शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन विहिरींना वितरणचा शॉक

By admin | Updated: December 21, 2014 23:05 IST

शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्याच्या सिंचन क्षेत्रात वाढ करण्यासाठी पॅकेजमधून १४ हजार ८४५ विहिरी मंजूर झाल्या. त्यापैकी सात हजार विहिरींचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

जोडणीची प्रतीक्षा : ओलिताचे स्वप्न अपूर्ण यवतमाळ : शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्याच्या सिंचन क्षेत्रात वाढ करण्यासाठी पॅकेजमधून १४ हजार ८४५ विहिरी मंजूर झाल्या. त्यापैकी सात हजार विहिरींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र वीज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणाने शेतकऱ्यांचे ओलिताचे स्वप्न अपूर्ण आहे. वीज जोडणीचे शेकडो अर्ज प्रलंबित असून शेतकरी तुडुंब भरलेल्या विहिरीकडे डबडबल्या डोळ्यांनी पाहत आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या सिंचन क्षेत्रात वाढ करण्यासाठी पंतप्रधान व मुख्यमंत्री पॅकेजमधून विहिरी देण्यात आल्या. प्रत्येक तालुक्याला एक हजार या प्रमाणे १६ तालुक्याला १६ हजार विहिरी देण्याचे ठरविण्यात आले. त्यातील १४ हजार ८४५ विहिरी या योजनेअंतर्गत पात्र ठरल्या. त्यातील सात हजार विहिरींचे बांधकाम शेतकऱ्यांनी पूर्ण केले आहे. विहिरी पूर्ण झाल्याने शेतकऱ्यांना आता सिंचनाची आस लागली आहे. विहिरीवरून ओलित करून आपली आर्थिक परिस्थिती सुधारेल असे स्वप्न शेतकरी पाहत आहे. मात्र या स्वप्नाला वीज वितरण कंपनीने शॉक दिला आहे. विजेची मागणी आणि पुरवठा यात तफावत असल्याने वीज जोडणीचे शेकडो अर्ज प्रलंबित आहे. कृषी फिडरवर वीज जोडणीसाठी अतिरिक्त डीपी बसविणे गरजेचे आहे. मात्र ही डीपी बसविण्यासाठी लागणारा निधीच वीज वितरण कंपनीकडे नसल्याचे सांगितले जाते. आधीच अनेक रोहित्र गत काही महिन्यात जळाले आहे. त्या ठिकाणीही नवीन रोहित्र बसविण्यात आले नाही. त्यामुळे वीज पुरवठ्याचा अतिरिक्त भार निर्माण होऊन शेतकऱ्यांना कमी दाबाचा वीज पुरवठा होतो. तासन्तास वीज पुरवठा खंडित असतो. यामुळे शेतकऱ्यांचे मोटारपंप जळण्याचे प्रकार घडत आहे.वीज पुरवठा झाला नसल्याने सात हजार शेतकऱ्यांचे ओलिताचे स्वप्न अपूर्ण राहिले. तसेच रबी हंगामाचे क्षेत्रही निम्म्यावर आल्याचे दिसत आहे. शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून पॅकेज अंतर्गत विहिरी दिल्या. मात्र त्यासाठी लागणाऱ्या विजेचे नियोजनच करण्यात आले नाही. आज विहिरी तयार आहे. परंतु वीज नाही. परिणामी शेतकऱ्यांना ओलिताला मुकावे लागत आहे. मात्र या प्रश्नाकडे कुणीही गांभीर्याने पाहत नाही. (शहर वार्ताहर)