शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

सहा तास सलग वीज कागदावरच

By admin | Updated: November 11, 2015 01:45 IST

शेतकऱ्यांना सलग सहा तासांची वीज देण्याचे आश्वासन वीज कंपनीने जिल्हा प्रशासनाला दिले.

जनतेत रोष : झिरो लोडशेडिंगच्या नावाखाली वीज गुलयवतमाळ : शेतकऱ्यांना सलग सहा तासांची वीज देण्याचे आश्वासन वीज कंपनीने जिल्हा प्रशासनाला दिले. त्याच्या अंमलबजावणीसाठी कृषिपंपावर १६ तासांऐवजी १८ तासांचे भारनियमन लादण्यात आले. प्रत्यक्षात सलग वीज पुरवठा झालाच नाही. यामुळे शेतकरी वैतागले आहेत. झिरो लोडशेडींगच्या नावाखाली सहा तासांमध्ये चार तास वीज गुल होत आहे. यामुळे रब्बी अखेरपर्यंत पोहोचणार किंवा नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.वीज वितरण कंपनीने कृषिपंपांना वीज पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र फिडर कार्यान्वीत केले. यावरून वीज पुरवठा करण्यात येतो. पूर्वी आठ तास वीज दिली जात होती. मात्र ती कागदावरच होती. या आठ तासात वारंवार वीज खंडीत होत होती. यामुळे दिवसभरात दोन तास वीज मिळणेही कठीण होते.यावर मात करण्यासाठी पालकमंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह आणि वीज वितरण कंपनीच्या मुंबईच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. यामध्ये आठ तासाऐवजी सलग सहा तास वीज देण्याचे आश्वासन वीज कंपनीने जिल्हा प्रशासनाला दिले. त्यानुसार वीज कंपनीने वेळापत्रकही जाहीर केले.यामध्ये तीन दिवस मध्यरात्री १२ ते ६ पर्यंत, तर पुढील तीन दिवस पहाटे ६ ते दुपारी १२ पर्यंत वीज पुरवठा करण्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दिवसा वीज पुरवठा करताना ६ तासांमध्ये ४ तास वीज गायब राहीली. पूर्वीप्रमाणे दोन तासही वीज मिळत नाही. वेळापत्रक बदलविल्यानंतरही कृषिपंपावरील विजेचा प्रश्न सुटला नाही. तो जसाच्या तसाच आहे. उलट शेतकऱ्यांच्या अडचणी आणखी वाढविल्या आहे. यामुळे ओलित करायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे रब्बीचे उद्दिष्ट पूर्ण होणार किंवा नाही, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.सिंचनाची सुविधा असणारे शेतकरी सिंचन करण्यासाठी धडपडत आहे. मात्र त्यांना वीज मिळत नाही. यामुळे ओलित करणे अवघड झाले आहे. यातून कृषी क्षेत्राचे आर्थिक गणित बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीने निदान स्वत:चेच वेळापत्रक पाळण्याची गरज आहे. (शहर वार्ताहर)