शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

पुसद शहरात मास्क, सॅनिटायझरचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 06:00 IST

शहरात मास्कचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी साधा रुमाल बांधला तरी चालेल, विनाकारण पैसे खर्च करु नयेत असेही जाणकार सांगत आहेत. जे डॉक्टर संशयित रुग्णांवर उपचार करतात, केवळ त्यांच्यासाठीच ‘एन-९५’ मास्कची गरज आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता प्रत्येक दोन ते तीन तासांनी साबणाने स्वच्छ हात धुवावे व गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देकोरोनापासून बचाव : उपजिल्हा रुग्णालयात कक्ष

प्रकाश लामणे।लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : जिल्ह्यासह राज्यातील कारोना (कोव्हीड-१९) रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या आठवडाभरात नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मास्क आणि सॅनीटायझर खरेदी केल्याने सध्या शहरात मास्क व सॅनिटायझरचा तुटवडा जाणवत आहे.शहरात मास्कचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी साधा रुमाल बांधला तरी चालेल, विनाकारण पैसे खर्च करु नयेत असेही जाणकार सांगत आहेत. जे डॉक्टर संशयित रुग्णांवर उपचार करतात, केवळ त्यांच्यासाठीच ‘एन-९५’ मास्कची गरज आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता प्रत्येक दोन ते तीन तासांनी साबणाने स्वच्छ हात धुवावे व गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.कोरोना (कोव्हीड-१९) विषाणूचा प्रसार थांबविण्याकरिता व त्याच्यापासून प्रतिबंध व्हावा म्हणूनर् सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणावर मास्क व हॅन्ड सॅनिटायझर खरेदी करीत आहेत.अनेकांनी भविष्यात तुडवडा जाणवेल, या भीतीने आधीच मास्क व सॅनिटायझरची खरेदी करुन ठेवली आहे. या स्थितीचा लाभ घेत काही धूर्त व्यक्ती साठेबाजी करुन मास्कचा कृत्रिम तुटवडा निर्माण करुन जादा दराने मास्कची विक्री करीत असल्याची चर्चा आहे.नागरिकांनी रुमाल बांधावाशहरात ठोक व किरकोळ विक्रेत्यांकडे मास्क व सॅनीटायझरचा तुटवडा आहे. मात्र मास्क, सॅनिटायझर मागणाऱ्यांची संख्या वाढत आहे. औषधी दुकानात मोठी गर्दी आहे. तथापि ग्राहकांची मागणी पूर्ण करणे अशक्य झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता गर्दीत जाणे टाळावे व साधा रुमाल बांधावा, असे आवाहन औषधी विक्रेते संतोष तडकसे यांनी केले आहे.उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची संख्या घटली. मास्क व सॅनिटायझरचा तुटवडा आहे. शासनाकडे मागणी केली. अद्याप पुरवठा झाला नाही. नागरिकांनी साधा रुमाल बांधला तरी चालेल. साबणाने दोन-तिनदा स्वच्छ हात धुतल्यास कोरोनाचा धोका टाळता येईल. उपजिल्हा रुग्णालयात चार बेडचा विलगीकरण कक्ष स्थापन केला असून आरोग्य यंत्रणा सज्ज आहे.डॉ. हरिभाऊ फुपाटे,वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, पुसद. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटल