शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनीला दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 21:52 IST

ट्रॅक्टर चोरी गेल्याची माहिती उशिरा दिल्याचे कारण पुढे करत विमा दावा नाकारणाऱ्या श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनीला ग्राहक न्यायालयाने दंड ठोठावला आहे. बाभूळगाव तालुक्याच्या नायगाव येथील धीरज उत्तमराव भितकर यांनी दाखल केलेल्या तक्रारप्रकरणात हा निर्णय देण्यात आला आहे.

ठळक मुद्देग्राहक न्यायालय : ट्रॅक्टर चोरी प्रकरणात दावा नाकारला

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ट्रॅक्टर चोरी गेल्याची माहिती उशिरा दिल्याचे कारण पुढे करत विमा दावा नाकारणाऱ्या श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनीला ग्राहक न्यायालयाने दंड ठोठावला आहे. बाभूळगाव तालुक्याच्या नायगाव येथील धीरज उत्तमराव भितकर यांनी दाखल केलेल्या तक्रारप्रकरणात हा निर्णय देण्यात आला आहे.धीरज भितकर यांच्या ट्रॅक्टरचा विमा काढण्यात आला होता. ट्रॅक्टर चोरी गेल्याने त्यांनी पोलिसात तक्रार दिली. यानंतर विमा कंपनीकडे क्लेम मागितला. मात्र देण्यास टाळाटाळ सुरू झाली. त्यामुळे त्यांनी जिल्हा ग्राहक न्यायालयात धाव घेतली. तक्रारीवर युक्तिवादादरम्यान विमा कंपनीने आपल्याकडे तक्रार उशिरा आल्याची बाजू मांडली. मात्र वाहन चोरी गेल्यास पोलिसांकडूनच आधी शोध घेण्याचा सल्ला दिला जातो. हीच बाब भितकर यांच्याविषयी घडली. त्यांची तक्रार सात दिवसानंतर नोंदवून घेतली. तेथून दोन दिवसानंतर विमा कंपनीला माहिती दिली. पॉलिसीच्या अटीचे उल्लंघन करण्यात आले असे सांगत भितकर यांना क्लेम नाकारला होता.विमा कंपनीने हलगर्जीपणा व अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केल्याच्या निर्णयाप्रत मंच पोहोचले. कंपनीने भितकर यांना विमा दाव्याची रक्कम रुपये दोन लाख सव्याज द्यावी, शारीरिक व मानसिक त्रासापोटी २० हजार आणि तक्रार खर्चाचे पाच हजार रुपये द्यावे, असा आदेश दिला.यवतमाळ जिल्हा ग्राहक न्यायालयाचे अध्यक्ष रवींद्र नगरे, सदस्य अ‍ॅड. आश्लेषा दिघाडे व रमेशबाबू सिलिवेरी यांनी हा निर्णय दिला आहे.

टॅग्स :Courtन्यायालय