शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

शिशिराला अलविदा म्हणत सजतोयं पानगळतीचा सोहळा...!

By admin | Updated: March 3, 2017 01:57 IST

हळव्या मनाने शिशिराला निरोप देणाऱ्या वृक्षराजींना आता हिरवाईची आस लागली आहे.

वसंताची चाहूल : वृक्षराजींना हिरवाईचे डोहाळेसंतोष कुंडकर  वणी हळव्या मनाने शिशिराला निरोप देणाऱ्या वृक्षराजींना आता हिरवाईची आस लागली आहे. दूर रानात पानगळतीचा भावविभोर सोहळा साजरा होत असतानाच पर्णगळतीने व्याकूळ झालेले रान हिरवा शालू पांघरण्यासाठी तेवढेच आतुरही झाले आहे. शिशिराचं निरोप घेणं जेवढं वेदनादायी, तेवढच उदासवेड्या वनराईसाठी हिरवेपणाचं आंदण घेऊन येणाऱ्या वसंत ऋतूचं आगमनही मोहरून टाकणारं असतं. अशा दुहेरी संदर्भानं सजलेला पानगळतीचा हा भावविभोर सोहळा मात्र मनामनातील उदास भावना अधिकच गहिऱ्या करतो. शरदाच्या चांदण्यातील गुलाबी गारव्याची अपूर्वाई अनुभवल्यानंतर निसर्गाला वसंत ऋतूची चाहूल लागते. याच मोसमात झाडावेलींवरील पानांचं गळून पडणं अन् मग पुन्हा कोळव्या पानांनी झाडावेलींना सजविण्याचा बहारदार सोहळा रंगत असताना रानवाटा मात्र एक अनामिक दु:खानं गहिवरल्या असतात. वसंत ऋतूत झाडांना नवी पालवी फुटू लागली की, दूर रानात कोकीळेच्या कंठातून अस्वस्थ करणाऱ्या कातर स्वरांनी सारी धरित्री शहारून उठते. याच मोसमात रान सजते ते पळसफुलांनी. निसर्गाशी पळसफुलांचं नातही तसं अतुटच. वसंताची चाहूल लागली की, पळसवृक्षांनाही पानगळतीचे डोहाळे लागतात अन् मग पळसवृक्ष बहरून येतो लालचुटूक फुलांनी...! पळसवृक्षही निसर्गावर लाल-केशरी रंगाची मुक्त उधळण करतात. फाल्गुनातील रंगोत्सव हा तसा साऱ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय. रंगोत्सव अन् पळसफुलांचं नातंही त्यांच्या रंगाईतकचं गहिरं...! पानगळ सुरू असतानाच रानावनातील पळसवृक्षही अग्नीफुलांचा साज लेवून वसंत ऋतूच्या स्वागतासाठी सज्ज असतात अन् मग लालगहिऱ्या रक्तफुलांनी नटलेली ही वनराजी अधिकच देखणी वाटू लागते.