शहरं
Join us  
Trending Stories
1
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
2
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
3
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
4
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
5
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
6
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
7
७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
8
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर
9
जखमी नवजोत सिंह आणि त्यांच्या पत्नीला २२ किलोमीटर दूर असलेल्या हॉस्पिटलमध्ये का घेऊन गेली गगनप्रीत? झाला खुलासा!
10
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
11
PM Modi Turns 75: वयाची ७५ वी अमृत महोत्सव म्हणून का साजरी केली जाते? सनातन धर्मात सापडते उत्तर 
12
ind vs oman: ओमानविरुद्धच्या सामन्याआधी भारतीय खेळाडूंनी मैदानात गाळला घाम, पाहा फोटो!
13
कॅनडातील वाणिज्य दूतावास ताब्यात घेणार; खलिस्तान समर्थकांची भारताला खुली धमकी...
14
"नक्कीच जुळं होणार", प्रिया बापटचा बेबी बंपचा व्हिडीओ पाहून चाहत्यांच्या कमेंट्स
15
२० वर्षांनंतर घेता येणार स्वेच्छा निवृत्ती, पण पूर्ण पेन्शनसाठी एवढ्या वर्षांची असणार अट
16
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
17
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
18
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
19
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
20
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 

दिग्रस शहरात सहा दिवसांआड मिळते पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 05:00 IST

शहराला नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे पाणी पुरविले जाते. यात महिन्यातून केवळ पाच दिवसच पाणीपुरवठा होतो. सहा दिवसांआड नळ येतात. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. महिन्यातील पाच दिवसांच्या पाण्यासाठी पालिकेकडून १७० रुपये पाणी कर वसूल केला जातो.

ठळक मुद्देदुष्काळाचे सावट : नांदगव्हाण धरणाचे पुनर्निर्माण थंडावले, पालिकेची अनास्था

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : शहराला सध्या सहा दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. उन्हाळ्यात ही स्थिती भयावह होण्याची शक्यता आहे. परिणामी शहरावर दुष्काळाचे सावट घोंगावत आहे.शहराला नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे पाणी पुरविले जाते. यात महिन्यातून केवळ पाच दिवसच पाणीपुरवठा होतो. सहा दिवसांआड नळ येतात. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. महिन्यातील पाच दिवसांच्या पाण्यासाठी पालिकेकडून १७० रुपये पाणी कर वसूल केला जातो. मात्र नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी पुरविण्यास पालिका अपयशी ठरत आहे. नगराध्यक्षांसह नगरसेवक उपाययोजना करीत नसल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.यावर्षी तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शहरातील धावंडा नदीला एकही पूर गेला नाही. परिणामी शहर व तालुका दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा आहे. मात्र नगरपरिषदेच्या मालकी हक्काचे असलेल्या नांदगव्हाण धरणाची पुनर्बांधणी रखडली आहे. गेल्या १४ वर्षांपासून धरणाची पुनर्बांधणी सुरूच आहे. अद्यापही काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे शहरवासीयांना पाणीटंचाईची झळ सोसावी लागत आहे. उन्हाळ्यात तर दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.नगरपरिषदेकडून गेल्या १४ वर्षांपासून नांदगव्हाण धरण पुनर्बांधणी सुरू असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे पालिकेच्या हलगर्जीपणानेच १४ वर्षांपूर्वी हे धरणे फुटले होते, असा जनतेचा आरोप आहे. ९ जुलै २००५ रोजी धरण फुटल्याने होत्याचे नव्हते झाले होते. महापुरात १२ निष्पाप बळी गेले होते. तेव्हापासून पुनर्बांधणी रखडली आहे. ‘सायफन’ पद्धतीचे हे धरण विना विजेने नगरपरिषदेच्या पाण्याच्या टाकीत पाणी पोहोचवत होते. आता धरणताच नाही, तर टाकीत पाणी कुठून येणार, असा प्रश्न आहे.धरणातील गौण खनिजाची चोरीनांदगव्हाण धरणातील गौण खनिज भर दिवसा चोरीस जात आहे. पुर्नबांधणीकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने चोरटे निर्धास्त झाले आहे. १२ कोटींचा निधी मिळूनही अद्याप काम पूर्ण झाले नाही. परिणामी धरणातून लाखो लीटर पाणी नाहक वाहून जात आहे. पुनर्बांधणीला आणखी किती वर्षे लागतील, असा प्रश्न जनतेला पडला आहे. शहरातील कृत्रिम पाणीटंचाई दूर करण्यासाठी आमदार संजय राठोड यांनी लक्ष देण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.

टॅग्स :Waterपाणी