शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
3
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
4
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
5
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
6
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
7
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
8
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
9
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
10
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
11
Secret Santa : अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
12
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
13
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
14
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
15
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
16
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
17
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
18
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
19
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
20
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
Daily Top 2Weekly Top 5

नंदीग्राम एक्स्प्रेस वणीकरांचा कायमचा निरोप घेण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2022 05:00 IST

नंदीग्राम एक्सप्रेस सद्य:स्थितीत बंद आहे. त्यामुळे मुंबई किंवा औरंगाबादला जाण्यासाठी प्रवाशांना इतर वाहतुकीच्या साधनांचा वापर करावा लागत आहे. नंदीग्राम एक्सप्रेस अदिलाबादपासून पुढे मुंबईपर्यंत सध्या प्रवासी वाहतूक करीत आहे. या भागातील प्रवाशांना अदिलाबादपर्यंत पोहोचविण्यासाठी मेमू ट्रेन सुरू करण्याच्या हालचाली रेल्वे प्रशासन करीत असल्याची माहिती मिळाली.

संतोष कुंडकरलोकमत न्यूज नेटवर्कवणी : दोन वर्षांपासून बंद असलेली नंदीग्राम एक्सप्रेस वणीकरांचा कायमचा निरोप घेण्याच्या मार्गावर आहे. गेल्या काही वर्षात माजरी ते अदिलाबाद मार्गावर या रेल्वेला तोटा सहन करावा लागल्याने रेल्वे प्रशासन निर्णय घेण्याच्या मानसिकतेत असल्याचे बोलले जात आहे. पूर्वी रेल्वेची वणीमार्गे प्रवासी वाहतूक नव्हती. परंतु २२ मार्च २००७ रोजी नंदीग्राम एक्सप्रेसला वणी थांबा मिळाला. त्यामुळे वणी येथून अदिलाबाद, नांदेड, औरंगाबाद व मुंबई येथे जाण्यासाठी प्रवाशांना सोयीस्कर झाले होते. वणी येथून अनेक प्रवासी या नंदीग्राम एक्सप्रेसने प्रवास करीत होते. नागपूरहून निघणारी ही रेल्वे वर्धा, माजरी येथूनही प्रवासी घेऊन पुढे जात होती. कोरोना काळात ही रेल्वे बंद करण्यात आली. ती बंदच आहे.

मेमू ट्रेन सुरू करण्याच्या हालचाली नंदीग्राम एक्सप्रेस सद्य:स्थितीत बंद आहे. त्यामुळे मुंबई किंवा औरंगाबादला जाण्यासाठी प्रवाशांना इतर वाहतुकीच्या साधनांचा वापर करावा लागत आहे. नंदीग्राम एक्सप्रेस अदिलाबादपासून पुढे मुंबईपर्यंत सध्या प्रवासी वाहतूक करीत आहे. या भागातील प्रवाशांना अदिलाबादपर्यंत पोहोचविण्यासाठी मेमू ट्रेन सुरू करण्याच्या हालचाली रेल्वे प्रशासन करीत असल्याची माहिती मिळाली. 

अधिकृत दुजाेरा नाहीनंदीग्राम एक्सप्रेस कायमस्वरूपी बंद होणार, याबाबतची माहिती देण्यास आम्ही असमर्थ आहो. याबाबत आपण रेल्वेच्या पीआरओ कार्यालयाशी संपर्क साधावा.        - शिवशंकर सिंग, स्टेशन मास्टर, वणी.

सर्वसामान्यांना बसतोय फटका वणी येथून अदिलाबाद, नांदेड, औरंगाबाद, मुंबई येथे जाण्यासाठी नंदीग्राम एक्सप्रेस ही रेल्वे सोयीची होती. माफक दरात या रेल्वेने प्रवास करता येत होता. मात्र आता ही रेल्वे बंद आहे.

 प्रवासी म्हणतात... 

व्यापाराच्या दृष्टीने मी वणी येथून नेहमीच नंदीग्राम एक्सप्रेसने अदिलाबाद किंवा नांदेड येथे जात होतो. परंतु गेल्या दोन वर्षांपासून ही रेल्वे बंद असल्याने ट्रॅव्हल्सने प्रवास करावा लागत आहे. यातून आर्थिक फटकाही बसत आहे. त्यामुळे वणी येथून रेल्वेसेवा अतिशय आवश्यक झाली आहे.     - पराग हनुमंते, प्रवासी.

नंदीग्राम एक्सप्रेस विद्यार्थ्यांच्या दृष्टीनेही अतिशय सोयीची होती. वणी येथील अनेक विद्यार्थी नांदेड, औरंगाबाद, मुंबई याठिकाणी शिक्षणासाठी जातात. आमच्या पाल्यांना संबंधित ठिकाणी पोहोचविण्यासाठी आम्हीही सोबत जात होतो. नंदीग्राम रेल्वे बंद असल्याने गैरसोय होत आहे.     - प्रभाकर डाखरे, प्रवासी.

 

टॅग्स :railwayरेल्वे