शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांच्या नावे चिठ्ठी लिहून युवा शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 20:56 IST

शेतात जाण्यासाठी रस्ता मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या युवा शेतकऱ्याने पंतप्रधान, मुख्यमंत्री व यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे चिठ्ठी लिहून शेजारच्या शेतात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सायंकाळी तालुक्यातील मालेगाव येथे घडली.

ठळक मुद्देशेजाऱ्याच्या शेतातच लावला गळफासशेताच्या रस्त्याचा वाद

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : शेतात जाण्यासाठी रस्ता मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या युवा शेतकऱ्याने पंतप्रधान, मुख्यमंत्री व यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे चिठ्ठी लिहून शेजारच्या शेतात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सायंकाळी तालुक्यातील मालेगाव येथे घडली. गुरुवारी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली व सायंकाळी अंत्यसंस्कार पार पडले.ज्ञानेश्वर भगवानराव कदम (२८) असे मृत युवा शेतकऱ्याचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे चिठ्ठी लिहिली. त्यात आपल्या आजोबाने १९५२ मध्ये दोन हेक्टर शेती खरेदी केल्याचा उल्लेख आहे. या शेतात ये-जा करण्याकरिता रस्ता होता. मात्र कालांतराने शेजारील शेतकऱ्यांनी हा रस्ता वापरण्यास मनाई केली. शेजारील शेतकरी वारंवार त्रास देत होते. माझ्या घरातील महिलांना शिवीगाळ करीत होते. एकदा तर धारदार शस्त्राने शेजारील शेतकरी आपल्या वडिलांच्या अंगावर धावून आल्याचा उल्लेखही ज्ञानेश्वरने चिठ्ठीत केला आहे. शेतात जाण्यासाठी वारंवार रस्ता मागूनही उपयोग झाला नाही. हे प्रकरण लालफितशाहीत अडकले. त्यामुळे आपल्या कुटुंबाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळेच आपण आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख ज्ञानेश्वरने चिठ्ठीत केला आहे.आपल्या मरणाची बातमी प्रसार माध्यमांनी प्रकाशित करून किमान मरणानंतर तरी आपल्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षाही ज्ञानेश्वरने चिठ्ठीत व्यक्त केली. तसेच कुटुंबातील सर्वांची माफी मागून मुलीच्या शिक्षणाचा खर्च शासनाने करावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली. दरम्यान, आत्महत्येनंतर ज्ञानेश्वरचा मृतदेह घेण्यास कुटुंबीयांनी प्रथम नकार दिला होता. मात्र त्यानंतर समजूत काढली गेल्याने त्यांनी गुरुवारी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार केले. वृत्तलिहिस्तोवर या प्रकरणी कदम यांच्या कुटुंबातील कुणीही तक्रार दिली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली.ज्ञानेश्वर कदम यांच्याजवळ पंतप्रधान, मुख्यमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे चिठ्ठी आढळली. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे.- एम. एम. बोडखेठाणेदार, उमरखेड

टॅग्स :Suicideआत्महत्याfarmer suicideशेतकरी आत्महत्या