शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

विमा योजनेला अल्प प्रतिसाद

By admin | Updated: August 7, 2014 00:05 IST

शेतकऱ्यांना कृषी पीक विमा योजनेचा लाभ व्हावा, या हेतूने शासनाच्या कृषी विभागाकडून सन २०१४-१५ साठी खरीप पीक विमा काढण्याचे शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले.

मारेगाव : शेतकऱ्यांना कृषी पीक विमा योजनेचा लाभ व्हावा, या हेतूने शासनाच्या कृषी विभागाकडून सन २०१४-१५ साठी खरीप पीक विमा काढण्याचे शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले. मात्र मागील हंगामातील पीक विम्याचा वाईट अनुभव आल्याने यावर्षी शेतकऱ्यांनी या योजनेस फारसा प्रतिसाद दिलाच नाही़ मागील सन २०१३-१४ च्या खरीप हंगामात तालुक्यातील बिगर कर्जदार चार हजार ८१२ शेतकऱ्यांनी चार हजार १९६ हेक्टर क्षेत्रातील कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी या पिकांसाठी तब्बल १६ लाख ६३ हजार ४३० रूपयांच्या विमा हप्त्याची रक्कम बँकात जमा करून पीक विम्याचा लाभासाठी संरक्षित केले होते़ त्यात सर्वाधिक क्षेत्र कापूस, सोयाबीन व तुरीचे होते़ मागील हंगामात अतिवृष्टी, गारपिट, संततधार पावसाने खरीप पिकांचे उत्पादन घटले होते. सोयाबीन कापणीच्या वेळी झालेल्या अवकाळी पावसाने सोयाबिनची नासाडी झाली होती. परिणामी एकरी उत्पादन घटले, सोबतच सोयाबीन काळे पडले होते. त्यातच सोयाबिनला भाव सुध्दा कमी मिळाला. तालुका कृषी कार्यालय व महसूल विभागने मागीलवर्षी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांचे केवळ सांत्वन केले़ खरीप पिकांची आणेवारी ५० टक्केच्या आत आल्याने शेतकऱ्यांना कापूस नाही तर किमान सोयाबीन, तूर पिकाला विम्याचा लाभ मिळेलच, अशी अपेक्षा होती़ तथापि तालुक्यात सर्वात कमी पेरा असणाऱ्या एकमेव ज्वारीलाच पीक विमा मंजूर झाला़ त्यात कुंभा, मार्डी, मारेगाव, वनोजा, बोटोणी या पाचही महसूल मंडळातील मोजक्या गावातील केवळ २६४ शेतकऱ्यांना १२९़५५ हेक्टर क्षेत्रासाठी १० लाख ४५ हजार १३० रूपये मंजूर झाले अन् शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला़ मात्र या अन्यायाविरुद्ध कोणत्याही लोकप्रतिनिधींनी आवाज उठविला नाही, हे विशेष़ आता यावर्षी नव्याने सन २०१४-१५ साठी प्रथम हवामानावर आधारित नाविन्यपूर्ण पीक विमा आणि नंतर राष्ट्रीय कृषी पीक विमा काढण्याचे शासन निर्देशाप्रमाणे कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केले़ मात्र आधीच पीक विमा योजनेबाबत संतापलेल्या शेतकऱ्यांनी या योजनेला तालुक्यात फारसा प्रतिसाद दिलाच नाही़तालुका कृषी अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिनस्थ मंडळ अधिकारी व कृषी सहाय्यकांना गावागावांत जाऊन, शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना विमा काढण्यासाठी प्रोत्साहित केले़ तथापि त्यांना अल्प प्रतिसाद मिळाला. तालुक्यातील अल्पभूधारक व इतर अशा केवळ एक हजार १४६ शेतकऱ्यांनी यावर्षी कापूस, तूर, सोयाबीन, ज्वारीचे एक हजार ७२ हेक्टर क्षेत्र संरक्षित करण्यासाठी केवळ सात लाख ३२ हजार ६१७ रूपयांचा विमा हप्ता बँकात भरला आहे. तथापि मागील वर्षात कपाशी व सोयाबिनला पीक विमा का मिळाला नाही, कुणाची चूक झाली, याचा शोध घ्यावा, अशी मागणी होत आहे. मागीलवर्षी लाभ न झाल्याने यावर्षी उदासीनता दिसून आलाी. (तालुका प्रतिनिधी)