शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

दिग्रस शहरात सहा दिवसांआड मिळते पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 05:00 IST

शहराला नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे पाणी पुरविले जाते. यात महिन्यातून केवळ पाच दिवसच पाणीपुरवठा होतो. सहा दिवसांआड नळ येतात. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. महिन्यातील पाच दिवसांच्या पाण्यासाठी पालिकेकडून १७० रुपये पाणी कर वसूल केला जातो.

ठळक मुद्देदुष्काळाचे सावट : नांदगव्हाण धरणाचे पुनर्निर्माण थंडावले, पालिकेची अनास्था

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : शहराला सध्या सहा दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. उन्हाळ्यात ही स्थिती भयावह होण्याची शक्यता आहे. परिणामी शहरावर दुष्काळाचे सावट घोंगावत आहे.शहराला नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे पाणी पुरविले जाते. यात महिन्यातून केवळ पाच दिवसच पाणीपुरवठा होतो. सहा दिवसांआड नळ येतात. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. महिन्यातील पाच दिवसांच्या पाण्यासाठी पालिकेकडून १७० रुपये पाणी कर वसूल केला जातो. मात्र नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी पुरविण्यास पालिका अपयशी ठरत आहे. नगराध्यक्षांसह नगरसेवक उपाययोजना करीत नसल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.यावर्षी तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शहरातील धावंडा नदीला एकही पूर गेला नाही. परिणामी शहर व तालुका दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा आहे. मात्र नगरपरिषदेच्या मालकी हक्काचे असलेल्या नांदगव्हाण धरणाची पुनर्बांधणी रखडली आहे. गेल्या १४ वर्षांपासून धरणाची पुनर्बांधणी सुरूच आहे. अद्यापही काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे शहरवासीयांना पाणीटंचाईची झळ सोसावी लागत आहे. उन्हाळ्यात तर दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.नगरपरिषदेकडून गेल्या १४ वर्षांपासून नांदगव्हाण धरण पुनर्बांधणी सुरू असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे पालिकेच्या हलगर्जीपणानेच १४ वर्षांपूर्वी हे धरणे फुटले होते, असा जनतेचा आरोप आहे. ९ जुलै २००५ रोजी धरण फुटल्याने होत्याचे नव्हते झाले होते. महापुरात १२ निष्पाप बळी गेले होते. तेव्हापासून पुनर्बांधणी रखडली आहे. ‘सायफन’ पद्धतीचे हे धरण विना विजेने नगरपरिषदेच्या पाण्याच्या टाकीत पाणी पोहोचवत होते. आता धरणताच नाही, तर टाकीत पाणी कुठून येणार, असा प्रश्न आहे.धरणातील गौण खनिजाची चोरीनांदगव्हाण धरणातील गौण खनिज भर दिवसा चोरीस जात आहे. पुर्नबांधणीकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने चोरटे निर्धास्त झाले आहे. १२ कोटींचा निधी मिळूनही अद्याप काम पूर्ण झाले नाही. परिणामी धरणातून लाखो लीटर पाणी नाहक वाहून जात आहे. पुनर्बांधणीला आणखी किती वर्षे लागतील, असा प्रश्न जनतेला पडला आहे. शहरातील कृत्रिम पाणीटंचाई दूर करण्यासाठी आमदार संजय राठोड यांनी लक्ष देण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.

टॅग्स :Waterपाणी