शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

सहा लाख शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 15:36 IST

Yawatmal News farmer दसऱ्यापूर्वी नुकसानभरपाई देण्याची घोषणा शासनाने केली होती. परंतु हा मुहूर्त टळला. आता किमान  दिवाळीपूर्वी तरी मदतीची ही रक्कम पदरी पडते काय, याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. 

ठळक मुद्देदसऱ्याचा मुहूर्त टळला, आता दिवाळीवर नजरा 

लोकमत न्यूज नेटवर्क

यवतमाळ : अतिवृष्टी व पुरामुळे पशिचम  विदर्भातील सहा लाख शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले आहे. त्यांना दसऱ्यापूर्वी नुकसानभरपाई देण्याची घोषणा शासनाने केली होती. परंतु हा मुहूर्त टळला. आता किमान  दिवाळीपूर्वी तरी मदतीची ही रक्कम पदरी पडते काय, याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. 

जून ते सप्टेंबर या चार महिन्यात अमरावती विभागात चार लाख ७५ हजार ९९ हेक्टरमधील सोयाबीन, कपाशी, मूग, उडीद या प्रमुख पिकाचे ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाले. सहा लाख आठ हजार ५३१ शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला. कृषी व महसूल विभागाने त्याचे पंचनामे केले. त्यावरून शासनाच्या निकषानुसार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई पोटी ३४० कोटी २५ लाख ५१ हजार रुपयांच्या रकमेची मागणी करण्यात आली आहे. या नुकसानीचा अहवाल अमरावतीचे विभागीय महसूल आयुक्त पीयूष सिंग यांनी २० सप्टेंबरला शासनाला सादर केला. त्यानंतर दोनच दिवसात अर्थात दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा होईल, अशी घोषणा सरकारने केली होती.  प्रत्यक्षात आजतागायत ही रक्कम जमा झाली नाही. किमान आता दिवाळीपूर्वी तरी ही रक्कम मिळावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. शासनाने मदतीची घोषणा केली. परंतु अद्याप त्या संबंधीचा शासन आदेश जारी करण्यात आलेला नाही.

सोलापूर, उस्मानाबादमुळे जीआर रखडला ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले. या नुकसानीचे वेगळे सर्वेक्षण केले जात आहे. सोलापूर व उस्मानाबाद  जिल्ह्यातील नुकसानीचे अहवाल शासनाला अद्याप प्राप्त न झाल्याने मदत वाटपासंबंधीचा शासन आदेश जारी करण्यात अडचण  निर्माण झाल्याची माहिती कृषी विभागातून देण्यात आली. पूर व अतिवृष्टीमुळे नुकसान झाले्ल्या जिरायती शेतीला हेक्टरी सहा हजार ८०० रुपये, बागायती शेतीला १३ हजार ५०० रुपये तर फळबागांना हेक्टरी १८ हजारांची मदत दिली जाते.

एकाच दिवशी ६५ मिमी पावसाच्या निकषाचा फटका शासकीय यंत्रणेने केलेल्या पंचनाम्यात अवघ्या ३४० कोटींचे नुकसान दाखविले गेले असले तरी प्रत्यक्षात हे नुकसान किती तरी अधिक आहे.  अतिवृष्टीत या नुकसानीसाठी एकाच दिवशी ६५ मिमी पेक्षा अधिक पाऊस हा निकष लावला जातो. परंतु प्रत्यक्षात ६५ मिमी पेक्षा कमी पाऊस होऊनही शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र या निकषामुळे शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहणार आहे. त्यामुळे ६५ मिमी पेक्षा कमी पाऊस झालेल्या ठिकाणांचे पंचनामेही करण्याची मागणी होत आहे.जून ते सप्टेंबर या काळात पूर, पाऊस व अतिवृष्टीमुळे कितीही नुकसान झाले तरी शेतकऱ्याला एकच वेळा नुकसान भरपाई दिली जाते. गाव आणि शेतकरी बदलला तरच नवे नावे यादीत समाविष्ट केले जाते. शासनाकडून लवकरच मदत वाटपाचा आदेश जारी होण्याची प्रतीक्षा आहे. - सुभाष नागरे, विभागीय सहसंचालक (कृषी), अमरावती

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती