शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

सहा तास सलग वीज कागदावरच

By admin | Updated: November 11, 2015 01:45 IST

शेतकऱ्यांना सलग सहा तासांची वीज देण्याचे आश्वासन वीज कंपनीने जिल्हा प्रशासनाला दिले.

जनतेत रोष : झिरो लोडशेडिंगच्या नावाखाली वीज गुलयवतमाळ : शेतकऱ्यांना सलग सहा तासांची वीज देण्याचे आश्वासन वीज कंपनीने जिल्हा प्रशासनाला दिले. त्याच्या अंमलबजावणीसाठी कृषिपंपावर १६ तासांऐवजी १८ तासांचे भारनियमन लादण्यात आले. प्रत्यक्षात सलग वीज पुरवठा झालाच नाही. यामुळे शेतकरी वैतागले आहेत. झिरो लोडशेडींगच्या नावाखाली सहा तासांमध्ये चार तास वीज गुल होत आहे. यामुळे रब्बी अखेरपर्यंत पोहोचणार किंवा नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.वीज वितरण कंपनीने कृषिपंपांना वीज पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र फिडर कार्यान्वीत केले. यावरून वीज पुरवठा करण्यात येतो. पूर्वी आठ तास वीज दिली जात होती. मात्र ती कागदावरच होती. या आठ तासात वारंवार वीज खंडीत होत होती. यामुळे दिवसभरात दोन तास वीज मिळणेही कठीण होते.यावर मात करण्यासाठी पालकमंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह आणि वीज वितरण कंपनीच्या मुंबईच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. यामध्ये आठ तासाऐवजी सलग सहा तास वीज देण्याचे आश्वासन वीज कंपनीने जिल्हा प्रशासनाला दिले. त्यानुसार वीज कंपनीने वेळापत्रकही जाहीर केले.यामध्ये तीन दिवस मध्यरात्री १२ ते ६ पर्यंत, तर पुढील तीन दिवस पहाटे ६ ते दुपारी १२ पर्यंत वीज पुरवठा करण्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दिवसा वीज पुरवठा करताना ६ तासांमध्ये ४ तास वीज गायब राहीली. पूर्वीप्रमाणे दोन तासही वीज मिळत नाही. वेळापत्रक बदलविल्यानंतरही कृषिपंपावरील विजेचा प्रश्न सुटला नाही. तो जसाच्या तसाच आहे. उलट शेतकऱ्यांच्या अडचणी आणखी वाढविल्या आहे. यामुळे ओलित करायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे रब्बीचे उद्दिष्ट पूर्ण होणार किंवा नाही, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.सिंचनाची सुविधा असणारे शेतकरी सिंचन करण्यासाठी धडपडत आहे. मात्र त्यांना वीज मिळत नाही. यामुळे ओलित करणे अवघड झाले आहे. यातून कृषी क्षेत्राचे आर्थिक गणित बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीने निदान स्वत:चेच वेळापत्रक पाळण्याची गरज आहे. (शहर वार्ताहर)