शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

विमा योजनेला अल्प प्रतिसाद

By admin | Updated: August 7, 2014 00:05 IST

शेतकऱ्यांना कृषी पीक विमा योजनेचा लाभ व्हावा, या हेतूने शासनाच्या कृषी विभागाकडून सन २०१४-१५ साठी खरीप पीक विमा काढण्याचे शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले.

मारेगाव : शेतकऱ्यांना कृषी पीक विमा योजनेचा लाभ व्हावा, या हेतूने शासनाच्या कृषी विभागाकडून सन २०१४-१५ साठी खरीप पीक विमा काढण्याचे शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले. मात्र मागील हंगामातील पीक विम्याचा वाईट अनुभव आल्याने यावर्षी शेतकऱ्यांनी या योजनेस फारसा प्रतिसाद दिलाच नाही़ मागील सन २०१३-१४ च्या खरीप हंगामात तालुक्यातील बिगर कर्जदार चार हजार ८१२ शेतकऱ्यांनी चार हजार १९६ हेक्टर क्षेत्रातील कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी या पिकांसाठी तब्बल १६ लाख ६३ हजार ४३० रूपयांच्या विमा हप्त्याची रक्कम बँकात जमा करून पीक विम्याचा लाभासाठी संरक्षित केले होते़ त्यात सर्वाधिक क्षेत्र कापूस, सोयाबीन व तुरीचे होते़ मागील हंगामात अतिवृष्टी, गारपिट, संततधार पावसाने खरीप पिकांचे उत्पादन घटले होते. सोयाबीन कापणीच्या वेळी झालेल्या अवकाळी पावसाने सोयाबिनची नासाडी झाली होती. परिणामी एकरी उत्पादन घटले, सोबतच सोयाबीन काळे पडले होते. त्यातच सोयाबिनला भाव सुध्दा कमी मिळाला. तालुका कृषी कार्यालय व महसूल विभागने मागीलवर्षी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांचे केवळ सांत्वन केले़ खरीप पिकांची आणेवारी ५० टक्केच्या आत आल्याने शेतकऱ्यांना कापूस नाही तर किमान सोयाबीन, तूर पिकाला विम्याचा लाभ मिळेलच, अशी अपेक्षा होती़ तथापि तालुक्यात सर्वात कमी पेरा असणाऱ्या एकमेव ज्वारीलाच पीक विमा मंजूर झाला़ त्यात कुंभा, मार्डी, मारेगाव, वनोजा, बोटोणी या पाचही महसूल मंडळातील मोजक्या गावातील केवळ २६४ शेतकऱ्यांना १२९़५५ हेक्टर क्षेत्रासाठी १० लाख ४५ हजार १३० रूपये मंजूर झाले अन् शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला़ मात्र या अन्यायाविरुद्ध कोणत्याही लोकप्रतिनिधींनी आवाज उठविला नाही, हे विशेष़ आता यावर्षी नव्याने सन २०१४-१५ साठी प्रथम हवामानावर आधारित नाविन्यपूर्ण पीक विमा आणि नंतर राष्ट्रीय कृषी पीक विमा काढण्याचे शासन निर्देशाप्रमाणे कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केले़ मात्र आधीच पीक विमा योजनेबाबत संतापलेल्या शेतकऱ्यांनी या योजनेला तालुक्यात फारसा प्रतिसाद दिलाच नाही़तालुका कृषी अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिनस्थ मंडळ अधिकारी व कृषी सहाय्यकांना गावागावांत जाऊन, शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना विमा काढण्यासाठी प्रोत्साहित केले़ तथापि त्यांना अल्प प्रतिसाद मिळाला. तालुक्यातील अल्पभूधारक व इतर अशा केवळ एक हजार १४६ शेतकऱ्यांनी यावर्षी कापूस, तूर, सोयाबीन, ज्वारीचे एक हजार ७२ हेक्टर क्षेत्र संरक्षित करण्यासाठी केवळ सात लाख ३२ हजार ६१७ रूपयांचा विमा हप्ता बँकात भरला आहे. तथापि मागील वर्षात कपाशी व सोयाबिनला पीक विमा का मिळाला नाही, कुणाची चूक झाली, याचा शोध घ्यावा, अशी मागणी होत आहे. मागीलवर्षी लाभ न झाल्याने यावर्षी उदासीनता दिसून आलाी. (तालुका प्रतिनिधी)