शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

श्रावणबाळ ! कुणीही या, अनुदान घ्या!

By admin | Updated: November 18, 2015 02:37 IST

निराधारांना आधार मिळावा म्हणून शासनाने सुरू केलेल्या श्रावणबाळ योजनेत आर्णी तालुक्यात कुणीही यावे आणि अनुदान घेऊन जावे, असा प्रकार सुरू आहे.

यवतमाळ : निराधारांना आधार मिळावा म्हणून शासनाने सुरू केलेल्या श्रावणबाळ योजनेत आर्णी तालुक्यात कुणीही यावे आणि अनुदान घेऊन जावे, असा प्रकार सुरू आहे. त्यामुळे अपात्र लाभार्थी शासकीय निधी लाटत असून तब्बल साडेचार हजार लाभार्थ्यांची कागदपत्रेच प्रशासनाकडे उपलब्ध नाही. मात्र, या साडेचार हजार लोकांना श्रावणबाळ योजनेचा लाभ मिळत आहे.समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आयुष्यच्या उत्तरार्धात आधार मिळावा म्हणून श्रावणबाळ योजना राबविली जाते. तालुकास्तरावर नेमल्या जाणाऱ्या संजय गांधी निराधार योजना समितीकडून पात्र लाभार्थ्यांची निवड केली जाते. मात्र, आर्णी तालुक्याच्या समितीने अनेक अपात्र लाभार्थ्यांची निवड केल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. यासंदर्भात विभागीय आयुक्तांकडे तक्रार करण्यात आल्यानंतर विभागीय आयुक्तांनी नोंदविलेले निरीक्षण गंभीर आहे. आर्णी तालुक्यात श्रावणबाळ योजनेत ७ हजार ४८५ लाभार्थ्यांना दर महिन्याला अनुदान दिले जात आहे. मात्र, यातील तब्बल ४ हजार ५५४ लाभार्थ्यांची प्रकरणेच तहसील कार्यालयात उपलब्ध नाहीत. केवळ २ हजार ९३१ प्रकरणे उपलब्ध आहेत. मात्र साडेहजार लाभार्थ्यांची कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे सांगणारे प्रशासन या लाभार्थ्यांना अनुदान वितरित करीत आहे. त्यामुळे या लाभार्थ्यांच्या पात्रतेबाबत संशय निर्माण झाला आहे. त्यामुळेच संजय गांधी निराधार योजना विभागाकडे आर्णी तहसीलदारांचे दुर्लक्ष असल्याचे विभागीय आयुक्तांनी नमूद केले आहे. आर्णी तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे अध्यक्ष ज्या शेंदूरसनी गावातील आहेत, त्याच गावातील लाभार्थ्यांबाबत गावकऱ्यांनी शंका उपस्थित केली आहे. येथील पात्र लाभार्थ्यांना डावलून अपात्रांना लाभ दिल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. समितीची २० आॅगस्ट २०१४ रोजी झालेली बैठकही संशयाच्या भोवऱ्यात आहे. या बैठकीत मंजुरीसाठी श्रावणबाळ योजनेची ४१२ प्रकरणे आली. मात्र, बैठकीत मंजूर यादीतील लाभार्थ्यांची संख्या ४२३ आहे. काही लाभार्थी समितीने मनमानी पद्धतीने यादीत घुसडल्याची शक्यता आहे. बैठकीच्या इतिवृत्त लिहिताना मंजूर आणि नामंजूर अर्जांच्या संख्येचा रकाना कोरा ठेवण्यात आला. बैठकीनंतर लाभार्थ्यांची यादी मनमानीपणे फिरविण्यासाठी वाव असावा म्हणूनच हा खटाटोप करण्यात आल्याचा आरोप होत आहे. अनेक लाभार्थ्यांचे वय अधिक दाखविण्यात आले, शेती असलेल्यांनाही योजनेचा लाभ देण्यात आला, काही जणांचे उत्पन्नाचे दाखले संशयास्पद आहे. आणी संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष शेंदूरसनीचे आहेत. याच गावातील रमाकांत कोल्हे यांनी माहिती अधिकारातून पात्र-अपात्र लाभार्थ्यांची माहिती उघड केली आहे. तर रमाकांत कोल्हे आणि कुणाल आठवले यांनी या प्रकरणातील सत्य शोधण्यासाठी पाठपुरावा चालविला आहे. मात्र, वर्ष उलटूनही त्यांना दाद मिळत नाही. त्यामुळे त्यांनी या प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतरही आर्णी तहसीलकडून चौकशी करण्यात आलेली नाही. (स्थानिक प्रतिनिधी)