शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये झाला मोठा कांड! गावातील हिंदू घराघरातून निघाले मुस्लीम मतदार; गावकरीही झाले हैराण
2
उद्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक; संख्याबळ कोणाकडे? कोणाचा कोणाला पाठिंबा? जाणून घ्या...
3
नादखुळा...! उत्तराखंडमध्ये रस्ते बंद होते, चार विद्यार्थी बीएडची परीक्षा देण्यासाठी हेलिकॉप्टरने आले...
4
'भारतावर टॅरिफ लादणे योग्य निर्णय'; झेलेन्स्की यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या कारवाईचे केले समर्थन
5
अमेरिकेच्या डोळ्यात खुपताहेत भारत-चीन; "जास्त टॅरिफ लावा," आणखी एका अधिकाऱ्यानं गरळ ओकली
6
AIच्या मदतीने सामान्य माणूस बनवू शकतो अणुबॉम्ब! एआयच्या 'गॉडफादर'चा इशारा
7
Pitru Paksha 2025: पितरांच्या नैवेद्याआधी 'हे' पाच घास तुम्ही काढून ठेवता का?
8
वजन कमी करा, पैसे मिळवा! कंपनी देतेय जबरदस्त ऑफर; कर्मचाऱ्यांना वजन कमी केल्यावर लाखो डॉलर्स मिळणार
9
भाजपा खासदाराच्या बहि‍णीला भररस्त्यात दांडक्याने बेदम मारले; Video व्हायरल, नेमका प्रकार काय?
10
बापरे! नवऱ्याशी भांडल्यावर चिडली, गंगेत उडी मारली; मगर दिसताच रात्रभर झाडावर बसली अन्...
11
"मी विद्या बालनला फोन केला...", सुचित्रा बांदेकरांना आलेला रिजेक्शनचा अनुभव, सांगितला किस्सा
12
VIRAL :  बुर्ज खलिफाच्या मागून डोकावला 'ब्लड मून'; अविस्मरणीय क्षण तुम्ही पाहिलात का?
13
पितृपक्ष २०२५: पितरांना नैवेद्य दाखवल्यावर आवर्जून म्हणा 'हे' स्तोत्र; अन्यथा अपूर्ण राहील श्राद्ध विधी!
14
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये जवानांच्या चकमकीत दहशतवाद्याचा खात्मा, पाकिस्तानी घुसखोरही अटकेत
15
Pitru Paksha: पितरांचे आत्मे घरी येणार असतील तर ते अशुभ कसे?
16
लिंगायत समाजाला हिंदू धर्माचा भाग मानू नका, कर्नाटकात जात सर्वेक्षणापूर्वी मोठी मागणी
17
PF खातेधारकांसाठी मोठी बातमी! आता एटीएम-UPI ने काढता येणार पैसे, लवकरच 'EPFO 3.0' येणार
18
Pitru Paksha 2025: पितृ ऋण कशाला म्हणतात, पितृ पक्षात ते का फेडायचे आणि त्यामुळे कोणते लाभ होतात? वाचा!
19
Online Food: Zomato नंतर Swiggy वरुनही ऑनलाइन जेवण मागवणं पडेल महागात, जीएसटीचाही परिणाम दिसणार
20
"डीजेमुळे वादनच झालं नाही", पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत आला अत्यंत वाईट अनुभव, सौरभ गोखले म्हणाला...

सिंचन विहिरींना वितरणचा शॉक

By admin | Updated: December 21, 2014 23:05 IST

शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्याच्या सिंचन क्षेत्रात वाढ करण्यासाठी पॅकेजमधून १४ हजार ८४५ विहिरी मंजूर झाल्या. त्यापैकी सात हजार विहिरींचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

जोडणीची प्रतीक्षा : ओलिताचे स्वप्न अपूर्ण यवतमाळ : शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्याच्या सिंचन क्षेत्रात वाढ करण्यासाठी पॅकेजमधून १४ हजार ८४५ विहिरी मंजूर झाल्या. त्यापैकी सात हजार विहिरींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र वीज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणाने शेतकऱ्यांचे ओलिताचे स्वप्न अपूर्ण आहे. वीज जोडणीचे शेकडो अर्ज प्रलंबित असून शेतकरी तुडुंब भरलेल्या विहिरीकडे डबडबल्या डोळ्यांनी पाहत आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या सिंचन क्षेत्रात वाढ करण्यासाठी पंतप्रधान व मुख्यमंत्री पॅकेजमधून विहिरी देण्यात आल्या. प्रत्येक तालुक्याला एक हजार या प्रमाणे १६ तालुक्याला १६ हजार विहिरी देण्याचे ठरविण्यात आले. त्यातील १४ हजार ८४५ विहिरी या योजनेअंतर्गत पात्र ठरल्या. त्यातील सात हजार विहिरींचे बांधकाम शेतकऱ्यांनी पूर्ण केले आहे. विहिरी पूर्ण झाल्याने शेतकऱ्यांना आता सिंचनाची आस लागली आहे. विहिरीवरून ओलित करून आपली आर्थिक परिस्थिती सुधारेल असे स्वप्न शेतकरी पाहत आहे. मात्र या स्वप्नाला वीज वितरण कंपनीने शॉक दिला आहे. विजेची मागणी आणि पुरवठा यात तफावत असल्याने वीज जोडणीचे शेकडो अर्ज प्रलंबित आहे. कृषी फिडरवर वीज जोडणीसाठी अतिरिक्त डीपी बसविणे गरजेचे आहे. मात्र ही डीपी बसविण्यासाठी लागणारा निधीच वीज वितरण कंपनीकडे नसल्याचे सांगितले जाते. आधीच अनेक रोहित्र गत काही महिन्यात जळाले आहे. त्या ठिकाणीही नवीन रोहित्र बसविण्यात आले नाही. त्यामुळे वीज पुरवठ्याचा अतिरिक्त भार निर्माण होऊन शेतकऱ्यांना कमी दाबाचा वीज पुरवठा होतो. तासन्तास वीज पुरवठा खंडित असतो. यामुळे शेतकऱ्यांचे मोटारपंप जळण्याचे प्रकार घडत आहे.वीज पुरवठा झाला नसल्याने सात हजार शेतकऱ्यांचे ओलिताचे स्वप्न अपूर्ण राहिले. तसेच रबी हंगामाचे क्षेत्रही निम्म्यावर आल्याचे दिसत आहे. शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून पॅकेज अंतर्गत विहिरी दिल्या. मात्र त्यासाठी लागणाऱ्या विजेचे नियोजनच करण्यात आले नाही. आज विहिरी तयार आहे. परंतु वीज नाही. परिणामी शेतकऱ्यांना ओलिताला मुकावे लागत आहे. मात्र या प्रश्नाकडे कुणीही गांभीर्याने पाहत नाही. (शहर वार्ताहर)