शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

जिल्ह्यात मुस्लीम बांधवांचा मूक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 06:00 IST

धर्माला कायद्याचा आधार बनविणाऱ्या सदर विधेयकाचा मुस्लीम बांधवांनी निषेध केला. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथून आलेल्या नागरिकांना नागरिकत्व सिद्ध करावे लागणार आहे. धर्माच्या आधारावरील हे विधेयक विभाजन करणारे आहे असा आरोप मुस्लीम बांधवांनी केला. देशाचे स्वतंत्रता आंदोलन राष्ट्रनिर्मितीच्या विचारातून सुरू झाले. संविधानाने सर्वधर्मीयांना समान अधिकार प्रदान केले आहे.

ठळक मुद्देनागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध : यवतमाळ, पुसद, दारव्हा, दिग्रसमध्ये एल्गार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : केंद्र शासनाने संसदेत मांडलेले नागरिकत्व सुधारणा विधेयक-२०१९ दोन्ही सभागृहांनी मंजूर केले. सदर विधेयक मागे घेण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी जिल्ह््यात ठिकठिकाणी मुस्लीम बांधवांनी मूक मोर्चा काढला. मोर्चेकऱ्यांनी प्रशासनामार्फत विधेयक मागे घेण्यासाठी राष्ट्रपतींना निवेदन पाठविले.धर्माला कायद्याचा आधार बनविणाऱ्या सदर विधेयकाचा मुस्लीम बांधवांनी निषेध केला. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथून आलेल्या नागरिकांना नागरिकत्व सिद्ध करावे लागणार आहे. धर्माच्या आधारावरील हे विधेयक विभाजन करणारे आहे असा आरोप मुस्लीम बांधवांनी केला. देशाचे स्वतंत्रता आंदोलन राष्ट्रनिर्मितीच्या विचारातून सुरू झाले. संविधानाने सर्वधर्मीयांना समान अधिकार प्रदान केले आहे. मात्र या विधेयकामुळे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी धर्माचा उपयोग केला जाणार आहे. हे विधेयक संविधानाच्या मूळ कायद्याशी विसंगत आहे. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १४ व १५ नुसार सर्वांना समानता बहाल करण्यात आली. त्यात राज्य किंवा व्यक्तीला त्याच्या धर्म, जाती अथवा पंथ या आधारावर कायद्यानुसार भेदभाव करण्यास प्रतिबंध लावला आहे. मात्र या अनुच्छेदाचे या विधेयकामुळे उल्लंघन होत आहे. त्यामुळे सदर विधेयक संविधानाच्या गाभ्याला आणि नियमाला ठेच पोहोचविणारे ठरत असल्याचा आरोप मुस्लीम बांधवांनी केला आहे.या विधेयकाचा आम्ही स्वीकार करणार नाही, अशा भावना मुस्लीम बांधवांनी व्यक्त केल्या. सदर विधेयक राष्टÑपतींनी त्वरित रद्द करावे अशी मागणीही समाज बांधवांनी केली. न्यायप्रेमी आणि धर्मनिरपेक्ष नागरिकांनी या विधेयकाचा निषेध नोंदवून ते कार्यान्वित होऊ नये यासाठी प्रयत्न करावे असे आवाहनही मुस्लीम बांधवांनी केले आहे.विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी यवतमाळसह पुसद, दारव्हा, दिग्रस, नेर, महागाव, राळेगाव, मारेगाव आदी ठिकाणी जमीअत उलेमा हिंद, मिल्ली माहाज आदी संघटनांच्या नेतृत्वात मुस्लीम बांधवांनी मूक मोर्चा काढला. या मोर्चांमध्ये समाजाच्या धर्मगुरु व मान्यवरांच्या नेतृत्वात मुस्लीम बांधवांनी विधेयकाचा निषेध केला. ठिकठिकाणी प्रशासनामार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविले. यवतमाळ येथे कळंब चौकातून मूक मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चात जमीअत ए उल्माए हिंद, जमाअत -ए-इस्लामी हिंद, स्टुडंटस् इस्लामिक आॅर्गनायझेशन आॅफ इंडिया, वहदते इस्लामी हिंद, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, अखिल भारतीय तेली महासंघ, मौलाना आझाद विचार मंच, वंचित बहुजन आघाडी, नाग संघटन, भारताचे संविधान रक्षक दल आदी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कळंब चौकातून निघालेला हा मोर्चा टांगा चौक, अप्सरा टॉकीज, पाचकंदील चौक मार्गे आझाद मैदानात पोहोचला. तेथे मोर्चाचे सभेत रुपांतर झाले.सभेला मान्यवरांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर एका शिष्टमंडळाने राष्ट्रपतींच्या नावे असलेले निवेदन प्रभारी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना सादर केले.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकMuslimमुस्लीम