शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

बेंबळाच्या कामात ‘शॉर्ट’कट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 00:26 IST

चापडोह, निळोणा आणि गोकीची साथ संपण्यापूर्वी बेंबळाचे पाणी यवतमाळात आणण्याचे प्राधिकरणाचे प्रयत्न सुरू आहे. यासाठी ‘शॉर्ट’कट मारले जात आहे.

ठळक मुद्देशुद्धीकरणाशिवाय पोहोचणार पाणी : तातडीच्या उपायांवर भर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : चापडोह, निळोणा आणि गोकीची साथ संपण्यापूर्वी बेंबळाचे पाणी यवतमाळात आणण्याचे प्राधिकरणाचे प्रयत्न सुरू आहे. यासाठी ‘शॉर्ट’कट मारले जात आहे. जॅकवेलवर स्लॅबऐवजी बिम टाकून मोटर बसविली जाणार आहे. पाण्याचे शुध्दीकरण निळोणा आणि चापडोहच्या केद्रांवर होणार आहे. याशिवाय आणखी काही तातडीच्या उपाययोजना हाती घेतल्या जाणार आहे.यवतमाळ शहराला २४ तास पाण्यासाठी ३०२ कोटींची ‘अमृत’ योजना हाती घेण्यात आली आहे. पाणी टंचाई लक्षात घेता या योजनेचे पाणी शक्य तितक्या लवकर आणण्याचे प्रयत्न केले जात आहे. सध्या बेंबळा प्रकल्पावर जॅकवेलचा शेवटचा बिम बांधणे सुरू आहे. त्यावर सध्या ५७० एचपीचे दोन पंप बसविले जाणार आहे. यासाठी स्लॅबचे काम थांबविण्यात आले आहे. तातडीची उपाययोजना म्हणून हा प्रयत्न केला जात असल्याचे या विभागाने प्रकल्पाच्या भेटीदरम्यान सांगितले. वीज वितरण कंपनीने १५ एप्रिलपर्यंत वीज पुरवठा देण्याचे आश्वासन दिले असल्याचे सांगण्यात आले.बेंबळा प्रकल्पातून आणलेले पाणी थेट टाकळीच्या सम्पमध्ये घेतले जाणार आहे. तेथून आठ किमीची पाईपलाईन टाकावी लागणार आहे. तेथून निळोणा येथील शुद्धीकरण केंद्रावर जाईल.शुध्दीकरण झालेले पाणी परत प्राधिकरणातील टाकीत आणून शहरात वितरित केले जाणार आहे. या सर्व प्रक्रिया होण्यासाठी विलंब लागत असल्याने ‘अमृत’चे पाणी लाबणीवर पडल्याच्या बाबीला प्रत्यक्ष भेटीत दुजोरा मिळाला आहे.

टॅग्स :Bembla Damबेंबळा धरण