शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
2
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
3
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
4
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
5
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
6
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
7
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
8
तेव्हा गरजेपेक्षा जास्त कर्मचारी भरले, आता त्यांना बेरोजगार करणार; ॲमेझॉनमध्ये ३०,००० नोकऱ्या धोक्यात
9
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
10
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
11
Shani Gochar 2025: शनिचा फेरा आपल्या राशीसाठी नेहमीच तापदायक ठरतो का? पाहूया भावानुसार फळ
12
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
13
मतदाराचे आणि त्याच्या वडिलाचे आडनाव वेगवेगळे, २० हजार मतदारांची नावे संशयास्पद: आदित्य ठाकरे
14
शाळेची नव्हे, धोक्याची घंटा! सरकारी अनास्था आणि 'विनाअनुदानित' इंग्रजी शाळांचा वाढता बाजार
15
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
16
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
17
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
18
तोटा झाल्याची बनावट कागदपत्रे; कुर्ल्यातील कंपनीने कॅनरा बँकेला तब्बल ११ कोटींना गंडवले
19
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
20
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार

कोविड रुग्णालयात औषधांचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 23:30 IST

कोरोना उपचारात रामबाण समजल्या जाणाऱ्या रेमडिसीवर इंजेक्शनचा पुरवठा बंद झाला. आरोग्य यंत्रणेची दाणादाण उडत आहे.  वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ५५० खाटांचे कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. सुरुवातीला राज्यात येथील डॉक्टरांनी यशस्वी उपचार करून मे २०२० पर्यंत कोरोनाचा एकही मृत्यू होऊ दिला नाही. रुग्णसंख्या वाढत गेली, तसे मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. आता तर दिवसाला तीन ते चार जणांचा कोरोनाने मृत्यू होत आहे.

ठळक मुद्देगंभीर, अतिगंभीर रुग्ण : रेमडेसीवीर इंजेक्शनचा पुरवठाच बंद

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना विषाणू संसर्गाची लाट जिल्ह्यात आली आहे. रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. फेब्रुवारी ते मार्च या महिन्यात गंभीर ते अतिगंभीर असलेले रुग्ण मोठ्या संख्येत शासकीय कोविड रुग्णालयात दाखल होत आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणेचे नियोजन कोलमडले आहे. शासकीय कोविड रुग्णालयात २७६ कोरोनाग्रस्त उपचार घेत आहेत. यातील १२३ जण गंभीर ते अतिगंभीर लक्षणे असलेले आहेत. कोरोना उपचारात रामबाण समजल्या जाणाऱ्या रेमडिसीवर इंजेक्शनचा पुरवठा बंद झाला. आरोग्य यंत्रणेची दाणादाण उडत आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ५५० खाटांचे कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. सुरुवातीला राज्यात येथील डॉक्टरांनी यशस्वी उपचार करून मे २०२० पर्यंत कोरोनाचा एकही मृत्यू होऊ दिला नाही. रुग्णसंख्या वाढत गेली, तसे मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. आता तर दिवसाला तीन ते चार जणांचा कोरोनाने मृत्यू होत आहे. याची कारणे वेगवेगळी असली तरी आरोग्य यंत्रणेवर वाढलेला ताण व अपुरी औषधी हेही प्रमुख कारण मानले जात आहे. रेमडिसीवर या इंजेक्शनचे सहा डोस एका कोरोनाग्रस्ताला द्यावे लागतात. याप्रमाणे शासकीय रुग्णालयात दिवसाला ७० रेमडिसीवर इंजेक्शनची गरज लागते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पुरवठा बंद केल्याने रेमडिसीवर इंजेक्शन मिळविताना रुग्णालय प्रशासनाची कसरत होत आहे. यापूर्वीच कोविड रुग्णालयाला आपत्ती व्यवस्थापन निधीतून पाच कोटी मिळावेत, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, तो प्रस्ताव शासन स्तरावरच आहे. त्यामुळे अनेकांची देयकेही रखडली आहेत. कोविड रुग्णालयाचा कारभार उधारीवर किती दिवस चालवायचा, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोना वाढत असताना औषधांचा तुटवडा घातक ठरत आहे. कोविड रुग्णालयात सेवा देणारे डॉक्टर, नर्सेस जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावत आहेत. मात्र, त्यांना रुग्णांच्या उपचारासाठी पर्याप्त औषधी नसल्याने अडचणी येत आहेत. दिवसाला ७०पेक्षा अधिक रेमडिसीवर इंजेक्शनची जुळवाजुळव करताना कसरत होत आहे. डोस पूर्ण झाले नाही तर रुग्णांचाही रोष ओढावला जाईल, अशी भीती येथील डॉक्टरांना आहे. प्रशासनाकडून मात्र कुठल्याच ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत.  

नोडल अधिकाऱ्यांनी केले हात वर 

 प्रत्येक जिल्ह्यात कोरोना प्रतिबंध व उपाययोजनांचा नोडल अधिकारी म्हणून जिल्हा शल्यचिकित्सकांची नियुक्ती केली आहे. यवतमाळातील कोविड रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधीनस्त असले तरी नोडल अधिकारी म्हणून तेथील औषधी व इतर सुविधांची देखरेख करण्याची जबाबदारी जिल्हा शल्यचिकित्सकांवर येते. कोरोनाच्या काळात जिल्हा आरोग्य अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या दोन्ही यंत्रणेत समन्वय ठेवण्याची जबाबदारी जिल्हा शल्यचिकित्सकांवर आहे. रेमडिसीवरच्या तुटवड्याबाबत नोडल अधिकाऱ्याने हात वर केले आहेत. त्यामुळे परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. 

संसर्गाचे प्रमाण व लक्षणे ठरतात निर्णायक   उपचार करताना कोरोना रुग्णांची तीन गटात विभागाणी केली जाते. मध्य, गंभीर व अतिगंभीर असे हे गट आहे. ज्या रुग्णांमध्ये लक्षणे आहेत, परंतु त्याचे संसर्गाचे प्रमाण आठ पेक्षा कमी आहे, अशांना रेमडिसीवीर इंजेक्शन लावले जात नाही. मात्र ज्यांच्यामध्ये लक्षणे आहेत, सोबतच त्यांना रक्तदाब, मधुमेह असे आजार आहे, अशा रुग्णांना रेमडिसीवीरची गरज भासते. तेव्हा संसर्गाचे प्रमाण फारसे लक्षात घेतले जात नाही. 

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस