शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

शिवसेनेचा जिल्हा कचेरीवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 22:00 IST

शिवसेना विधानसभा संपर्क प्रमुखावरील गुन्हे मागे घ्यावे या मागणीसाठी शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. टिळकस्मारक भवन येथून मंगळवारी दुपारी निघालेला हा मोर्चा दत्त चौक, बसस्थानक चौक मार्गे एलआयसी चौकात धडकला. येथे झालेल्या सभेत पालकमंत्र्यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.

ठळक मुद्देअटकेचा निषेध : संतोष ढवळेवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शिवसेना विधानसभा संपर्क प्रमुखावरील गुन्हे मागे घ्यावे या मागणीसाठी शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. टिळकस्मारक भवन येथून मंगळवारी दुपारी निघालेला हा मोर्चा दत्त चौक, बसस्थानक चौक मार्गे एलआयसी चौकात धडकला. येथे झालेल्या सभेत पालकमंत्र्यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. नंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.कामगार नोंदणी कार्यालयात शिवसेनेचे संतोष ढवळे यांनी गोंधळ घालून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याची तक्रार शहर ठाण्यात नोंदविण्यात आली. यानंतर ढवळे यांना मंगळवारी अटक झाली. या घटनेचा निषेध करण्यासाठी शिवसेनेने मोर्चाचे आयोजन केले होते. तालुक्यासह जिल्हाभरातील पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले.संतोष ढवळे यांच्यावर पालकमंत्री मदन येरावार यांच्या सांगण्यावरून खोटे गुन्हे नोंदविण्यात आल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला. ढवळे हे निर्दोष असून त्यांनी खºया कामगारांना हक्क मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला होता. मात्र पालकमंत्र्यांकडून राजकारण केले जात असून भाजपाच्या ठराविक कार्यकर्त्यांंनाच या योजनेचा लाभ दिला जात आहे. हा मनसुबा उधळण्याचा प्रयत्न केल्यानेच ढवळे यांना तुरुंगात जावे लागल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला.ढवळे यांच्यावरील गुन्हे तत्काळ मागे घ्यावे, अशा मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना दिले. या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड, पराग पिंगळे, निवासी उपजिल्हा प्रमुख प्रवीण पांडे, माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, उपजिल्हा प्रमुख गजानन डोमाळे, उमाकांत पापीनवार, किशोर इंगळे, श्रीधर मोहोड, शहर प्रमुख पिंटू बांगर, एकनाथ तुमकर, पंचायत समितीचे उपसभापती गजानन पाटील, संजय रंगे, हरिभाऊ लिंगणवार, गजानन बेजंकीवार, राजेश टेंभरे यांनी केले.माफिया राज मोडण्याचे आव्हानपालकमंत्र्यांच्या पाठबळाने शहरासह जिल्ह्यात माफियाराज बोकाळले आहे. पालकमंत्री सामाजिक कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबण्यासाठी सत्तेचा वापर करीत आह, असा आरोप करीत शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी किमान पोलिसांनी माफियांचा बंदोबस्त करावा अशी मागणी यावेळी केली.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना