शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

जिल्ह्यातील ३४२ लघुसिंचन तलावांमध्ये ठणठणाट

By admin | Updated: April 18, 2017 00:02 IST

जिल्ह्यात पावसाने यंदा वार्षिक सरासरी ओलांडली. सर्व सिंचन प्रकल्प ओव्हर-फ्लो झाले. उन्हाळ्यात पाणी टंचाईपासून मुक्ती मिळेल अशी आशा होती.

रूपेश उत्तरवार यवतमाळजिल्ह्यात पावसाने यंदा वार्षिक सरासरी ओलांडली. सर्व सिंचन प्रकल्प ओव्हर-फ्लो झाले. उन्हाळ्यात पाणी टंचाईपासून मुक्ती मिळेल अशी आशा होती. प्रत्यक्षात उन्हाळा सुरू होताच जिल्ह्यातील ३४२ तलाव कोरडे पडले. तर चार लघु प्रकल्पातही ठणठणाट निर्माण झाला आहे. यामुळे पाटबंधारे विभागही अवाक झाला आहे. परिणामी नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलस्त्रोत वृद्धिंगत करण्यात आले. पावसाचे पाणी संचित करण्यात मोठ्या प्रमाणात यश आले. मात्र हा जलसाठा अधिक काळ टिकला नाही. यातून जिल्ह्यात पाणी टंचाईचा नवा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत ६९ सिंचन तलाव आहेत. यात २९ हजार ६२५ टीसीएम पाणी साठा होतो. आता ३५ तलाव कोरडे पडले असून ३४ तलावामध्ये २० टक्के जलसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यात २५० पाझर तलाव आहेत. यात ६३ हजार ५९८ टीसीएम जलसाठा होता. आता २०० तलाव कोरडे पडले आहे. ५० तलावात १५ टक्के पाणी आहे. ५ साठवण तलावात ९५२ टीसीएम पाणी साठा होतो. दोन तलावात केवळ २० टक्के पाणी आहे. ५५ गाव तलावांची क्षमता पाच हजार ३४८ टीसीएमची आहे. हे तलाव कोरडे पडले आहे. ५० ब्रिटीशकालीन तलावाची सिंचन क्षमता चार हजार ६९६ टीसीएम असून सर्व तलाव सध्या कोरडे पडले आहेत. अशीच अवस्था पाटबंधारे विभागातील सिंचन तलावांची आहे. हे प्रकल्प पावसाळ्यात ओव्हर फ्लो झाले होते. आता या प्रकल्पात सरासरी २९.३७ टक्के पाणी आहे. गत सात महिन्यात प्रकल्पातील ७१ टक्के पाणी रिकामे झाले. तर अनेक लघु प्रकल्प तळ गाठण्याच्या स्थितीत आहे. ६२ पैकी चार लघु प्रकल्प कोेरडे पडले आहेत. यामध्ये नेर, रूई, किन्ही आणि बोरडा प्रकल्पाचा समावेश आहे. मोठ्या पूस प्रकल्पात ३०.२१ टक्के जलसाठा आहे. मध्यम प्रकल्पात ३४.६१ टक्के पाणी शिल्लक आहे. ६२ लघु प्रकल्पात केवळ २१ टक्के पाणी शिल्लक राहीले आहे.