शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

हरियाणातील शूटर, इटालियन कुत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 23:49 IST

गेल्या २७ दिवसांपासून सातत्याने हुलकावणी देणाऱ्या नरभक्षी वाघिणीला जेरबंद करण्यासाठी अर्जुन अवॉर्डप्राप्त प्रसिद्ध गोल्फपटू तथा शूटर ज्योतींदरसिंग रंधवा हा दोन प्रशिक्षित ईटालियन श्वानासह राळेगावच्या जंगलात दाखल झाला आहे.

ठळक मुद्देवाघिणीला पकडण्यासाठी नवा प्लॅन : हवेत उडणारे यंत्रही दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : गेल्या २७ दिवसांपासून सातत्याने हुलकावणी देणाऱ्या नरभक्षी वाघिणीला जेरबंद करण्यासाठी अर्जुन अवॉर्डप्राप्त प्रसिद्ध गोल्फपटू तथा शूटर ज्योतींदरसिंग रंधवा हा दोन प्रशिक्षित ईटालियन श्वानासह राळेगावच्या जंगलात दाखल झाला आहे. हत्तीच्या धुमाकूळानंतर थांबविण्यात आलेल्या मोहिमेला पुन्हा एकदा गती देण्यात आली असून हवेत उडणाऱ्या दोन आसनी पॉवर पॅरामोटरिंग या यंत्राची देखील या मोहिमेत मदत घेतली जाणार आहे.काही दिवसांपूर्वी परत गेलेला हैैद्राबाद येथील वादग्रस्त शूटर नवाब शाफत अली खान हादेखील दोन दिवसांपासून पुन्हा एकदा या मोहिमेत सहभागी झाला आहे. त्याच्याच माध्यमातून गोल्फपटू ज्योतींदरसिंग रंधवा याला त्याच्या दोन ईटलियन श्वानांसह राळेगावच्या जंगलात पाचारण करण्यात आल्याची माहिती पांढरकवडाच्या उपवनसंरक्षक के.एस.अभर्णा यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. रंधवासोबत केन कोर्सो जातीचे दोन प्रशिक्षित कुत्रे असून कार्लोस आणि बस्टर अशी त्यांची नावे आहेत. याशिवाय पॉवर पॅरामोटरिंग हे अत्याधुनिक हवेत उडणारं यंत्रदेखील दाखल झाले आहे. पाच हजार फूट उंच उडणाºया या ग्लायडरमध्ये दोन व्यक्ती बसून वाघिणीचा शोध घेणार आहेत.गेल्या २७ दिवसांपासून वाघिण व तिचे दोन बछडे वनविभागाच्या पथकाला हुलकावणी देत आहेत. अशात मिशन टी-वन कॅप्चर मोहिमेतून पाच हत्ती माघारी गेल्याने वनविभागाने पुन्हा शूटर नवाबला पाचारण केले. त्यानंतर नवाब आपल्या पथकासह राळेगावच्या जंगलात दाखल झाला. शूटर नवाब गेल्या चार दिवसांपासूनपरिसराची टेहळणी करीत आहे.माजी मंत्री ‘पीसीसीएफ’ला भेटलेयवतमाळ - वाघिणीची राळेगाव-पांढरकवडा तालुक्यात असलेल्या दहशतीच्या पार्श्वभूमीवर माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके यांच्या नेतृत्वात राळेगावच्या काही गावकऱ्यांनी मंगळवारी प्रधान मुख्य वनसंरक्षक यु.के. मिश्रा (वन्यजीव) यांची येथे भेट घेतली. यावेळी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये, सीसीएफ राहूरकरहेसुद्धा उपस्थित होते. १३ शेतकरी-शेतमजुरांची शिकार करणाऱ्या वाघिणीचा अद्याप बंदोबस्त न झाल्याने काय परिणाम होत आहे, याचा पाढाच प्रा. पुरकेंनी वाचला. वाघिणीच्या भीतीमुळे शेतीचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, गुरेढोरे चारण्यासाठी जाऊ नये, असे वन विभागाचे आदेश आहे. म्हणून वन विभागाने गुराढोरांच्या चाऱ्याची व्यवस्था करून द्यावी, वाघिणीला पकडण्यासाठी आणलेला हत्ती सुटून एका महिलेचा बळी गेला. वृद्ध, जखमी झाला, अनेकांचे नुकसान झाले, या प्रकरणातील दोषींवर कारवाई करावी, आठ शिकारी झाल्यानंतर वन विभागाने वाघिणीचा विषय गांभीर्याने घेतला. त्यासाठी एवढा विलंब लावणाऱ्या वन अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली. यावेळी अरविंद वाढोणकर, अरविंद फुटाणे, जितेंद्रसिंग कोंघारेकर उपस्थित होते.

टॅग्स :Tigerवाघ