शहरं
Join us  
Trending Stories
1
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
2
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
5
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
6
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
7
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
8
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
9
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
10
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
11
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
12
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
13
Nigeria Mosque Explosion: नायजेरिया हादरलं! मशिदीत नमाजाच्या वेळी मोठा बॉम्बस्फोट; ५ ठार, ३५ जण गंभीर जखमी
14
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
15
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
16
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
17
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
18
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
19
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
20
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांच्या नावे चिठ्ठी लिहून युवा शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 20:56 IST

शेतात जाण्यासाठी रस्ता मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या युवा शेतकऱ्याने पंतप्रधान, मुख्यमंत्री व यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे चिठ्ठी लिहून शेजारच्या शेतात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सायंकाळी तालुक्यातील मालेगाव येथे घडली.

ठळक मुद्देशेजाऱ्याच्या शेतातच लावला गळफासशेताच्या रस्त्याचा वाद

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : शेतात जाण्यासाठी रस्ता मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या युवा शेतकऱ्याने पंतप्रधान, मुख्यमंत्री व यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे चिठ्ठी लिहून शेजारच्या शेतात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सायंकाळी तालुक्यातील मालेगाव येथे घडली. गुरुवारी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली व सायंकाळी अंत्यसंस्कार पार पडले.ज्ञानेश्वर भगवानराव कदम (२८) असे मृत युवा शेतकऱ्याचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे चिठ्ठी लिहिली. त्यात आपल्या आजोबाने १९५२ मध्ये दोन हेक्टर शेती खरेदी केल्याचा उल्लेख आहे. या शेतात ये-जा करण्याकरिता रस्ता होता. मात्र कालांतराने शेजारील शेतकऱ्यांनी हा रस्ता वापरण्यास मनाई केली. शेजारील शेतकरी वारंवार त्रास देत होते. माझ्या घरातील महिलांना शिवीगाळ करीत होते. एकदा तर धारदार शस्त्राने शेजारील शेतकरी आपल्या वडिलांच्या अंगावर धावून आल्याचा उल्लेखही ज्ञानेश्वरने चिठ्ठीत केला आहे. शेतात जाण्यासाठी वारंवार रस्ता मागूनही उपयोग झाला नाही. हे प्रकरण लालफितशाहीत अडकले. त्यामुळे आपल्या कुटुंबाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळेच आपण आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख ज्ञानेश्वरने चिठ्ठीत केला आहे.आपल्या मरणाची बातमी प्रसार माध्यमांनी प्रकाशित करून किमान मरणानंतर तरी आपल्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षाही ज्ञानेश्वरने चिठ्ठीत व्यक्त केली. तसेच कुटुंबातील सर्वांची माफी मागून मुलीच्या शिक्षणाचा खर्च शासनाने करावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली. दरम्यान, आत्महत्येनंतर ज्ञानेश्वरचा मृतदेह घेण्यास कुटुंबीयांनी प्रथम नकार दिला होता. मात्र त्यानंतर समजूत काढली गेल्याने त्यांनी गुरुवारी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार केले. वृत्तलिहिस्तोवर या प्रकरणी कदम यांच्या कुटुंबातील कुणीही तक्रार दिली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली.ज्ञानेश्वर कदम यांच्याजवळ पंतप्रधान, मुख्यमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे चिठ्ठी आढळली. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे.- एम. एम. बोडखेठाणेदार, उमरखेड

टॅग्स :Suicideआत्महत्याfarmer suicideशेतकरी आत्महत्या