शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

धक्कादायक! पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांच्या नावे चिठ्ठी लिहून युवा शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 20:56 IST

शेतात जाण्यासाठी रस्ता मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या युवा शेतकऱ्याने पंतप्रधान, मुख्यमंत्री व यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे चिठ्ठी लिहून शेजारच्या शेतात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सायंकाळी तालुक्यातील मालेगाव येथे घडली.

ठळक मुद्देशेजाऱ्याच्या शेतातच लावला गळफासशेताच्या रस्त्याचा वाद

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : शेतात जाण्यासाठी रस्ता मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या युवा शेतकऱ्याने पंतप्रधान, मुख्यमंत्री व यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे चिठ्ठी लिहून शेजारच्या शेतात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सायंकाळी तालुक्यातील मालेगाव येथे घडली. गुरुवारी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली व सायंकाळी अंत्यसंस्कार पार पडले.ज्ञानेश्वर भगवानराव कदम (२८) असे मृत युवा शेतकऱ्याचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे चिठ्ठी लिहिली. त्यात आपल्या आजोबाने १९५२ मध्ये दोन हेक्टर शेती खरेदी केल्याचा उल्लेख आहे. या शेतात ये-जा करण्याकरिता रस्ता होता. मात्र कालांतराने शेजारील शेतकऱ्यांनी हा रस्ता वापरण्यास मनाई केली. शेजारील शेतकरी वारंवार त्रास देत होते. माझ्या घरातील महिलांना शिवीगाळ करीत होते. एकदा तर धारदार शस्त्राने शेजारील शेतकरी आपल्या वडिलांच्या अंगावर धावून आल्याचा उल्लेखही ज्ञानेश्वरने चिठ्ठीत केला आहे. शेतात जाण्यासाठी वारंवार रस्ता मागूनही उपयोग झाला नाही. हे प्रकरण लालफितशाहीत अडकले. त्यामुळे आपल्या कुटुंबाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळेच आपण आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख ज्ञानेश्वरने चिठ्ठीत केला आहे.आपल्या मरणाची बातमी प्रसार माध्यमांनी प्रकाशित करून किमान मरणानंतर तरी आपल्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षाही ज्ञानेश्वरने चिठ्ठीत व्यक्त केली. तसेच कुटुंबातील सर्वांची माफी मागून मुलीच्या शिक्षणाचा खर्च शासनाने करावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली. दरम्यान, आत्महत्येनंतर ज्ञानेश्वरचा मृतदेह घेण्यास कुटुंबीयांनी प्रथम नकार दिला होता. मात्र त्यानंतर समजूत काढली गेल्याने त्यांनी गुरुवारी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार केले. वृत्तलिहिस्तोवर या प्रकरणी कदम यांच्या कुटुंबातील कुणीही तक्रार दिली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली.ज्ञानेश्वर कदम यांच्याजवळ पंतप्रधान, मुख्यमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे चिठ्ठी आढळली. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे.- एम. एम. बोडखेठाणेदार, उमरखेड

टॅग्स :Suicideआत्महत्याfarmer suicideशेतकरी आत्महत्या