शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

जीवन प्राधिकरणामुळे उडाली झोप

By admin | Updated: September 1, 2014 23:55 IST

जीवन प्राधिकरणच्या नळ सोडण्याची कुठलेही नियोजन नसल्याचे दिसून येते. वारंवार तक्रारी करूनही येथील अभियंते व कर्मचारी दाद देत नाही. जीवन प्राधिकरणच्या कारभाराने नागरिकांची झोप उडविली आहे.

यवतमाळ : जीवन प्राधिकरणच्या नळ सोडण्याची कुठलेही नियोजन नसल्याचे दिसून येते. वारंवार तक्रारी करूनही येथील अभियंते व कर्मचारी दाद देत नाही. जीवन प्राधिकरणच्या कारभाराने नागरिकांची झोप उडविली आहे. मध्यरात्री नळ येत असल्याने संपूर्ण रात्रच पाण्यासाठी जागून काढावी लागत आहे. दिवसा नळ सोडण्याबाबत वारंवार तक्रारी करूनही जीवन प्राधिकरणने आपल्या वेळेत बदल केला नाही.शहरातील पाणीपुरवठ्याची जबाबदारीही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे आहे. या कार्यालयात कुणाचाच पायपोस कुणाला नसल्याने नागरिकांचे मात्र हाल होत आहे. पाणी सोडण्याच्या वेळेचे नियोजन नसल्याने राजेंद्रनगर, गांधीनगर, नेहरूनगर, वंजारीफैल यासह इतरही भागातील नागरिकांची झोप उडाली आहे. या भागात मध्यरात्री नळ येतात. पाण्यासाठी नागरिकांना दिवसभर काम करूनही रात्र जागावी लागते. नळ आल्यानंतर मध्यरात्रीच पाणी भरावे लागते. विशेष म्हणजे दिवस उजाडताच या भागातील नळ बंद होतात. चार दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने नेमक्या कोणत्या रात्री नळ येणार हेही निश्चित नसते. प्रत्येक वेळा नळ आले का, हे तपासून पहावे लागते. आता तर नागरिकांनी नळ पाण्यासाठी परिसरातच पाळी ठरवून दिली आहे. नळ आल्याची माहिती फोनद्वारे आपल्या शेजाऱ्या, पाजाऱ्यांना दिली जाते. तेव्हाच पाणी भरण्याशिवाय पर्याय उरत नाही. जीवन प्राधिकरणाच्या शाखा अभियंत्याकडे या बाबत तक्रारी घेऊन गेलेल्या नागरिकांना तो भाग माझ्याकडे येत नाही, असे सांगून टोलवाटोलवी केली जाते. आता भर पावसाळ्यातही पिण्याच्या पाण्यासाठी रात्र जागविण्याची वेळ शहरातील नागरिकांवर आली आहे. जीवन प्रधिकरणने नळाच्या वेळेत बदल करावा, दिवसा कोणत्याही वेळेस नळ आले तर पाणी भरणे सहज शक्य आहे. मात्र याला प्रतिसाद न मिळाल्यास नागरिकांकडून उग्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. (कार्यालय प्रतिनिधी)