसुद्धा तीच अवस्था आहे. साडेतीन हजार शेतकऱ्यांनी नोंदणी झाली. एक हजार ८५८ शेतकऱ्यांची नोंदणी ऑनलाईन न होऊ शकल्याने पेंडींग आहे. दररोज चार ते पाच गाड्यांचे मोजमाप होते. सध्या जागेअभावी खरेदी बंद करण्यात आली. याप्रकारे शेतमालाची खरेदी होत असताना इकडे खरीप हंगाम तोंडावर आला. २४ मे पासून रोहिणी नक्षत्राला सुरवात होईल. त्यामुळे आत्तापासूनच शेतकऱ्यांना पेरणीचे वेध लागेल आहे. अशावेळी त्वरित मालाची विक्री होऊन हातात पैसे न पडल्यास शेतीचा खर्च कोठून लावावा, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. कापसाच्या दिवसाला किमान १00 गाड्या सोडल्या जाव्या, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सभापती अमोल राठोड, वहीद खान, प्रकाश उरकुडे आदींसह शेतकºयांनी केली आहे.सीमाबंदीचा फटकासंचारबंदीतून शेतमालाच्या खरेदी-विक्रीला सूट देण्यात आली. मात्र बाजार समितीच्या यार्डमध्ये शेतमालाचे लिलाव होत नाही. तसेच चांगली बाजारपेठ नाही. त्यामुळे शेतकरी शेतमाल शेजारच्या कारंजा येथे घेऊन जातात. मात्र सध्या जिल्हा बंदीमुळे शेतकऱ्यांना अडचण निर्माण झाली आहे. तसेच तालुक्यातील अनेक शेतकरी कारंजा येथे राहतात. त्यांची शेती येथे आहे. त्यांना येण्या-जाण्यासाठी अडचण निर्माण झाली. काहींची शेतजमीन मानोरा तालुक्यात येते. त्यांनाही शेतात जाता येत नाही. या शेतकऱ्यांना परवानगी मिळायला हवी, अशी अपेक्षा रामगावचे सुभाष साबु, चोरखोपडीचे माणिकचंद कांकरिया, दारव्हाचे सतीश गावंडे आदींनी व्यक्त केली.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड