शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
5
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
6
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
7
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
8
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
9
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
10
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
11
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
12
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
13
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
14
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
15
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
16
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
17
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
18
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
19
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
20
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान

नंदीग्राम एक्स्प्रेस वणीकरांचा कायमचा निरोप घेण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2022 05:00 IST

नंदीग्राम एक्सप्रेस सद्य:स्थितीत बंद आहे. त्यामुळे मुंबई किंवा औरंगाबादला जाण्यासाठी प्रवाशांना इतर वाहतुकीच्या साधनांचा वापर करावा लागत आहे. नंदीग्राम एक्सप्रेस अदिलाबादपासून पुढे मुंबईपर्यंत सध्या प्रवासी वाहतूक करीत आहे. या भागातील प्रवाशांना अदिलाबादपर्यंत पोहोचविण्यासाठी मेमू ट्रेन सुरू करण्याच्या हालचाली रेल्वे प्रशासन करीत असल्याची माहिती मिळाली.

संतोष कुंडकरलोकमत न्यूज नेटवर्कवणी : दोन वर्षांपासून बंद असलेली नंदीग्राम एक्सप्रेस वणीकरांचा कायमचा निरोप घेण्याच्या मार्गावर आहे. गेल्या काही वर्षात माजरी ते अदिलाबाद मार्गावर या रेल्वेला तोटा सहन करावा लागल्याने रेल्वे प्रशासन निर्णय घेण्याच्या मानसिकतेत असल्याचे बोलले जात आहे. पूर्वी रेल्वेची वणीमार्गे प्रवासी वाहतूक नव्हती. परंतु २२ मार्च २००७ रोजी नंदीग्राम एक्सप्रेसला वणी थांबा मिळाला. त्यामुळे वणी येथून अदिलाबाद, नांदेड, औरंगाबाद व मुंबई येथे जाण्यासाठी प्रवाशांना सोयीस्कर झाले होते. वणी येथून अनेक प्रवासी या नंदीग्राम एक्सप्रेसने प्रवास करीत होते. नागपूरहून निघणारी ही रेल्वे वर्धा, माजरी येथूनही प्रवासी घेऊन पुढे जात होती. कोरोना काळात ही रेल्वे बंद करण्यात आली. ती बंदच आहे.

मेमू ट्रेन सुरू करण्याच्या हालचाली नंदीग्राम एक्सप्रेस सद्य:स्थितीत बंद आहे. त्यामुळे मुंबई किंवा औरंगाबादला जाण्यासाठी प्रवाशांना इतर वाहतुकीच्या साधनांचा वापर करावा लागत आहे. नंदीग्राम एक्सप्रेस अदिलाबादपासून पुढे मुंबईपर्यंत सध्या प्रवासी वाहतूक करीत आहे. या भागातील प्रवाशांना अदिलाबादपर्यंत पोहोचविण्यासाठी मेमू ट्रेन सुरू करण्याच्या हालचाली रेल्वे प्रशासन करीत असल्याची माहिती मिळाली. 

अधिकृत दुजाेरा नाहीनंदीग्राम एक्सप्रेस कायमस्वरूपी बंद होणार, याबाबतची माहिती देण्यास आम्ही असमर्थ आहो. याबाबत आपण रेल्वेच्या पीआरओ कार्यालयाशी संपर्क साधावा.        - शिवशंकर सिंग, स्टेशन मास्टर, वणी.

सर्वसामान्यांना बसतोय फटका वणी येथून अदिलाबाद, नांदेड, औरंगाबाद, मुंबई येथे जाण्यासाठी नंदीग्राम एक्सप्रेस ही रेल्वे सोयीची होती. माफक दरात या रेल्वेने प्रवास करता येत होता. मात्र आता ही रेल्वे बंद आहे.

 प्रवासी म्हणतात... 

व्यापाराच्या दृष्टीने मी वणी येथून नेहमीच नंदीग्राम एक्सप्रेसने अदिलाबाद किंवा नांदेड येथे जात होतो. परंतु गेल्या दोन वर्षांपासून ही रेल्वे बंद असल्याने ट्रॅव्हल्सने प्रवास करावा लागत आहे. यातून आर्थिक फटकाही बसत आहे. त्यामुळे वणी येथून रेल्वेसेवा अतिशय आवश्यक झाली आहे.     - पराग हनुमंते, प्रवासी.

नंदीग्राम एक्सप्रेस विद्यार्थ्यांच्या दृष्टीनेही अतिशय सोयीची होती. वणी येथील अनेक विद्यार्थी नांदेड, औरंगाबाद, मुंबई याठिकाणी शिक्षणासाठी जातात. आमच्या पाल्यांना संबंधित ठिकाणी पोहोचविण्यासाठी आम्हीही सोबत जात होतो. नंदीग्राम रेल्वे बंद असल्याने गैरसोय होत आहे.     - प्रभाकर डाखरे, प्रवासी.

 

टॅग्स :railwayरेल्वे